शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

दोन कारखान्यांवर जप्ती

By admin | Updated: January 23, 2016 02:32 IST

आदेश देऊनही गेल्यावर्षीची थकीत एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना न दिल्याने राज्यातील दोन साखर कारखान्यांवर जप्तीचे आदेश साखर आयुक्त

पुणे : आदेश देऊनही गेल्यावर्षीची थकीत एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना न दिल्याने राज्यातील दोन साखर कारखान्यांवर जप्तीचे आदेश साखर आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले आहेत. सोलापूरमधील स्वामी समर्थ कारखाना आणि बीडमधील जय भवानी कारखान्यावर ही जप्ती आणली गेली आहे. या दोन्ही कारखान्यांनी यंदाचा गाळप हंगाम सुरू केलेला नाही.गेल्या वर्षी २०१४-१५ या वर्षात राज्यातील ज्या साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही, अशा कारखान्यांवर कडक कारवाईचे सुतोवाच आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार यंदा गाळीप हंगाम सुरू न केलेल्या पण गेल्या वर्षीची एफआरपी थकवलेल्या कारखान्यांना ही रक्कम ठराविक काळात भरण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र त्या कालावधीत रक्कम न भरल्याने त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार सोलापूरमधील स्वामी समर्थ कारखाना आणि बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील जय भवानी कारखान्यांवर जप्तीचे आदेश आयुक्तांनी दिले.स्वामी समर्थ कारखान्याकडे ९ कोटी ७ लाख रुपयांची थकबाकी आहे तर जय भवानी कारखान्याकडे ४ कोटी ७१ लाख रुपयांची थकबाकी आहे. या संदर्भातील आदेश आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे रवाना केले आहेत. हे आदेश मिळाल्यानंतर त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या कारखान्यांकडील साखर आणि इतर मालमत्ता यांचा जाहीर लिलाव करून त्यातून मिळणारे थकबाकीचे पैसे संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतील, अशी माहिती सहायक संचालक शरीफ शेख यांनी दिली.या दोन कारखान्यांबरोबर आणखी पाच कारखान्यांवरही जप्तीची टांगती तलवार आहे. यामध्ये परभणीतील रत्नप्रभा कारखाना, उस्मानाबादमधील भीमाशंकर कारखाना, नांदेडमधील भाऊराव चव्हाण कारखाना, नाशिकमधील के. के. वाघ कारखाना आणि यवतमाळमधील वसंत पुसद कारखान्याचा समावेश आहे.रत्नप्रभा, भीमाशंकर व भाऊराव चव्हाण या कारखान्यांची या संदर्भातील शेवटची सुनावणी २८ जानेवारीला होणार आहे. तर के. के. वाघ कारखान्याची अंतिम सुनावणी ३० जानेवारी आणि वसंत पुसद कारखान्याची अंतिम सुनावणी ८ फेब्रुवारीला होणार आहे. तोपर्यंत ही थकबाकी न भरल्यास त्यांच्यावरही जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. या सर्व कारखान्यांनी या हंगामात गाळप सुरू केलेले नाही. (प्रतिनिधी)