शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

विवाह समारंभातील उपस्थितीची अट कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:12 IST

नीरा : देशभरात करोनाच्या संसर्गाने मोठा उच्छाद मांडला आहे. त्यातही महाराष्ट्र आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा मोठा आहे. ...

नीरा : देशभरात करोनाच्या संसर्गाने मोठा उच्छाद मांडला आहे. त्यातही महाराष्ट्र आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा मोठा आहे. कोरोना मृत्यूचा दरही देशाच्या सरासरीपेक्षा जादा आहे. त्यामुळे राज्य सरकारने सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध लावले आहेत. यामध्येच विवाह सोहळे हे २०० लोकांमध्ये पार पडावेत, अशी अट शासनाने घातलेली होती. त्यामध्ये बदल करत, आता पुन्हा ५० लोकांमध्ये केली. मात्र, शासनाची ही अट धुडकावत जिल्ह्यात शेकडो लोकांच्या उपस्थित विवाह सोहळे साजरे होत आहेत. प्रशासनाकडून मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.

राज्यामध्ये आणि त्यातही मुंबई, पुणे या भागात करोनाचा प्रसार मोठा आहे. शासनाने कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या. मात्र, त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. पुणे जिल्ह्यात त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. अनेकांकडून आता टाळेबंदीला विरोध होत आहे. टाळेबंदी करूनही कोरोना आजाराचा प्रसार थांबत नाही, असे या पाठीमागे कारण सांगितले जात आहे. लोकांनी एकत्र येऊन कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणूनच असे वेगवेगळे निर्बंध घातले जात आहेत. मात्र, या निर्बंधाचे लोकांकडून सोईस्कररीत्या उल्लंघन होत आहे.

घालून दिलेले निर्बंधांचे उल्लंघन केल्यामुळेच कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये प्रमुख कारण आहे, शहर आणि खेडेगावात होत असलेले विवाह सोहळे. सध्या ज्याप्रमाणे कोरोनाची लाट यावी, त्याचप्रमाणे विवाह सोहळ्याचीही लाट आल्याची पाहायला मिळते आहे. थोडक्यात विवाह उरकून घेण्याकडे लोकांचा कल दिसून येतो आहे. या सोहळ्याला राज्य सरकारने पूर्वी ५०, २० पुन्हा २०० आणि आता परत ५० लोकांच्या उपस्थितीत हे सोहळे पार पडावेत, ही अट घातली आहे. मात्र, या अटीचे उल्लंघन होताना पाहायला मिळते आहे. लोक या सोहळ्याची परवानगी घेताना ५० लोकांची यादी सादर करत असले, तरी सोहळ्याला मात्र पाचशेहून अधिक लोकांची उपस्थिती पाहायला मिळते. विवाहापूर्वीची खरेदी हीही कोरोनाचा प्रसार होण्यासाठी उपयुक्त ठरते आहे. अशा प्रकारच्या बारीक-सारीक गोष्टीवर लक्ष दिले, तरच कोरोनाचा होणारा प्रसार थांबू शकेल.