शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जलयुक्तची कामे पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करा!

By admin | Updated: April 6, 2016 01:30 IST

पहिल्या टप्प्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत घेतलेल्या २00 गावांपैकी १३0 गावांत १00 टक्के कामे झाली आहेत. ७0 गावांत कामे अपूर्ण असून

पुणे : पहिल्या टप्प्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत घेतलेल्या २00 गावांपैकी १३0 गावांत १00 टक्के कामे झाली आहेत. ७0 गावांत कामे अपूर्ण असून, ती पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.जलयुक्त शिवार योजनेचा सोमवारी जिल्हा परिषदेत झालेल्या बैैठकीत आढावा घेण्यात आला. त्या वेळी राव यांनी वरील सूचना दिल्या. या योजनेतून पहिल्या टप्प्यात भोर १२, वेल्हे ११, मुळशी १३, मावळ १५, हवेली १८, खेड १५, आंबेगाव ११, शिरूर १६, जुन्नर १५, बारामती१६, पुरंदर २२, दौैंड २१ व इंदापूर १५ अशी २00 गावांची निवड झाली होती. या गावांत कपार्टमेंट बिडिंग, सलग समतलचर, माती नाला बांध, अनगड दगडी बांध, गॅबियन स्ट्रक्चर, खोल सलग समतल चर, अर्दन स्ट्रक्चर, माती नाला बांध दुरुस्ती, शेततळे, साखळी सिमेंट बंधारा, सिमेंट बंधारा दुरुस्ती, नाला गोलीकरण व रुंदीकरण, पाझर तलाव व दुरुस्ती, के.टी. वेअर व दुरुस्ती, कालवा दुरुस्त, सिंचन विहीर, बोअरवेल पुनर्भरण, पुनभर््ारण चर,रिचार्ज शाफ्ट, गाळ काढणे, मजगी, वनतळे, वळण बंधारा अशी ७१११ कामे हाती घेण्यात आली होती. यासाठी २४१.८६ कोटींचा आराखडा तयार केला होता. यातील ५ हजार १३ कामे पूर्ण झाली असून, यातील १२१ कोटींचा निधी यावर खर्च झाला आहे. २ हजार ९८ कामे अद्याप सुरू आहेत. गेल्या पावसाळ्यापूर्वी झालेल्या कामातून ३00७२.२५ दलघमी पाणीसाठा होऊन २८८४३.५ एवढे हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले होते. सध्या जिल्ह्यात ७९ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. जलयुक्तच्या कामांमुळे ३0 ते ४0 टँकर वाचले आहेत; अन्यथा आज टँकरची संख्या २00 पेक्षा अधिक झाली असती. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी उर्वरित कामांसाठी ७ जूूनची डेडलाइन दिली आहे. जर ही कामे झाली, तर पुढील वर्षात आणखी टँकर कमी होण्यास मदत होईल.