शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
4
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
7
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
8
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
9
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
10
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
11
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
12
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
13
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
14
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
15
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
16
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
18
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
19
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
20
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार

सलग सुट्या नावाला; पोलीस कामासाठी जुंपलेले

By admin | Updated: October 6, 2014 06:35 IST

चार दिवस सलग आलेली सुटी..., चला जाऊ फिरायला...., गावाकडे जाऊन सण साजरा करू..., असे नियोजन सर्वसामान्यांनी केले;

मंगेश पांडे, पिंपरीचार दिवस सलग आलेली सुटी..., चला जाऊ फिरायला...., गावाकडे जाऊन सण साजरा करू..., असे नियोजन सर्वसामान्यांनी केले; पण या नियोजनाला अपवाद ठरले ते पोलीस. कारण त्यांच्या साप्ताहिक सुट्या निवडणुकीमुळे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रजा मागण्याचा प्रश्नच येत नाही. पुढील १५ दिवस त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण वाढणार आहे. अशातच गंभीर गुन्हेदेखील घडत असून, या गुन्ह्यांची नोंद करून पुढील तपासाची जबाबदारीही पार पाडली जात आहे. अशा व्यस्त कामकाजामुळे पुरेशी झोप नाही की, वेळेवर जेवण नाही अशी पोलिसांची अवस्था आहे. सण-समारंभ आणि साप्ताहिक सुटी म्हटले की, कुटुंबीयांसमवेत सण साजरा करत कुटुंबीयांना वेळ द्यायचा, असे प्रत्येकाचेच नियोजन असते. मात्र, १२ सप्टेंबरला निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलिसांच्या सुट्या, रजा रद्द आहेत. चोवीस तास ‘अ‍ॅलर्ट’ राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आचारसंहिता काळात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांची जबाबदारीदेखील अधिकच वाढली आहे. योग्य नियोजन करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू झाल्या. प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहरात झोपडपट्टीचा भाग मोठ्या प्रमाणावर आहे. यापूर्वी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेल्या भागांवर पोलिसांनी अधिक लक्ष केंद्रित केले आहे. या भागांसह विविध भागात विशेष मोहीम राबवीत सराईत गुन्हेगारांवर कारवाई सुरू आहे. त्यासाठी विशेष पथकाची नेमणूक झाली आहे. ठिकठिकाणी पथसंचलन करण्यात येत आहे.कायदा आणि सुव्यवस्था कायम राखून भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून पुरेपूर काळजी घेतली जात आहे. अपुरे मनुष्यबळ, गुन्ह्याचा वाढता आलेख यामुळे ताण वाढला असतानाच निवडणुकीची अतिमहत्त्वाची जबाबदारी पेलण्याचे आव्हानही आहे.निवडणुकीत राजकीय कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद, त्यावरून मारामारी होते आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. म्हणून उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांवर पोलीस बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सभा, पदयात्रा यांचे चित्रीकरण केले जात आहे. पोलिसांवर कामाची अतिरिक्त जबाबदारीही सोपविण्यात आली असून, त्यामुळे पोलिसांची पळापळ होत आहे. बारा तासांची ड्युटी, त्यातच रद्द झालेल्या सुट्या यामुळे होणारा तणाव पोलिसांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. निवडणूक कामाच्या जबाबदारीमुळे पोलीस व्यस्त होते. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना घरगुती कार्यक्रमांनाही उपस्थित राहता येत नाही. अमुकतमुक ठिकाणी गोंधळाचे वातावरण आहे, अशी माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी धाव घेत आहेत. कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी घटनास्थळी दाखल होऊन प्रकरणाची पूर्ण शहानिशा केली जात आहे.