शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पुणे-नाशिक रेल्वेला जमीन देणारे चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:08 IST

पुणे : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गात येणाऱ्या जमिनीचे भूमी अधिग्रहण करण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पात बाधितांना ग्रामपंचायत असेल ...

पुणे : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गात येणाऱ्या जमिनीचे भूमी अधिग्रहण करण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पात बाधितांना ग्रामपंचायत असेल तर पाचपट मोबदला आणि महानगरपालिकेत असेल तर अडीचपट मोबदला म्हणजेच नुकसानीपोटी भरपाई दिली जाणार असल्याचे भूसंपादन विभागाने जाहीर केले आहे. मात्र ज्याच्या नावे खरेदीखत आहे, परंतु ज्यांचा सातबारा नाही, त्यांना नुकसानभरपाई मिळणार का? या प्रश्नावरून मांजरी बुद्रुक गावातील मिळकतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

मांजरी बुद्रुक गावातील मोजणी करून बाधित होणाऱ्या क्षेत्राची अंतिम रेषा आखण्यात आली आहे. या क्षेत्रापैकी काही मिळकतदारांनी एक ते दोन गुंठ्यांचे क्षेत्र खरेदी करून त्यावर घरे बांधली असून काहींचे अर्धवट बांधकाम आहे. केवळ खरेदीखत करून ताबा घेतला असून त्यावर बांधकाम केले जात आहे. नोंदणी बंद असल्याचे कारण देत तलाठी कार्यालयात सातबारा नोंदणी होऊ शकली नाही. त्यामुळे येथील अनेक मिळकतदारांकडे सातबारा नाही. बाधित होणार असून नुकसानभरपाई मिळावी, असा अनेकांनी हवेली भूसंपादन विभागाकडे अर्ज केला आहे. मात्र ज्यांची कायदेशीर प्रक्रियेनुसार कागदपत्रे पूर्ण असतील, ज्यांचे नावे सातबारा आहे, त्यांनाच नुकसानभरपाई दिली जाईल असे सांगितले जात आहे. त्यामुळे मोठ्या कष्टाने जमीन खरेदी करून सोने गहाण ठेऊन तसेच उसनवारीने पैसे घेऊन, वैयक्तिक कर्ज घेऊन घर बांधले जात आहे. जर केवळ सातबारा नाही तसेच तुकडेबंदीनुसार जमीनचे खरेदीखत रद्द करून नुकसानभरपाई दिली गेली नाही. तर आयुष्यातून उठल्यासारखे होईल. तसेच आयुष्यभराची कमाई केवळ सरकारच्या प्रकल्पामुळे गमावून बसू, अशी भीती येथील मिळकतदारांनी लोकमतपुुढे व्यक्त केली. यावर सरकारने योग्य खुलासा करावा, अशी मागणी मिळकतदारांची आहे.

चौकट

सरकारडून स्पष्टता नाही

शेतजमिनीचे छोटे मोठे तुकडे पडून जमिनी येथील शेतकऱ्यांनी विकल्या आहेत. अनेकांनी त्या जमिनी हक्काचे घर बांधावे या उद्देशाने खरेदी केल्या केल्या आहेत. मात्र ही घरे बेकायदा असून त्यांना नुकसाभरपाई देता येणार नाही, असे कारण पुढे करुन सरकारने जर नुकसाभरपाई देण्याचे टाळले तर यावर उपाय काय? तसेच की थेट नुकसानभरपाई दिली जाणार की नाही यावर कोणती ही स्पष्टता देण्यात येत नाही, असे मिळकतदारांचे म्हणणे आहे.

कोट

काही गावांमधील मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र अहवाल प्राप्त झाले नाहीत. मोजणीत कोणाची घरे बाधित आहेत किंवा किती नुकसान होणार आहे. याची माहिती पुढील टप्प्यांनुसार घेतली जाईल. जसजसे काम पुढे जात राहील त्यानुसार निर्णय घेतला जाणार आहे.

-रोहिणी आखाडे, भूसंपादन अधिकारी, हवेली.