शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

कर्जमाफी मिळेपर्यंत संघर्ष सुरूच

By admin | Updated: March 31, 2017 23:55 IST

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणं हे केंद्र व राज्य सरकारला शक्य आहे. मात्र सरकार घोषणा करीत नसल्याने

बावडा : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणं हे केंद्र व राज्य सरकारला शक्य आहे. मात्र सरकार घोषणा करीत नसल्याने कर्जमाफीसाठी संघर्ष करावाच लागणार आहे. कर्जमाफी जाहीर होईपर्यंत सरकारविरोधात संघर्ष सुरूच राहील, असा इशारा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे मंगळवारी (दि. २८) सभेत बोलताना दिला आहे. बावडा ग्रामपंचायतीच्या वतीने सुमारे १६.५० लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांची भूमिपूजने हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सुमारे ४० हजार कोटी रुपये लागतील. राज्य सरकारविरोधात संघर्ष करून कर्जमाफी जाहीर करण्यास सत्ताधाऱ्यांना भाग पाडू, असा आत्मविश्वासही हर्षवर्धन पाटील यांनी बोलून दाखविला. या वेळी गावातील आंबेडकर चौक ते काळेश्वर मंदिर व हनुमाननगर येथे रस्ता काँक्रिटीकरण व भैरवनाथ मंदिर घोडे ठेवणेसाठी सभामंडप बांधणे या कामांचे भूमिपूजन हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते करण्यात आले. प्रारंभी बावडा ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या रत्नप्रभादेवी पाटील व पंचायत समितीच्या सदस्या रोहिणीताई घोगरे यांचा सत्कार सरपंच निरूपमा शिंदे, उपसरपंच अमोल घोगरे यांनी केला.पाटील म्हणाले, कर्जमाफीसाठी चंद्रपूर ते पनवेल अशी संघर्ष यात्रा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर विरोधी पक्षांच्या वतीने निघत आहे. या संघर्ष यात्रेचा शुभारंभ बुधवारपासून (दि. २९) होत आहे. या कार्यक्रमास मी उपस्थित राहणारआहे. या वेळी प्रशांत पाटील, उदयसिंह पाटील, श्रीमंत ढोले यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच निरुपमा शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सभेच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. आनंदराव पाटील हे होते. अमर निलाखे यांनी सूत्रसंचालन केले. तर चाँद सय्यद यांनी आभार मानले.संपूर्ण बावडा गाव १०० टक्के निर्मलग्राम झाले आहे. गाव निर्मलग्रामसाठी प्रयत्न करणारे ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थ यांनी झटून चांगले काम केले. शौचालयांच्या १०० टक्के वापरासाठी आगामी काळात सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहनही हर्षवर्धन पाटील यांनी केले.या कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते गाव निर्मलग्रामसाठी प्रयत्न करणारे भगवान घोगरे, अंबिका पावसे, योगेश जगताप, बाळासाहेब जाधव, उत्तम मोहिते यांचा सत्कार करण्यात आला. इंदापूर तालुक्यातील नीरा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये दोन्ही कालव्यांतून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी जलसंपदा विभागाचे अधिकाऱ्यांशी भेटून आम्ही केली आहे. शेटफळ तलावाचे पाणी हे शेतकऱ्यांना बंद पाईपलाईनने देणेकरिता जलसंपदा विभागाने वनगळी येथील एस. बी. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजला डिझाईन व प्रकल्प अहवाल तयार करण्यास सांगितले आहे. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प असणार आहे. बंद पाइपलाइनमुळे शेतकऱ्यांना जादा आर्वतने मिळतील, - हर्षवर्धन पाटील