शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

भोरच्या मुख्याधिकारी बंगल्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:10 IST

भोर: येथील नगरपलिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसाठी असलेल्या बंगल्याची वापराविना दुरवस्था झाली आहे. बंगल्याची दारे खिडक्या खराब झाले आहेत. गेल्या दहा वर्षापासून ...

भोर: येथील नगरपलिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसाठी असलेल्या बंगल्याची वापराविना दुरवस्था झाली आहे. बंगल्याची दारे खिडक्या खराब झाले आहेत. गेल्या दहा वर्षापासून या बंगला कोणीही वास्तव्य करत नसल्याने हा बंगला तळीरामांचा अड्डा बनला आहे. त्यामुळे या बंगल्याची दुरुस्ती करून संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

भोर नगरपालिकेने मुख्याधिकाऱ्यांना राहण्यासाठी २५ ते ३० वर्षापूर्वी शंकरहिल येथे बंगला बांधण्यात आला होता. तत्कालीन मुख्याधिकारी दीपक झिंजाड, मारुती गायकवाड यांच्या कार्यकाळापर्यंत या बंगल्याचा वापर करण्यात येत होता. परंतु, गेल्या दहा वर्षांपासून या बंगाल्यामध्ये कोणीही राहत नाही. त्यामुळे बंगल्याची दारे, खिडक्यांची मोडतोड झाली आहे. छप्पर तसेच संरक्षक भिंतही खराब झाली आहे. बंगल्यात कोणीच नसल्याने मोकाट जनावरेही या ठिकाणी आढळतात.

बंगल्यात वास्तव्यास कोण नसल्याने रात्रीच्या वेळी या ठिकाणी तळीरामांची मैफल सजलेली दिसते. या ठिकाणी पाणी फिल्टर प्लँट असून पाण्याच्या टाक्यात आहेत. असे असताना नगरपालिकेने एक संरक्षक भिंत या ठिकाणी बांधण्याची तसदी घेतली नाही. वा काणेतीही सुरक्षा यंत्रणा तेथे अस्तित्वात नाही. रात्री अपरात्री कोणीही या ठिकाणी येऊन पाणी पुरवठ्याच्या व्यवस्थेत बाधा आणू शकतात. या ठिकाणी बाग होती. मात्र, त्यामध्ये सुधारणा न करता बागच पालिकेने काढून टाकली आहे. एकूणच केवळ पालिकेच्या दुर्लक्षामुळे या बंगाल्याची दुरवस्था झाली असून याकडे कोणालाही लक्ष देण्यास वेळ नाही. दरम्यान, या बंगल्याची दुरुस्ती करावी तसेच संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

१४ भाेर नगरपालिका

भोर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसाठी राहणाऱ्या बंगल्याची झालेली दुरवस्था.