शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

विवाह समारंभातील उपस्थितीची अट कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:12 IST

नीरा : देशभरात करोनाच्या संसर्गाने मोठा उच्छाद मांडला आहे. त्यातही महाराष्ट्र आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा मोठा आहे. ...

नीरा : देशभरात करोनाच्या संसर्गाने मोठा उच्छाद मांडला आहे. त्यातही महाराष्ट्र आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा मोठा आहे. कोरोना मृत्यूचा दरही देशाच्या सरासरीपेक्षा जादा आहे. त्यामुळे राज्य सरकारने सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध लावले आहेत. यामध्येच विवाह सोहळे हे २०० लोकांमध्ये पार पडावेत, अशी अट शासनाने घातलेली होती. त्यामध्ये बदल करत, आता पुन्हा ५० लोकांमध्ये केली. मात्र, शासनाची ही अट धुडकावत जिल्ह्यात शेकडो लोकांच्या उपस्थित विवाह सोहळे साजरे होत आहेत. प्रशासनाकडून मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.

राज्यामध्ये आणि त्यातही मुंबई, पुणे या भागात करोनाचा प्रसार मोठा आहे. शासनाने कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या. मात्र, त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. पुणे जिल्ह्यात त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. अनेकांकडून आता टाळेबंदीला विरोध होत आहे. टाळेबंदी करूनही कोरोना आजाराचा प्रसार थांबत नाही, असे या पाठीमागे कारण सांगितले जात आहे. लोकांनी एकत्र येऊन कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणूनच असे वेगवेगळे निर्बंध घातले जात आहेत. मात्र, या निर्बंधाचे लोकांकडून सोईस्कररीत्या उल्लंघन होत आहे.

घालून दिलेले निर्बंधांचे उल्लंघन केल्यामुळेच कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये प्रमुख कारण आहे, शहर आणि खेडेगावात होत असलेले विवाह सोहळे. सध्या ज्याप्रमाणे कोरोनाची लाट यावी, त्याचप्रमाणे विवाह सोहळ्याचीही लाट आल्याची पाहायला मिळते आहे. थोडक्यात विवाह उरकून घेण्याकडे लोकांचा कल दिसून येतो आहे. या सोहळ्याला राज्य सरकारने पूर्वी ५०, २० पुन्हा २०० आणि आता परत ५० लोकांच्या उपस्थितीत हे सोहळे पार पडावेत, ही अट घातली आहे. मात्र, या अटीचे उल्लंघन होताना पाहायला मिळते आहे. लोक या सोहळ्याची परवानगी घेताना ५० लोकांची यादी सादर करत असले, तरी सोहळ्याला मात्र पाचशेहून अधिक लोकांची उपस्थिती पाहायला मिळते. विवाहापूर्वीची खरेदी हीही कोरोनाचा प्रसार होण्यासाठी उपयुक्त ठरते आहे. अशा प्रकारच्या बारीक-सारीक गोष्टीवर लक्ष दिले, तरच कोरोनाचा होणारा प्रसार थांबू शकेल.