शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

एमपीएससीच्या सदस्य भरतीतही संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:13 IST

एमपीएससीच्या सदस्य नियुक्तीचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार तीन सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर राज्य ...

एमपीएससीच्या सदस्य नियुक्तीचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार तीन सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर राज्य सरकारने याबाबत आदेश दिले. मात्र, या पदांसाठी अर्ज करण्यासाठी ३१ आॅगस्टपर्यंत म्हणजे केवळ दहा दिवसांची मुदत दिल्याने इच्छुकांमध्ये नाराजी आहे.--------------------------------

महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्वायत्त असला तरी या आयोगाला मागील दोन वर्षांपासून राज्य सरकारने पुरेसे सदस्यच पुरवलेले नाहीत. एक सचिव आणि पाच सदस्य अशी या आयोगाची रचना असताना दोन वर्षांपासून सचिव आणि एकच सदस्य अशा दोनच व्यक्ती आयोगाचे काम पाहत आहेत. आयोगाने तब्बल चार सदस्यांच्या जागा भरलेल्याच नाहीत. त्यामुळे तीन नवीन सदस्यांच्या नियुक्तीनंतर आता आयोगावर एकूण पाच सदस्य असतील. मात्र, तरीही पुढील काळात दोन सदस्य निवृत्त होत असल्यामुळे एमपीएससीची समस्या कायमच राहणार आहे.

आयोगाच्या रखडलेल्या भरतीप्रक्रियेमुळे प्रवीण लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत ३१ जुलैपर्यंत सदस्य नियुक्तीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर ५ ऑगस्टला तीन सदस्यांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले. यामध्ये डॉ. देवानंद शिंदे, डॉ. प्रताप दिघावकर, राजीव जाधव यांचा समावेश आहे. आयोगाचे अध्यक्ष डॉ. सतीश गवई हे ऑगस्टअखेरीस निवृत्त होणार आहेत. तर, दुसरे सदस्य दयावान मेश्राम हे नोव्हेंबरमध्ये निवृत्त होणार आहेत. त्यामुळे आयोगातील दोन सदस्य आणि अध्यक्षांच्या जागा भरल्या जाणार आहेत. मात्र, हे करताना उमेदवारांना केवळ दहा दिवसांचा अवधी दिला आहे. सध्या तिघांची नियुक्ती केल्यानंतर डाॅ. गवई आणि मेश्राम हे निवृत्त होणार आहेत. त्यामुळे आयोगात अध्यक्ष आणि दोन सदस्यच उरणार आहेत. त्यामुळे आयोगातील एक सचिव व पाच सदस्य ही रचना विस्कळीतच राहणार आहे.

भरतीसाठी ३१ आॅगस्टपर्यंत अर्ज करण्यास मुदत दिली आहे. इतक्या कमी कालावधीमध्ये गोपनीय अहवाल, अनुभव पत्र आणि इतर कागदपत्रांची जुळवाजुळव करणे इच्छुकांना कठीण होणार आहे. याआधी सदस्य नियुक्तीच्या दोनदा देण्यात आलेल्या जाहिरातींमध्ये किमान महिन्याभराचा अवधी देण्यात आला होता. अर्ज प्रक्रिया केवळ नाममात्र असून मर्जीतील व्यक्तींची नावे आधीच अंतिम झाल्याचा आरोप केला जात आहे.

सदस्य आणि अध्यक्ष पदासाठी सनदी अधिकारी, विद्यापीठांचे माजी कुलगुरू, शिक्षण संस्थांमधील प्रोफेसर, संचालक अर्जदार असतात. सनदी अधिकाऱ्यांचा गोपनीय अहवाल हा शासनाकडे असतो. त्यामुळे तो मागवणे, तपासणे आणि नंतर अर्जासोबत जोडण्याच्या प्रक्रियेलाच किमान पंधरा दिवसांचा अवधी लागतो. या अडचणींची जाणीव असतानाही जाणीवपूर्वक अर्ज करण्यासाठी कमी अवधी देण्यात आल्याचा आरोप होत आहे.

एमपीएससीची सदस्य संख्या कमी असल्यामुळे उमेदवार भरतीसाठी तातडीने निर्णय होत नव्हते. त्यामुळे सदस्य भरतीसाठी विद्यार्थ्यांनी आग्रही मागणी केली होती. सरकारने तातडीने सदस्य भरतीचे काम मार्गी लावले असले तरी रिक्त पदभरतीला वेग येईल का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. कारण लवकरच दोन सदस्य निवृत्त होत असताना त्याचा विचार या सदस्य भरतीत का करण्यात आला नाही, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

सध्याचा सदस्य भरतीचा प्रश्न झटपट मार्गी लावून एमपीएससीने तातडीने उमेदवारांच्या नियुक्तीचा, परीक्षेचा प्रश्न मार्गी लावला तरच एमपीएससीचा तिढा सुटण्यास मदत होईल. अन्यथा निर्णय प्रक्रिया गुंतागुंतीची होत गेल्यास राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागणार आहे. अगोदरच अनेक वर्षांपासून राज्यातील विद्यार्थ्यांना एमपीएससीच्या अनियमिततेचा फटका बसला आहे. त्यामुळे एमपीएससीने संभ्रमावस्था दूर करून विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे.

- उमेश जाधव