शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

काँग्रेस ही एक चळवळ; देशहितासाठी कार्यरत : श्रीपाल सबनीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 03:10 IST

आज देशाला गांधीजींसारख्या व्यक्तिमत्त्वाच्या नेतृत्वाचा अभाव आहे. असहनशीलतेच्या नावाखाली अल्पसंख्याक आणि दलितांवर अन्याय होत आहे. अशा पद्धतीने जर समाजकंटकांनी गोरगरिबांवर अत्याचार केला तर देश अधोगतीकडे जाईल. भाजपाप्रणित सरकार हे अत्याचार रोखण्यात अपयशी ठरले आहे.

पुणे : आज देशाला गांधीजींसारख्या व्यक्तिमत्त्वाच्या नेतृत्वाचा अभाव आहे. असहनशीलतेच्या नावाखाली अल्पसंख्याक आणि दलितांवर अन्याय होत आहे. अशा पद्धतीने जर समाजकंटकांनी गोरगरिबांवर अत्याचार केला तर देश अधोगतीकडे जाईल. भाजपाप्रणित सरकार हे अत्याचार रोखण्यात अपयशी ठरले आहे. समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचे काम काही जातीयवादी शक्ती करत आहेत, त्यांचा गांधीजींच्या विचारांनीच मुकाबला केला पाहिजे, काँग्रेस ही एक चळवळ आहे आणि देशाच्या हितासाठी ती सदैव कार्यरत राहील, अशा शब्दांत देश काँग्रेसमुक्त करण्याची वल्गना करणाºया मोदी सरकारवर माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी टीकास्त्र सोडले.१९४२ च्या ‘छोडो भारत’ आंदोलनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे काँग्रेस भवन ते टिळक पुतळा महात्मा फुले मंडईपर्यंत क्रांतिज्योत यात्रा काढण्यात आली. मंडई येथे सभा घेऊन या यात्रेचा समारोप करण्यात आला. त्या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.या वेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, अभय छाजेड, कमल व्यवहारे, धनंजय दाभाडे, अजित दरेकर, बाळासाहेब दाभेकर, अविनाश बागवे, लता राजगुरू, शेखर कपोते, कमिटीचे सरचिटणीस रमेश अय्यर, सोनाली मारणे आदी विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.१९४२ च्या गांधीजींच्या चले जावच्या नाºयामुळे देशातील लाखो सत्याग्रही चळवळीमध्ये सहभागी झाले. जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलम आझाद, सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद यांनी गांधीजींना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्याची विनंती केली. त्यानुसार गांधीजींनी इंग्रजांना भारत सोडण्याचे आवाहन केले. ८ आॅगस्टच्या रात्री सर्व दिग्गज काँग्रेसच्या नेत्यांना अटक करण्यात आली आणि ९ आॅगस्ट १९४२ ला २३ वर्षीय युवती अरुणा असफ अली यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या गोवालिया टँक मैदान येथे तिरंगा फडकविण्यात आला. अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानातून देशात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित झाली आहे. लोकशाहीला संपविण्याचे काम जर कोणी करीत असेल तर १२५ कोटी जनता त्यांना कधीही माफ करणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.- श्रीपाल सबनीस,माजी अध्यक्ष, अखिल भारतीयमराठी साहित्य संमेलन