शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

काँग्रेस ही एक चळवळ; देशहितासाठी कार्यरत : श्रीपाल सबनीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 03:10 IST

आज देशाला गांधीजींसारख्या व्यक्तिमत्त्वाच्या नेतृत्वाचा अभाव आहे. असहनशीलतेच्या नावाखाली अल्पसंख्याक आणि दलितांवर अन्याय होत आहे. अशा पद्धतीने जर समाजकंटकांनी गोरगरिबांवर अत्याचार केला तर देश अधोगतीकडे जाईल. भाजपाप्रणित सरकार हे अत्याचार रोखण्यात अपयशी ठरले आहे.

पुणे : आज देशाला गांधीजींसारख्या व्यक्तिमत्त्वाच्या नेतृत्वाचा अभाव आहे. असहनशीलतेच्या नावाखाली अल्पसंख्याक आणि दलितांवर अन्याय होत आहे. अशा पद्धतीने जर समाजकंटकांनी गोरगरिबांवर अत्याचार केला तर देश अधोगतीकडे जाईल. भाजपाप्रणित सरकार हे अत्याचार रोखण्यात अपयशी ठरले आहे. समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचे काम काही जातीयवादी शक्ती करत आहेत, त्यांचा गांधीजींच्या विचारांनीच मुकाबला केला पाहिजे, काँग्रेस ही एक चळवळ आहे आणि देशाच्या हितासाठी ती सदैव कार्यरत राहील, अशा शब्दांत देश काँग्रेसमुक्त करण्याची वल्गना करणाºया मोदी सरकारवर माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी टीकास्त्र सोडले.१९४२ च्या ‘छोडो भारत’ आंदोलनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे काँग्रेस भवन ते टिळक पुतळा महात्मा फुले मंडईपर्यंत क्रांतिज्योत यात्रा काढण्यात आली. मंडई येथे सभा घेऊन या यात्रेचा समारोप करण्यात आला. त्या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.या वेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, अभय छाजेड, कमल व्यवहारे, धनंजय दाभाडे, अजित दरेकर, बाळासाहेब दाभेकर, अविनाश बागवे, लता राजगुरू, शेखर कपोते, कमिटीचे सरचिटणीस रमेश अय्यर, सोनाली मारणे आदी विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.१९४२ च्या गांधीजींच्या चले जावच्या नाºयामुळे देशातील लाखो सत्याग्रही चळवळीमध्ये सहभागी झाले. जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलम आझाद, सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद यांनी गांधीजींना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्याची विनंती केली. त्यानुसार गांधीजींनी इंग्रजांना भारत सोडण्याचे आवाहन केले. ८ आॅगस्टच्या रात्री सर्व दिग्गज काँग्रेसच्या नेत्यांना अटक करण्यात आली आणि ९ आॅगस्ट १९४२ ला २३ वर्षीय युवती अरुणा असफ अली यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या गोवालिया टँक मैदान येथे तिरंगा फडकविण्यात आला. अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानातून देशात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित झाली आहे. लोकशाहीला संपविण्याचे काम जर कोणी करीत असेल तर १२५ कोटी जनता त्यांना कधीही माफ करणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.- श्रीपाल सबनीस,माजी अध्यक्ष, अखिल भारतीयमराठी साहित्य संमेलन