शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अभिनंदन, चिमटे व ओरखडेही

By admin | Updated: March 16, 2017 02:07 IST

अभिनंदनाबरोबरच चिमटे, स्वागताबरोबरच थोडे ओरखडे व तुमच्याबरोबरच राहू असे सांगतानाच ‘चुका कराल तर धारेवरही धरू’ असा इशाराही.

पुणे : अभिनंदनाबरोबरच चिमटे, स्वागताबरोबरच थोडे ओरखडे व तुमच्याबरोबरच राहू असे सांगतानाच ‘चुका कराल तर धारेवरही धरू’ असा इशाराही... महापौर मुक्ता टिळक व उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या अभिनंदनाची पहिलीच सभा बुधवारी दुपारी अशी रंगली. मतदानाच्या वेळखाऊ प्रक्रियेने कंटाळलेल्या नव्या सदस्यांच्या चेहऱ्यावर जुन्या सदस्यांच्या या शाब्दिक आतषबाजीने चांगलेच हास्य फुलविले.राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी तर त्यांच्या स्वागतपर भाषणात फुलबाज्यांबरोबरच काही राजकीय लंवगी फटाकेही लावले. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी त्यांना चांगले प्रत्युत्तर दिले. मावळते महापौर प्रशांत जगताप यांनी नव्या महापौर मुक्ता टिळक यांना अनुभवी सल्ल्याबरोबरच काही धडेही दिले. टिळक यांनीही त्यांना ‘मागच्या पंचवार्षिकमध्ये मी समोर असताना काय चालायचे ते पाहिले आहे’ असे म्हणत आहेर परतावणी केली. उपमहापौर नवनाथ कांबळे यांनी ‘पुण्याच्या विकासासाठी आपण सगळे एकत्र राहू’ अशी ग्वाही दिली.चेतन तुपे म्हणाले, ‘‘भाजपाला सत्ता मिळाली, तुम्ही महापौर झालात याचा आनंद आहे, पण महापालिकेत आज विनापरवाना फ्लेक्स लावले, इमारतीवर विद्युत रोषणाई केली, रांगोळी खराब होईल, म्हणून सुरक्षारक्षक आमची गाडी आत सोडेनात, हा काय प्रकार आहे, हे योग्य नाही. महापालिकेची मालकी तुमच्याकडे आलेली नाही. कारभारी बदलला आहे. मुंबईत तुम्ही शिवसेनेला आम्ही पहारेकरी राहू, असे बजावले आहे. मी तसे सांगणार नाही, तुमच्याबरोबरच राहू, पण अयोग्य करत असाल तर ते सांगण्याची खबरदारीही घेऊ. उपमहापौर नवनाथ कांबळे चळवळीतील आहेत. त्यांच्या गटाला वेगळी मान्यता देण्यास नकार मिळाला म्हणून ते आता भाजपाचेच आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला हे चालणार आहे का, याचा त्यांनी विचार करावा.’’अरविंद शिंदे म्हणाले, ‘‘विरोधी पक्षात असताना तुम्ही ‘कामकाजात पारदर्शकता हवी’, ‘ते काम असे व्हायला हवे होते’, ‘या कामात ही त्रुटी आहे’ म्हणून भाषणे करीत होता. आम्ही सत्तेत होतो व ऐकत होतो. आता तुम्ही सत्तेत आहात. तुमचे शब्द तुम्हीच लक्षात ठेवून कारभार केला पाहिजे, नाही केला तर आम्ही बोलणार. ते तुम्हाला ऐकावे लागेल व कामकाजात सुधारणाही करावी लागेल. रिपाइंला बरोबर घेतले आहे, त्यांच्या मतांवरच तुमची सत्ता आली आहे, हेही लक्षात घ्या. नवनाथ कांबळे यांना उपमहापौरपद कोणत्या जातीमुळे नाही तर त्यांच्या कर्तृत्वामुळे मिळाले आहे, अशा शब्दात त्यांनी त्यांचा गौरव केला. मावळते महापौर जगताप म्हणाले, केंद्रात, राज्यात सत्ता आहे, पण महापालिकेत नाही, असे तुम्ही सांगत होता. आता इथेही तुमची सत्ता आहे. त्यामुळे आता तुम्हाला कोणताही बहाणा करता येणार नाही. महापौर कोणत्याही पक्षाचा नसतो. याच विचाराने मी कामकाज केले. तुम्हीही तसेच करायला हवे. बहुमताच्या जोरावर पुणेकरांना अहितकारक असा कोणताही निर्णय घेतला गेला तर आम्ही सभागृहात व सभागृहाबाहेरही तुमचा विरोध करू.दीपक मानकर यांनी सन २००७ मध्ये टिळक यांनी महापौरपदाची निवडणूक लढवली व त्यात त्यांचा पराभव झाला, असे सांगत त्याचवेळी मी ‘तुम्ही महापौर व्हा, एक भाऊ म्हणून तुमची पाठराखण करू’ असा शब्द दिला होता याचे स्मरण दिले. माधुरी सहस्रबुद्धे, अविनाश बागवे, मुरली मोहोळ, नाना भानगिरे, मंगला मंत्री, चंचला कोद्रे, हेमंत रासने, विशाल धनवडे, वैशाली बनकर, सुनील कांबळे, वसंत मोरे, धीरज घाटे, रेश्मा भोसले, डॉ. सिद्धार्थ धेंडे आदींची टिळक व कांबळे यांचा गौरव करणारी भाषणे झाली.सभागृह नेते भीमाले म्हणाले, अभिनंदनाच्या भाषणात राजकारण आणू नये, असा संकेत आहे, मात्र सहकारी मित्रांनी तो आणला. हरकत नाही. आमचा विचार पुण्याचा विकास व तोही सर्वांना बरोबर घेऊन करण्याचाच आहे. पारदर्शीपणे कामकाज करण्यालाच प्राधान्य दिले जाईल. पुणेकरांच्या हिताचेच काम केले जाईल. उपमहापौर नवनाथ कांबळे यांनी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. एकत्र राहू व एकत्रच काम करू, शहराच्या विकासाआड काहीही येऊ देणार नाही, असे ते म्हणाले.उत्तरादाखल केलेल्या भाषणात मुक्ता टिळक यांनी लोकमान्य टिळक यांच्या वारशाचा अभिमानाने उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून पक्षाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचे आभार व्यक्त करीत त्यांनी गोपीनाथ मुंडे यांचेही स्मरण केले. अभिनंदनाच्या भाषणांनाही विरोधाची किनार होती, पण ते पुण्याचे वैशिष्ट्यच आहे, असे स्पष्ट करून त्या म्हणाल्या, ‘‘भाजपाचा महापौर ही पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी पिढ्यान्पिढ्या केलेल्या परिश्रमाचे फळ आहे, याची जाणीव कायम असेल. विकासासाठी निधी लागतो. तो मिळवताना काही कठोर निणर्य घ्यावे लागतील, कडू औषधानेच रोग बरा होतो.’’ पर्यावरण विषयक उपक्रम दरमहा राबविण्याचा विचार आहे. सार्वजनिक वाहतूक सुधारणा, महिला सुरक्षा यालाही प्राधान्य देऊ, असे टिळक म्हणाल्या. (प्रतिनिधी)