शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

सलग सुट्या नावाला; पोलीस कामासाठी जुंपलेले

By admin | Updated: October 6, 2014 06:35 IST

चार दिवस सलग आलेली सुटी..., चला जाऊ फिरायला...., गावाकडे जाऊन सण साजरा करू..., असे नियोजन सर्वसामान्यांनी केले;

मंगेश पांडे, पिंपरीचार दिवस सलग आलेली सुटी..., चला जाऊ फिरायला...., गावाकडे जाऊन सण साजरा करू..., असे नियोजन सर्वसामान्यांनी केले; पण या नियोजनाला अपवाद ठरले ते पोलीस. कारण त्यांच्या साप्ताहिक सुट्या निवडणुकीमुळे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रजा मागण्याचा प्रश्नच येत नाही. पुढील १५ दिवस त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण वाढणार आहे. अशातच गंभीर गुन्हेदेखील घडत असून, या गुन्ह्यांची नोंद करून पुढील तपासाची जबाबदारीही पार पाडली जात आहे. अशा व्यस्त कामकाजामुळे पुरेशी झोप नाही की, वेळेवर जेवण नाही अशी पोलिसांची अवस्था आहे. सण-समारंभ आणि साप्ताहिक सुटी म्हटले की, कुटुंबीयांसमवेत सण साजरा करत कुटुंबीयांना वेळ द्यायचा, असे प्रत्येकाचेच नियोजन असते. मात्र, १२ सप्टेंबरला निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलिसांच्या सुट्या, रजा रद्द आहेत. चोवीस तास ‘अ‍ॅलर्ट’ राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आचारसंहिता काळात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांची जबाबदारीदेखील अधिकच वाढली आहे. योग्य नियोजन करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू झाल्या. प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहरात झोपडपट्टीचा भाग मोठ्या प्रमाणावर आहे. यापूर्वी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेल्या भागांवर पोलिसांनी अधिक लक्ष केंद्रित केले आहे. या भागांसह विविध भागात विशेष मोहीम राबवीत सराईत गुन्हेगारांवर कारवाई सुरू आहे. त्यासाठी विशेष पथकाची नेमणूक झाली आहे. ठिकठिकाणी पथसंचलन करण्यात येत आहे.कायदा आणि सुव्यवस्था कायम राखून भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून पुरेपूर काळजी घेतली जात आहे. अपुरे मनुष्यबळ, गुन्ह्याचा वाढता आलेख यामुळे ताण वाढला असतानाच निवडणुकीची अतिमहत्त्वाची जबाबदारी पेलण्याचे आव्हानही आहे.निवडणुकीत राजकीय कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद, त्यावरून मारामारी होते आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. म्हणून उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांवर पोलीस बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सभा, पदयात्रा यांचे चित्रीकरण केले जात आहे. पोलिसांवर कामाची अतिरिक्त जबाबदारीही सोपविण्यात आली असून, त्यामुळे पोलिसांची पळापळ होत आहे. बारा तासांची ड्युटी, त्यातच रद्द झालेल्या सुट्या यामुळे होणारा तणाव पोलिसांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. निवडणूक कामाच्या जबाबदारीमुळे पोलीस व्यस्त होते. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना घरगुती कार्यक्रमांनाही उपस्थित राहता येत नाही. अमुकतमुक ठिकाणी गोंधळाचे वातावरण आहे, अशी माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी धाव घेत आहेत. कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी घटनास्थळी दाखल होऊन प्रकरणाची पूर्ण शहानिशा केली जात आहे.