शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

राज्यांच्या कोरोना चाचणीवरून गोंधळ, प्रवाशांची भूमिका ‘वेट अँड वॉच’ची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:08 IST

लसीचे दोन्ही डोस घेतल्यावरही कोरोनाची लक्षणेविरहित लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चाचणीचा नियम कायम ठेवावा, असे वैैद्यकतज्ज्ञांचे ...

लसीचे दोन्ही डोस घेतल्यावरही कोरोनाची लक्षणेविरहित लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चाचणीचा नियम कायम ठेवावा, असे वैैद्यकतज्ज्ञांचे म्हणणे आहे. रुग्णसंख्या कमी झाली असली तरी कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण प्रवास टाळावा, असे आवाहन वैद्यकीय यंत्रणेकडून केले जात आहे. मात्र, अनेकांना परराज्यात, परदेशात जाण्याशिवाय पर्याय नाही. अशा वेळी लसीचे दोन्ही डोस झाले असतील तर कोणत्या राज्यांमध्ये कोरोना चाचणी बंधनकारक आहे, कोणत्या राज्यांमध्ये नाही, याबाबत पुरेशी स्पष्टता नाही.

लसीचे दोन्ही डोस झालेल्या नागरिकांना क्वारंटाइन आणि आरटीपीसीआर चाचणीच्या नियमांमधून सूट मिळावी, अशी मागणी आहे. नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोव्हिड आणि नॅशनल टेक्निकल अ‍ॅडव्हायझरी ग्रुप ऑफ इम्युनायझेशन इन इंडिया यांनी या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला प्रस्ताव पाठवला आहे.

चौकट

क्वारंटाइन नको पण

“दुसऱ्या राज्यात प्रवेश करताना क्वारंटाइन होणे गरजेचे नाही. मात्र, लस घेतलेल्या आणि न घेतलेल्या सर्वांनाच कोरोना चाचणी बंधनकारक ठेवणे गरजेचे आहे. कारण, लसीकरणानंतरही कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लक्षणेविरहित रुग्ण असेल तरी त्याच्याकडून इतरांना संक्रमणाचा धोका असतोच. त्यामुळे कोरोना चाचणी आणि मास्कचा वापर बंधनकारक हवा. परदेशवारीचे नियोजन करताना कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतलेले असतील तर कमीत कमी अडचणी येतील.”

- डॉ. अमित द्रविड, विषाणूजन्य आजारांचे तज्ज्ञ

चौकट

“शिक्षण, नोकरीसाठी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी ऑथोरिटी लेटर आणि पासपोर्टची कॉपी दिल्यास त्यांना २८ दिवसांनी लसीचा दुसरा डोस दिला जातो. दोन्ही डोस घेतलेले असतील तर क्वारंटाइन होण्याची गरज नसते.”

- डॉ. संजय देशमुख, उपसंचालक, आरोग्य विभाग

चौकट

“हिमाचल, जम्मू काश्मीर, हरियाणा यांसारख्या राज्यांनी चाचणी बंधनकारक असल्याचा नियम शिथिल केला आहे. काही राज्यांमध्ये तो नियम कायम आहे. सर्वत्र वेगवेगळे नियम असल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम आहे. दुसऱ्या राज्यात गेल्यावर नवीन नियम समजल्यास त्याची पूर्तता करण्यासाठी ऐनवेळी धावपळ करावी लागते. त्यामुळे सर्व राज्यांसाठी एकच नियम लागू करावा, अशी मागणी आम्ही संस्थेतर्फे केली आहे.”

- डॉ. विश्वास केळकर, माजी अध्यक्ष, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया, पुणे.