शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यांच्या कोरोना चाचणीवरून गोंधळ, प्रवाशांची भूमिका ‘वेट अँड वॉच’ची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:08 IST

लसीचे दोन्ही डोस घेतल्यावरही कोरोनाची लक्षणेविरहित लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चाचणीचा नियम कायम ठेवावा, असे वैैद्यकतज्ज्ञांचे ...

लसीचे दोन्ही डोस घेतल्यावरही कोरोनाची लक्षणेविरहित लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चाचणीचा नियम कायम ठेवावा, असे वैैद्यकतज्ज्ञांचे म्हणणे आहे. रुग्णसंख्या कमी झाली असली तरी कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण प्रवास टाळावा, असे आवाहन वैद्यकीय यंत्रणेकडून केले जात आहे. मात्र, अनेकांना परराज्यात, परदेशात जाण्याशिवाय पर्याय नाही. अशा वेळी लसीचे दोन्ही डोस झाले असतील तर कोणत्या राज्यांमध्ये कोरोना चाचणी बंधनकारक आहे, कोणत्या राज्यांमध्ये नाही, याबाबत पुरेशी स्पष्टता नाही.

लसीचे दोन्ही डोस झालेल्या नागरिकांना क्वारंटाइन आणि आरटीपीसीआर चाचणीच्या नियमांमधून सूट मिळावी, अशी मागणी आहे. नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोव्हिड आणि नॅशनल टेक्निकल अ‍ॅडव्हायझरी ग्रुप ऑफ इम्युनायझेशन इन इंडिया यांनी या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला प्रस्ताव पाठवला आहे.

चौकट

क्वारंटाइन नको पण

“दुसऱ्या राज्यात प्रवेश करताना क्वारंटाइन होणे गरजेचे नाही. मात्र, लस घेतलेल्या आणि न घेतलेल्या सर्वांनाच कोरोना चाचणी बंधनकारक ठेवणे गरजेचे आहे. कारण, लसीकरणानंतरही कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लक्षणेविरहित रुग्ण असेल तरी त्याच्याकडून इतरांना संक्रमणाचा धोका असतोच. त्यामुळे कोरोना चाचणी आणि मास्कचा वापर बंधनकारक हवा. परदेशवारीचे नियोजन करताना कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतलेले असतील तर कमीत कमी अडचणी येतील.”

- डॉ. अमित द्रविड, विषाणूजन्य आजारांचे तज्ज्ञ

चौकट

“शिक्षण, नोकरीसाठी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी ऑथोरिटी लेटर आणि पासपोर्टची कॉपी दिल्यास त्यांना २८ दिवसांनी लसीचा दुसरा डोस दिला जातो. दोन्ही डोस घेतलेले असतील तर क्वारंटाइन होण्याची गरज नसते.”

- डॉ. संजय देशमुख, उपसंचालक, आरोग्य विभाग

चौकट

“हिमाचल, जम्मू काश्मीर, हरियाणा यांसारख्या राज्यांनी चाचणी बंधनकारक असल्याचा नियम शिथिल केला आहे. काही राज्यांमध्ये तो नियम कायम आहे. सर्वत्र वेगवेगळे नियम असल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम आहे. दुसऱ्या राज्यात गेल्यावर नवीन नियम समजल्यास त्याची पूर्तता करण्यासाठी ऐनवेळी धावपळ करावी लागते. त्यामुळे सर्व राज्यांसाठी एकच नियम लागू करावा, अशी मागणी आम्ही संस्थेतर्फे केली आहे.”

- डॉ. विश्वास केळकर, माजी अध्यक्ष, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया, पुणे.