शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
5
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
6
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
7
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
8
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
9
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
10
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
11
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
12
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
13
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
14
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
15
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
17
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
18
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
19
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"

महाविकास आघाडीच्या कार्यकाळात शेतकऱ्यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:08 IST

भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश आयोजित राज्यव्यापी शेतकरी संवाद अभियानाचा शुभारंभ मंचर येथील जीवन मंगल कार्यालयात करण्यात आला. त्यावेळी ...

भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश आयोजित राज्यव्यापी शेतकरी संवाद अभियानाचा शुभारंभ मंचर येथील जीवन मंगल कार्यालयात करण्यात आला. त्यावेळी काळे बोलत होते. या वेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय थोरात, संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे, धर्मेंद्र खांडरे, तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, संदीप बाणखेले, अनिल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. शेतकऱ्यांना ८४ हजार कोटी रुपयांचे अनुदान दिले. १४ हजार कोटी नवीन अनुदान खतासाठी दोन दिवसांपूर्वी दिले. भारतीय जनता पक्षाची ताकद महाराष्ट्रात वाढायला लागली. भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर निघाल्याने १२ आमदारांना निलंबित केले.

किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय थोरात म्हणाले की, बटाटा पीक विमा योजनेत समाविष्ट करण्यासाठी भाजपचे किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी कृषी आयुक्तांना पत्र दिले आहे. सन २०२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८७ हजार मेट्रिक टन कांदा निर्यात केला. त्याचे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच शेतकऱ्यांना अच्छे दिन आणू शकतात. परंतु विरोधक विनाकारण केंद्र सरकारच्या विरोधात भडकवण्याचे काम करत आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, धर्मेंद्र खांडरे यांची मनोगते झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा थिगळे यांनी, तर आभार डॉ. ताराचंद कराळे यांनी मानले.