शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विवाह समारंभातील उपस्थितीची अट कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:12 IST

नीरा : देशभरात करोनाच्या संसर्गाने मोठा उच्छाद मांडला आहे. त्यातही महाराष्ट्र आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा मोठा आहे. ...

नीरा : देशभरात करोनाच्या संसर्गाने मोठा उच्छाद मांडला आहे. त्यातही महाराष्ट्र आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा मोठा आहे. कोरोना मृत्यूचा दरही देशाच्या सरासरीपेक्षा जादा आहे. त्यामुळे राज्य सरकारने सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध लावले आहेत. यामध्येच विवाह सोहळे हे २०० लोकांमध्ये पार पडावेत, अशी अट शासनाने घातलेली होती. त्यामध्ये बदल करत, आता पुन्हा ५० लोकांमध्ये केली. मात्र, शासनाची ही अट धुडकावत जिल्ह्यात शेकडो लोकांच्या उपस्थित विवाह सोहळे साजरे होत आहेत. प्रशासनाकडून मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.

राज्यामध्ये आणि त्यातही मुंबई, पुणे या भागात करोनाचा प्रसार मोठा आहे. शासनाने कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या. मात्र, त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. पुणे जिल्ह्यात त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. अनेकांकडून आता टाळेबंदीला विरोध होत आहे. टाळेबंदी करूनही कोरोना आजाराचा प्रसार थांबत नाही, असे या पाठीमागे कारण सांगितले जात आहे. लोकांनी एकत्र येऊन कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणूनच असे वेगवेगळे निर्बंध घातले जात आहेत. मात्र, या निर्बंधाचे लोकांकडून सोईस्कररीत्या उल्लंघन होत आहे.

घालून दिलेले निर्बंधांचे उल्लंघन केल्यामुळेच कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये प्रमुख कारण आहे, शहर आणि खेडेगावात होत असलेले विवाह सोहळे. सध्या ज्याप्रमाणे कोरोनाची लाट यावी, त्याचप्रमाणे विवाह सोहळ्याचीही लाट आल्याची पाहायला मिळते आहे. थोडक्यात विवाह उरकून घेण्याकडे लोकांचा कल दिसून येतो आहे. या सोहळ्याला राज्य सरकारने पूर्वी ५०, २० पुन्हा २०० आणि आता परत ५० लोकांच्या उपस्थितीत हे सोहळे पार पडावेत, ही अट घातली आहे. मात्र, या अटीचे उल्लंघन होताना पाहायला मिळते आहे. लोक या सोहळ्याची परवानगी घेताना ५० लोकांची यादी सादर करत असले, तरी सोहळ्याला मात्र पाचशेहून अधिक लोकांची उपस्थिती पाहायला मिळते. विवाहापूर्वीची खरेदी हीही कोरोनाचा प्रसार होण्यासाठी उपयुक्त ठरते आहे. अशा प्रकारच्या बारीक-सारीक गोष्टीवर लक्ष दिले, तरच कोरोनाचा होणारा प्रसार थांबू शकेल.