शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएसआय गोपाल बदने परळीचा, शेवटचे लोकेशन पंढरपूर; प्रशांत बनकरचे आई-वडील म्हणतात...
2
IND vs AUS : DSP सिराजला 'रिमांड'वर घेण्याच्या मूडमध्ये होता हेड; पण त्याच्यावरच आली ‘अरेस्ट’ होण्याची वेळ
3
कॅनडाच्या 'त्या' जाहिरातीत असं काय होतं की डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड झाला? व्यापार करार रोखला!
4
LG सारख्या लिस्टिंगचे संकेत देतोय 'हा' आयपीओ; २९ तारखेपासून खुला होणार, किती आहे GMP, पाहा डिटेल्स
5
थायलंडच्या 'मातृतुल्य' पूर्व महाराणी सिरिकिट यांचे निधन, दीर्घकाळ आजाराशी दिली झुंज
6
Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ
7
हायब्रिड गाड्या जास्त प्रदूषण करतात...; उत्तर प्रदेश सरकारने सबसिडी रोखली
8
"हा फक्त सिनेमा नाही तर एक यज्ञ आहे"; 'रामायण' सिनेमात लक्ष्मण साकारणाऱ्या अभिनेत्याची भावना
9
प्रामाणिक करदात्यांसोबत नम्रपणे वागा, बेईमानी करणाऱ्या.., पाहा अधिकाऱ्यांना काय म्हणाल्या निर्मला सीतारामन?
10
"मुलाला टाक, आपण लग्न करू..."; 'आई' असणाऱ्या गर्लफ्रेंडने नकार देताच बॉयफ्रेंडने चिमुकल्याला संपवलं!
11
पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
12
'साथिया'फेम अभिनेत्री संध्या मृदुलला मिळेना काम; म्हणाली, "भाई, हा काय नवीन सीन आहे..."
13
घरातून मांजरीची पिल्ले गायब झाली, संतापलेली पुतणी थेट पोलीस स्टेशनला पोहोचली; काका-काकूंवर दाखल केला FIR! 
14
Tarot Card: कामात गुंतवून घ्या, आठवडा आनंदात जाईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
15
IND vs AUS : गिलनं पुन्हा गमावला टॉस; युवा ऑलराउंडर दुखापतीमुळे OUT; कुलदीपसह प्रसिद्ध कृष्णाला संधी
16
टाटा मोटर्सचं नाव बदललं, आता 'या' नावाने शेअर बाजारात ओळखली जाणार कंपनी; डिमर्जरनंतर झाला मोठा बदल
17
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
18
SIP Investment: एका वर्षात एसआयपीनं भरला खिसा, मागील दिवाळीनंतर या ५ म्युच्युअल फंडांनी दिला २०% पेक्षा जास्त रिटर्न
19
"सलमान खानसोबत चित्रपट करणार नाही"; महेश मांजरेकरांचं मोठं विधान, म्हणाले- "मी त्याला शिवी..."
20
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग

निर्णयाचे स्वागत अन् विकासाला खीळ बसण्याची चिंताही

By admin | Updated: May 8, 2017 02:56 IST

महापालिका हद्दीलगतच्या सात गावांचा महापालिकेत समावेश करण्यास राज्य शासनाने नकार दिला. या निर्णयाचे काहींनी स्वागत केले

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महापालिका हद्दीलगतच्या सात गावांचा महापालिकेत समावेश करण्यास राज्य शासनाने नकार दिला. या निर्णयाचे काहींनी स्वागत केले आहे, तर ही गावे महापालिकेत समाविष्ट न झाल्यास विकासाला खीळ बसेल, अशी चिंताही काहींनी व्यक्त केली आहे. महापालिकेत २०१५ मध्ये गहुंजे, नेरे, जांबे, सांगवडे, माण, मारुंजी, हिंजवडी ही सात गावे समाविष्ट करण्याचा विषय पुढे आला. महापालिका प्रशासनाने मंजुरीसाठी हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला होता. महापालिकेत गावे समाविष्ट करण्याबद्दल ग्रामस्थांचा कल जाणून घेण्याकरिता ग्रामसभा घेण्यात आल्या होत्या. या ग्रामसभांमध्येही गावे समाविष्ट करण्यास काही ग्रामस्थांनी स्पष्ट नकार दिला होता. विरोधाची भूमिका असणारे ठराव या ग्रामपंचायतींनी विशेष ग्रामसभेत एकमुखाने मंजूर केले होते. दरम्यान, विधानसभा निवडणूक जाहीर झाल्याने व राजकीय चित्र पालटल्याने या गावांच्या समावेशाचा विषय मागे पडला. त्यातच पीएमआरडीएचा पर्याय पुढे आल्याने गावे समाविष्ट करण्याचा मुद्दा मागे पडला, असे सामाजिक कार्यकर्ते अंकुश जगताप यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या हिताचा निर्णय शासनाने घेतला असल्याची प्रतिक्रिया त्यांनीनोंदवली. बांधकाम नोंदी बंद असल्याने २०१० नंतरच्या अनधिकृत ठरलेल्या बांधकामांना ग्रामपंचायतीकडून कर आकारता येत नव्हता. एकीकडे अनेक बिल्डर सदनिका विकल्यावरही पूर्णत्वाचा दाखला घेत नव्हते. आयटी कंपन्यांना एमआयडीसीने सवलत दिली असल्याने ग्रामपंचायतींना कर देण्यास कंपन्या तयार नव्हत्या. काही ग्रामपंचायतींनी आपल्या हक्कासाठी लढा दिला, करवसुलीची मुभा मिळाल्यानंतर कंपन्यांकडून कर प्राप्त करून घेतला. ग्रामपंचायतींनी कर आकारणी सुरू केल्यानंतर महापालिकेच्या तुलनेत ग्रामपंचायतीच्या सुविधा तोकड्या ठरणाऱ्या आहेत. त्यामुळे हा परिसर महापालिकेत समाविष्ट केला जावा, या मागणीचा रेटा वाढला होता. आगामी काळात परिसराचा कायापालट करायचा असेल तर गावे महापालिकेत समाविष्ट झाली पाहिजेत, अशी भूमिका नेतेमंडळी व्यक्त करीत होती. काही ग्रामस्थही त्या भूमिकेचे समर्थन करीत होते. शहराच्या अन्य भागाप्रमाणे विकास साधायचा असेल, तर महापालिकेत समाविष्ट होणे गरजेचे आहे, अशी काहींची भूमिका होती, तर विकासाच्या नावावर येथील भूमिपुत्रांवर अन्याय होईल, त्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकली जातील, त्याचा लाभ अन्य कोणीतरी घेईल, अशी चिंता ग्रामस्थांना भेडसावत होती. अशा ग्रामस्थांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.