शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

तक्रार समिती विद्यार्थ्यांसाठी नाही, तर शिक्षकांसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 07:00 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये निवृत्त जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये निवृत्त जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात ही समिती शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी स्थापन करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यापीठात विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना, त्यांची विविध विषयांवर सातत्याने आंदोलने होत असताना अद्याप विद्यार्थी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आलेली नाही.नवीन सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठ तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यात येणाºया अडचणी, परीक्षेबाबतच्या तक्रारी, रेंगाळणारे निकाल, वेळापत्रकांची अनियमितता, प्राध्यापकांकडून दिला जाणारा त्रास आदी विविध प्रश्नांबाबत दाद मागण्यासाठी समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. मात्र, नवीन विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी होऊन एक वर्ष उलटले तरी अद्याप विद्यापीठ प्रशासनाकडून ही समिती स्थापन करण्यात आलेली नाही.विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी निवृत्त जिल्हा न्यायाधीश माधव गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आल्याचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात ही समिती केवळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या तक्रार निवारणासाठी स्थापन झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यार्थी तक्रार निवारणाची जबाबदारी विद्यार्थी कल्याण मंडळावर सोपविण्यात आली आहे. विद्यार्थी तक्रार निवारण समिती स्थापन करण्याचे काम अद्यापही रेंगाळलेले आहे.विद्यापीठात विद्यार्थ्यांना सातत्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, याविरोधात विद्यार्थ्यांकडून आंदोलनेही केली जात आहेत. त्यामुळे विद्यार्थी तक्रार निवारण समितीची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासत आहे. या तक्रार निवारण समितीत विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी घेणेही बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची तक्रार निवारण समिती स्थापन कधी होणार? याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांसाठी स्थापन केलेल्या डॉ. माधव गोडबोले यांच्या समितीमध्ये आंतरविद्याशाखीय अभ्यास विभागाचे अधिष्ठाता डॉ. दीपक माने, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम, प्रा. देविदास वायदंडे, अध्यापकेतर कर्मचारी विवेक बुचडे, उपकुलसचिव बी. डी. उढाणे यांचा समावेश आहे.लोकपालकधी नेमणार?विद्यार्थ्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी विद्यापीठ स्तरावर लोकपाल हे पदनिर्माण केले जावे, असे विद्यापीठ कायद्यात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, विद्यार्थी तक्रार निवारण समितीबरोबरच लोकपालाची नेमणूकही प्रलंबितच आहे.