शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

आरोग्य स्वराज्य संकल्पना रुजावी

By admin | Updated: February 14, 2015 23:55 IST

सध्याचे आरोग्यशास्त्र तांत्रिक आणि यांत्रिक बनले आहे. रुग्णालयांमधील महागडे उपचार आणि मेडिक्लेम कंपन्यांवर लोकांना अवलंबून राहावे लागत आहे.

पुणे : ‘‘सध्याचे आरोग्यशास्त्र तांत्रिक आणि यांत्रिक बनले आहे. रुग्णालयांमधील महागडे उपचार आणि मेडिक्लेम कंपन्यांवर लोकांना अवलंबून राहावे लागत आहे. असे परावलंबन माणसाला गुलाम बनविते. यातून लोकांना मुक्त करण्यासाठी आरोग्य स्वराज्य ही संकल्पना रुजण्याची गरज आहे. यातून केवळ उपचार नाही, तर आरोग्याविषयी जनजागृतीचा ध्यास घ्यायला हवा,’’ असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी बंग यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.मुकुंदनगर येथे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या २६व्या पदवी प्रदान समारंभात त्या बोलत होत्या. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग आणि ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ डॉ. मधुकर ढवळीकर यांना विद्यापीठातर्फे डी.लिट. पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. राणी बंग यांनी ही पदवी स्वीकारली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉ. अभय बंग उपस्थित राहू शकले नाहीत. या वेळी विद्यापीठाचे कुलपती निवृत्त न्यायाधीश विश्वनाथ पळशीकर, कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यापीठातर्फे ८४ जणांना पीएच.डी. पदवी, तर विविध विद्याशाखांतील एकूण ४४५६ विद्यार्थ्यांना पदवी व पदविका प्रदान करण्यात आली. विविध विषयांत प्रथम आलेल्या पाच जणांना सुवर्णपदक बहाल करण्यात आले.डॉ. बंग म्हणाल्या, ‘‘महात्मा गांधी व लोकमान्य टिळकांमधील स्वराज्य हा समान दुवा होता. हा वसा आता आम्ही घेतला आहे. या संकल्पनेला आरोग्याशी जोडून ‘आरोग्य स्वराज्या’चे ध्येय निश्चित करून काम सुरू केले. गडचिरोलीसारख्या आदिवासी भागात काम करताना तेथील समाजाच्या गरजा लक्षात घेऊन विज्ञानाची जोड देत सेवा व संशोधनात समन्वय साधला. आरोग्य स्वराज्य या संकल्पनेची ताकद खूप मोठी आहे. आज आपल्या समाजात चंगळवाद फोफावला आहे. आरोग्याच्या समस्या वाढत चालल्या आहेत. त्यातच समाजात आरोग्याबाबत परावलंबित्व निर्माण होत आहे. यातून बाहेर काढण्यासाठी चांगल्या उपचारांची गरज नाही, तर आरोग्याविषयी जागृत करणे गरजेचे आहे.’’सर्वसामान्यांना रुचेल असे संशोधन करण्याची अपेक्षा डॉ. ढवळीकर यांनी व्यक्त केली. विश्वसनीय पुराव्याअभावी केलेले संशोधन टिकत नाही. मुंबई येथे झालेल्या सायन्स काँग्रेसमध्ये असेच अविश्वसनीय पुराव्यांच्या आधारे संशोधन मांडण्यात आल्याचे डॉ. ढवळीकर यांनी सांगितले. पळशीकर व डॉ. टिळक यांनीही मनोगत व्यक्त केले.४आदिवासी समाजात शिक्षणाचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे त्यांच्यात सुसंस्कृतपणा नसतो, असे अनेक शिकलेले लोक म्हणतात. ४पण, खरे तर आदिवासीच जास्त सुसंस्कृत असतात, असे स्पष्ट करून डॉ. राणी बंग म्हणाल्या, ‘‘शिक्षण व सुसंस्कृतपणाचा कवडीचाही संबंध नाही.४आदिवासी कधीही खोटे बोलत नाहीत, चोरी करीत नाहीत, स्त्रियांवर अत्याचार करीत नाहीत. तेथील निर्णयप्रक्रिया सामूहिक असते.’’