शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य स्वराज्य संकल्पना रुजावी

By admin | Updated: February 14, 2015 23:55 IST

सध्याचे आरोग्यशास्त्र तांत्रिक आणि यांत्रिक बनले आहे. रुग्णालयांमधील महागडे उपचार आणि मेडिक्लेम कंपन्यांवर लोकांना अवलंबून राहावे लागत आहे.

पुणे : ‘‘सध्याचे आरोग्यशास्त्र तांत्रिक आणि यांत्रिक बनले आहे. रुग्णालयांमधील महागडे उपचार आणि मेडिक्लेम कंपन्यांवर लोकांना अवलंबून राहावे लागत आहे. असे परावलंबन माणसाला गुलाम बनविते. यातून लोकांना मुक्त करण्यासाठी आरोग्य स्वराज्य ही संकल्पना रुजण्याची गरज आहे. यातून केवळ उपचार नाही, तर आरोग्याविषयी जनजागृतीचा ध्यास घ्यायला हवा,’’ असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी बंग यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.मुकुंदनगर येथे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या २६व्या पदवी प्रदान समारंभात त्या बोलत होत्या. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग आणि ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ डॉ. मधुकर ढवळीकर यांना विद्यापीठातर्फे डी.लिट. पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. राणी बंग यांनी ही पदवी स्वीकारली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉ. अभय बंग उपस्थित राहू शकले नाहीत. या वेळी विद्यापीठाचे कुलपती निवृत्त न्यायाधीश विश्वनाथ पळशीकर, कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यापीठातर्फे ८४ जणांना पीएच.डी. पदवी, तर विविध विद्याशाखांतील एकूण ४४५६ विद्यार्थ्यांना पदवी व पदविका प्रदान करण्यात आली. विविध विषयांत प्रथम आलेल्या पाच जणांना सुवर्णपदक बहाल करण्यात आले.डॉ. बंग म्हणाल्या, ‘‘महात्मा गांधी व लोकमान्य टिळकांमधील स्वराज्य हा समान दुवा होता. हा वसा आता आम्ही घेतला आहे. या संकल्पनेला आरोग्याशी जोडून ‘आरोग्य स्वराज्या’चे ध्येय निश्चित करून काम सुरू केले. गडचिरोलीसारख्या आदिवासी भागात काम करताना तेथील समाजाच्या गरजा लक्षात घेऊन विज्ञानाची जोड देत सेवा व संशोधनात समन्वय साधला. आरोग्य स्वराज्य या संकल्पनेची ताकद खूप मोठी आहे. आज आपल्या समाजात चंगळवाद फोफावला आहे. आरोग्याच्या समस्या वाढत चालल्या आहेत. त्यातच समाजात आरोग्याबाबत परावलंबित्व निर्माण होत आहे. यातून बाहेर काढण्यासाठी चांगल्या उपचारांची गरज नाही, तर आरोग्याविषयी जागृत करणे गरजेचे आहे.’’सर्वसामान्यांना रुचेल असे संशोधन करण्याची अपेक्षा डॉ. ढवळीकर यांनी व्यक्त केली. विश्वसनीय पुराव्याअभावी केलेले संशोधन टिकत नाही. मुंबई येथे झालेल्या सायन्स काँग्रेसमध्ये असेच अविश्वसनीय पुराव्यांच्या आधारे संशोधन मांडण्यात आल्याचे डॉ. ढवळीकर यांनी सांगितले. पळशीकर व डॉ. टिळक यांनीही मनोगत व्यक्त केले.४आदिवासी समाजात शिक्षणाचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे त्यांच्यात सुसंस्कृतपणा नसतो, असे अनेक शिकलेले लोक म्हणतात. ४पण, खरे तर आदिवासीच जास्त सुसंस्कृत असतात, असे स्पष्ट करून डॉ. राणी बंग म्हणाल्या, ‘‘शिक्षण व सुसंस्कृतपणाचा कवडीचाही संबंध नाही.४आदिवासी कधीही खोटे बोलत नाहीत, चोरी करीत नाहीत, स्त्रियांवर अत्याचार करीत नाहीत. तेथील निर्णयप्रक्रिया सामूहिक असते.’’