शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कर्जमाफी मिळेपर्यंत संघर्ष सुरूच

By admin | Updated: March 31, 2017 23:55 IST

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणं हे केंद्र व राज्य सरकारला शक्य आहे. मात्र सरकार घोषणा करीत नसल्याने

बावडा : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणं हे केंद्र व राज्य सरकारला शक्य आहे. मात्र सरकार घोषणा करीत नसल्याने कर्जमाफीसाठी संघर्ष करावाच लागणार आहे. कर्जमाफी जाहीर होईपर्यंत सरकारविरोधात संघर्ष सुरूच राहील, असा इशारा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे मंगळवारी (दि. २८) सभेत बोलताना दिला आहे. बावडा ग्रामपंचायतीच्या वतीने सुमारे १६.५० लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांची भूमिपूजने हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सुमारे ४० हजार कोटी रुपये लागतील. राज्य सरकारविरोधात संघर्ष करून कर्जमाफी जाहीर करण्यास सत्ताधाऱ्यांना भाग पाडू, असा आत्मविश्वासही हर्षवर्धन पाटील यांनी बोलून दाखविला. या वेळी गावातील आंबेडकर चौक ते काळेश्वर मंदिर व हनुमाननगर येथे रस्ता काँक्रिटीकरण व भैरवनाथ मंदिर घोडे ठेवणेसाठी सभामंडप बांधणे या कामांचे भूमिपूजन हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते करण्यात आले. प्रारंभी बावडा ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या रत्नप्रभादेवी पाटील व पंचायत समितीच्या सदस्या रोहिणीताई घोगरे यांचा सत्कार सरपंच निरूपमा शिंदे, उपसरपंच अमोल घोगरे यांनी केला.पाटील म्हणाले, कर्जमाफीसाठी चंद्रपूर ते पनवेल अशी संघर्ष यात्रा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर विरोधी पक्षांच्या वतीने निघत आहे. या संघर्ष यात्रेचा शुभारंभ बुधवारपासून (दि. २९) होत आहे. या कार्यक्रमास मी उपस्थित राहणारआहे. या वेळी प्रशांत पाटील, उदयसिंह पाटील, श्रीमंत ढोले यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच निरुपमा शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सभेच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. आनंदराव पाटील हे होते. अमर निलाखे यांनी सूत्रसंचालन केले. तर चाँद सय्यद यांनी आभार मानले.संपूर्ण बावडा गाव १०० टक्के निर्मलग्राम झाले आहे. गाव निर्मलग्रामसाठी प्रयत्न करणारे ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थ यांनी झटून चांगले काम केले. शौचालयांच्या १०० टक्के वापरासाठी आगामी काळात सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहनही हर्षवर्धन पाटील यांनी केले.या कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते गाव निर्मलग्रामसाठी प्रयत्न करणारे भगवान घोगरे, अंबिका पावसे, योगेश जगताप, बाळासाहेब जाधव, उत्तम मोहिते यांचा सत्कार करण्यात आला. इंदापूर तालुक्यातील नीरा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये दोन्ही कालव्यांतून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी जलसंपदा विभागाचे अधिकाऱ्यांशी भेटून आम्ही केली आहे. शेटफळ तलावाचे पाणी हे शेतकऱ्यांना बंद पाईपलाईनने देणेकरिता जलसंपदा विभागाने वनगळी येथील एस. बी. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजला डिझाईन व प्रकल्प अहवाल तयार करण्यास सांगितले आहे. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प असणार आहे. बंद पाइपलाइनमुळे शेतकऱ्यांना जादा आर्वतने मिळतील, - हर्षवर्धन पाटील