शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

काँग्रेस, राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची लढाई

By admin | Updated: February 13, 2017 01:28 IST

तालुक्यातील तीनपैकी उत्रौली-कारी हा एकमेव गट सर्वसाधारण असून, निवडणुकीत मोठ्या प्रमाणात चुरस वाढली आहे. राष्ट्रवादीचा

भोर : तालुक्यातील तीनपैकी उत्रौली-कारी हा एकमेव गट सर्वसाधारण असून, निवडणुकीत मोठ्या प्रमाणात चुरस वाढली आहे. राष्ट्रवादीचा एक अपवाद वगळता हा गट काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला असून, तो पुन्हा ताब्यात ठेवण्यासाठी काँॅग्रेस, तर गट आपल्याकडे घेण्यासाठी राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. काँग्रेसकडून आनंदराव आंबवले, तर राष्ट्रवादीकडून रणजित शिवतरे उमेदवार असले, तरी आमदार संग्राम थोपटेंविरुद्ध जिल्हा परिषदेचे माजी सभापती रणजित शिवतरे यांच्या प्रतिष्ठेची ही लढाई आहे. निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.पूर्वीचा कारी-खानापूर हा गट रद्द होऊन नव्याने उत्रौली-कारी गट तयार करण्यात आला आहे. पूर्वीचा कारी-खानापूर हा संपूर्ण गट शिवाय रायरी गणातील महाड-पंढरपूररोडवरील २५ गावांचा नव्याने समावेश करून सर्वाधिक ८१ गावांचा मिळून गट तयार केला आहे. सुमारे ५४, ८०२ लोकसंख्या आहे. पूर्वीच्या कारी-खानापूर गटावर २००७ सालचा एक अपवाद वगळता काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र गटाच्या फेररचनेत या गटात नव्याने उत्रौली, वडगावडाळ आणि पूर्वीच्या रायरी गणातील २५ गावांचा समावेश करण्यात आल्याने निवडणुकीची बरीच समीकरणे बदलली आहेत. काँॅग्रेसबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत, तर हा गट १० वर्षांनंतर सर्वसाधारण(खुला) झाला आहे. काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्या गीतांजली आंबवले यांचे पती आनंदराव आंबवले, राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेचे माजी सभापती रणजित शिवतरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळालेले राोहिदास जेधे यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेतला आहे. तर, भाजपाकडून सुरेश वाडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चौरंगी लढत दिसत असली, तरी खरी लढत काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी, अशीच होणार आहे. उत्रौली पंचायत समिती गण नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी राखीव झाला आहे. काँग्रेसकडून अनिल सावले, राष्ट्रवादीकडून श्रीधर किंद्रे, भाजपाकडून अमर बुदगुडे, तर शिवसेनेने शिवाजी बांदल यांना उमेदवारी दिली आहे. कारी गण हा नागरिकांचा मागासप्रवर्ग महिलेसाठी राखीव झाला असून, काँग्रेसकडून रुक्मिणी घोलप, राष्ट्रवादीकडून दमयंती जाधव, तर शिवसेनेने ज्योती बर्डे, भाजपाकडून अलका कंक निवडणुकीच्या रिंगणात आहेत.