शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस ही एक चळवळ; देशहितासाठी कार्यरत : श्रीपाल सबनीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 03:10 IST

आज देशाला गांधीजींसारख्या व्यक्तिमत्त्वाच्या नेतृत्वाचा अभाव आहे. असहनशीलतेच्या नावाखाली अल्पसंख्याक आणि दलितांवर अन्याय होत आहे. अशा पद्धतीने जर समाजकंटकांनी गोरगरिबांवर अत्याचार केला तर देश अधोगतीकडे जाईल. भाजपाप्रणित सरकार हे अत्याचार रोखण्यात अपयशी ठरले आहे.

पुणे : आज देशाला गांधीजींसारख्या व्यक्तिमत्त्वाच्या नेतृत्वाचा अभाव आहे. असहनशीलतेच्या नावाखाली अल्पसंख्याक आणि दलितांवर अन्याय होत आहे. अशा पद्धतीने जर समाजकंटकांनी गोरगरिबांवर अत्याचार केला तर देश अधोगतीकडे जाईल. भाजपाप्रणित सरकार हे अत्याचार रोखण्यात अपयशी ठरले आहे. समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचे काम काही जातीयवादी शक्ती करत आहेत, त्यांचा गांधीजींच्या विचारांनीच मुकाबला केला पाहिजे, काँग्रेस ही एक चळवळ आहे आणि देशाच्या हितासाठी ती सदैव कार्यरत राहील, अशा शब्दांत देश काँग्रेसमुक्त करण्याची वल्गना करणाºया मोदी सरकारवर माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी टीकास्त्र सोडले.१९४२ च्या ‘छोडो भारत’ आंदोलनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे काँग्रेस भवन ते टिळक पुतळा महात्मा फुले मंडईपर्यंत क्रांतिज्योत यात्रा काढण्यात आली. मंडई येथे सभा घेऊन या यात्रेचा समारोप करण्यात आला. त्या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.या वेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, अभय छाजेड, कमल व्यवहारे, धनंजय दाभाडे, अजित दरेकर, बाळासाहेब दाभेकर, अविनाश बागवे, लता राजगुरू, शेखर कपोते, कमिटीचे सरचिटणीस रमेश अय्यर, सोनाली मारणे आदी विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.१९४२ च्या गांधीजींच्या चले जावच्या नाºयामुळे देशातील लाखो सत्याग्रही चळवळीमध्ये सहभागी झाले. जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलम आझाद, सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद यांनी गांधीजींना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्याची विनंती केली. त्यानुसार गांधीजींनी इंग्रजांना भारत सोडण्याचे आवाहन केले. ८ आॅगस्टच्या रात्री सर्व दिग्गज काँग्रेसच्या नेत्यांना अटक करण्यात आली आणि ९ आॅगस्ट १९४२ ला २३ वर्षीय युवती अरुणा असफ अली यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या गोवालिया टँक मैदान येथे तिरंगा फडकविण्यात आला. अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानातून देशात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित झाली आहे. लोकशाहीला संपविण्याचे काम जर कोणी करीत असेल तर १२५ कोटी जनता त्यांना कधीही माफ करणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.- श्रीपाल सबनीस,माजी अध्यक्ष, अखिल भारतीयमराठी साहित्य संमेलन