शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

निर्णयाचे स्वागत अन् विकासाला खीळ बसण्याची चिंताही

By admin | Updated: May 8, 2017 02:56 IST

महापालिका हद्दीलगतच्या सात गावांचा महापालिकेत समावेश करण्यास राज्य शासनाने नकार दिला. या निर्णयाचे काहींनी स्वागत केले

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महापालिका हद्दीलगतच्या सात गावांचा महापालिकेत समावेश करण्यास राज्य शासनाने नकार दिला. या निर्णयाचे काहींनी स्वागत केले आहे, तर ही गावे महापालिकेत समाविष्ट न झाल्यास विकासाला खीळ बसेल, अशी चिंताही काहींनी व्यक्त केली आहे. महापालिकेत २०१५ मध्ये गहुंजे, नेरे, जांबे, सांगवडे, माण, मारुंजी, हिंजवडी ही सात गावे समाविष्ट करण्याचा विषय पुढे आला. महापालिका प्रशासनाने मंजुरीसाठी हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला होता. महापालिकेत गावे समाविष्ट करण्याबद्दल ग्रामस्थांचा कल जाणून घेण्याकरिता ग्रामसभा घेण्यात आल्या होत्या. या ग्रामसभांमध्येही गावे समाविष्ट करण्यास काही ग्रामस्थांनी स्पष्ट नकार दिला होता. विरोधाची भूमिका असणारे ठराव या ग्रामपंचायतींनी विशेष ग्रामसभेत एकमुखाने मंजूर केले होते. दरम्यान, विधानसभा निवडणूक जाहीर झाल्याने व राजकीय चित्र पालटल्याने या गावांच्या समावेशाचा विषय मागे पडला. त्यातच पीएमआरडीएचा पर्याय पुढे आल्याने गावे समाविष्ट करण्याचा मुद्दा मागे पडला, असे सामाजिक कार्यकर्ते अंकुश जगताप यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या हिताचा निर्णय शासनाने घेतला असल्याची प्रतिक्रिया त्यांनीनोंदवली. बांधकाम नोंदी बंद असल्याने २०१० नंतरच्या अनधिकृत ठरलेल्या बांधकामांना ग्रामपंचायतीकडून कर आकारता येत नव्हता. एकीकडे अनेक बिल्डर सदनिका विकल्यावरही पूर्णत्वाचा दाखला घेत नव्हते. आयटी कंपन्यांना एमआयडीसीने सवलत दिली असल्याने ग्रामपंचायतींना कर देण्यास कंपन्या तयार नव्हत्या. काही ग्रामपंचायतींनी आपल्या हक्कासाठी लढा दिला, करवसुलीची मुभा मिळाल्यानंतर कंपन्यांकडून कर प्राप्त करून घेतला. ग्रामपंचायतींनी कर आकारणी सुरू केल्यानंतर महापालिकेच्या तुलनेत ग्रामपंचायतीच्या सुविधा तोकड्या ठरणाऱ्या आहेत. त्यामुळे हा परिसर महापालिकेत समाविष्ट केला जावा, या मागणीचा रेटा वाढला होता. आगामी काळात परिसराचा कायापालट करायचा असेल तर गावे महापालिकेत समाविष्ट झाली पाहिजेत, अशी भूमिका नेतेमंडळी व्यक्त करीत होती. काही ग्रामस्थही त्या भूमिकेचे समर्थन करीत होते. शहराच्या अन्य भागाप्रमाणे विकास साधायचा असेल, तर महापालिकेत समाविष्ट होणे गरजेचे आहे, अशी काहींची भूमिका होती, तर विकासाच्या नावावर येथील भूमिपुत्रांवर अन्याय होईल, त्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकली जातील, त्याचा लाभ अन्य कोणीतरी घेईल, अशी चिंता ग्रामस्थांना भेडसावत होती. अशा ग्रामस्थांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.