शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

कुकडी खोऱ्यातील पाणीसाठा चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : दर वर्षी १५ ऑगस्टपर्यंत सर्व धरणे शंभर टक्के भरतात. परंतु, यंदा जुलैत झालेल्या मुसळधार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : दर वर्षी १५ ऑगस्टपर्यंत सर्व धरणे शंभर टक्के भरतात. परंतु, यंदा जुलैत झालेल्या मुसळधार पावसानंतर जिल्ह्यात चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम असल्याने भीमा-कृष्णा खोऱ्यातील काही धरणे शंभर टक्के भरली असली, तरी सरासरी पाणीसाठा ७७ टक्के एवढाच झाला आहे. यामध्ये कुकडी खोऱ्यातील पाणीसाठा अधिकच चिंताजनक असून, सध्या केवळ ५५ टक्केच पाणीसाठा जमा झाला आहे.

प्रशासनातर्फे १५ ऑगस्टपर्यंत धरणांतील पाणीसाठा गृहीत धरून नियोजन केले जाते. यंदा जूनच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. त्यानंतर एक-दीड महिना पावसाने दडी दिली. पण जुलैच्या पहिल्या आठवड्यात पुण्यासह संपूर्ण राज्यातच मुसळधार पाऊस झाला. तीन-चार दिवसांच्या धुवाधार पावसाने पाणी-पाणी केले. याच पावसात भीमा व कृष्ण खोऱ्यातील अनेक धरणे शंभर टक्के भरली. यामध्ये भीमा खोऱ्यातील पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुठा खोऱ्यात ९६ टक्के पाणीसाठा, नीरा खोरे ९२ टक्के पाणीसाठा, तर कुकडी खोऱ्यात ५५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. या तिन्ही खोऱ्यांतील धरणे मिळून भीमा उपखोऱ्यातील धरणांत ७७ टक्के पाणी जमा झाले आहे.

------

‘कुकडी’वर ३ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे भवितव्य

कुकडी खोऱ्यात नाझरे, पिंपळगाव जोगे, येडगाव, माणिकडोह, वडज, चिल्हेवाडी, डिंभे आणि घोड या आठ धरणांचा समावेश आहे. या कुकडी प्रकल्पातील धरणांच्या पाण्यावर पुणे, नगर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे. ‘कुकडी’ची एकूण प्रकल्पीय क्षमता ३५.५० टीएमसी आज अखेरपर्यंत येथे १९.७४ टीएमसी साठा जमा झाला आहे. या पाण्यावर पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांची बागायती व ऊसशेतीचे भवितव्य अवलंबून आहे. यामुळे जिल्ह्यासह कुकडी प्रकल्पाला दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.