शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशासाठी सीईटीचा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:11 IST

पुणे : एकीकडे दहावीचे अंतर्गत मूल्यमापन कसे होईल, हे स्पष्ट नसताना आता अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्याचा ...

पुणे : एकीकडे दहावीचे अंतर्गत मूल्यमापन कसे होईल, हे स्पष्ट नसताना आता अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्याचा विचार सुरू झाला आहे. मात्र, तरीही अनेक प्रश्न अनुत्तरित राहत आहेत. त्यामुळे दहावी निकाल व अकरावी प्रवेशाचा प्रश्न केव्हा सुटणार, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

कोरोनामुळे इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या. मात्र, विद्यार्थ्यांच्या परीक्षाच नाही तर पुढील प्रवेश कसे द्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे सध्या दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करावा की अकरावी प्रवेशासाठी सीईटी घ्यावी, याबाबत शिक्षण विभागाकडून चाचपणी केली जात आहे. मात्र, तंत्रशिक्षण विभागाचे प्रवेश कसे देणार? याचा विचार अद्याप झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

--------------------

इयत्ता अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार असली तरी ती ऑनलाईन घेणार की ऑफलाइन, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ऑनलाइन सीईटी घेतल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे काय? आणि ऑफलाईन सीईटी घेतल्यास कोरोनापासून विद्यार्थ्यांचे संरक्षण कसे करणार? असा प्रश्न उपस्थित होतो.

--------------

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल अंतर्गत गुणांच्या आधारे जाहीर करण्याबाबत शिक्षण विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले. परंतु,वर्षभर शाळांनी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन केले आहे का? अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर केल्यास तो पारदर्शक पद्धतीने तयार केलेला असेल का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

-------------------

शिक्षण विभागातर्फे मागील वर्षी पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीच्या १ लाख ७ हजार १२५ जागांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, केवळ ७१ हजार ७२२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.

-------------

इयत्ता अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेतली जात असली, तरी तंत्रनिकेतन व आयआयटी प्रवेश कोणत्या गुणांच्या आधारे दिले जाणार हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.

------

इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन सीईटीच्या पर्यायाचा विचार करावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेणे धोकादायक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास अडचणी येऊ शकतात. परंतु, ही परीक्षा एक आठवडाभर घेतल्यास विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाहीत.

डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगर

--------------

प्रथमतः इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यासंदर्भातला निर्णय होण्याची आवश्यकता आहे. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करावा की इतर पर्यायांचा विचार करावा. हे निश्चित झाल्यानंतरच अकरावी प्रवेशासंदर्भात विचार करणे उचित ठरेल.

- अविनाश ताकवले, माजी प्राचार्य,

---------

इयत्ता अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे गरजेचे आहे. अंतर्गत मूल्यमापनात पारदर्शकता राहील का हे सांगता येत नाही. तसेच अनेक शाळांनी वर्षभर विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन केलेले नाही. त्यामुळे सीईटी चा पर्याय उचित ठरू शकतो.

एम. बी. दराडे, शिक्षक, मोझे हायस्कूल, येरवडा

----------