शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

तक्रार समिती विद्यार्थ्यांसाठी नाही, तर शिक्षकांसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 07:00 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये निवृत्त जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये निवृत्त जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात ही समिती शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी स्थापन करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यापीठात विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना, त्यांची विविध विषयांवर सातत्याने आंदोलने होत असताना अद्याप विद्यार्थी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आलेली नाही.नवीन सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठ तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यात येणाºया अडचणी, परीक्षेबाबतच्या तक्रारी, रेंगाळणारे निकाल, वेळापत्रकांची अनियमितता, प्राध्यापकांकडून दिला जाणारा त्रास आदी विविध प्रश्नांबाबत दाद मागण्यासाठी समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. मात्र, नवीन विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी होऊन एक वर्ष उलटले तरी अद्याप विद्यापीठ प्रशासनाकडून ही समिती स्थापन करण्यात आलेली नाही.विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी निवृत्त जिल्हा न्यायाधीश माधव गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आल्याचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात ही समिती केवळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या तक्रार निवारणासाठी स्थापन झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यार्थी तक्रार निवारणाची जबाबदारी विद्यार्थी कल्याण मंडळावर सोपविण्यात आली आहे. विद्यार्थी तक्रार निवारण समिती स्थापन करण्याचे काम अद्यापही रेंगाळलेले आहे.विद्यापीठात विद्यार्थ्यांना सातत्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, याविरोधात विद्यार्थ्यांकडून आंदोलनेही केली जात आहेत. त्यामुळे विद्यार्थी तक्रार निवारण समितीची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासत आहे. या तक्रार निवारण समितीत विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी घेणेही बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची तक्रार निवारण समिती स्थापन कधी होणार? याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांसाठी स्थापन केलेल्या डॉ. माधव गोडबोले यांच्या समितीमध्ये आंतरविद्याशाखीय अभ्यास विभागाचे अधिष्ठाता डॉ. दीपक माने, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम, प्रा. देविदास वायदंडे, अध्यापकेतर कर्मचारी विवेक बुचडे, उपकुलसचिव बी. डी. उढाणे यांचा समावेश आहे.लोकपालकधी नेमणार?विद्यार्थ्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी विद्यापीठ स्तरावर लोकपाल हे पदनिर्माण केले जावे, असे विद्यापीठ कायद्यात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, विद्यार्थी तक्रार निवारण समितीबरोबरच लोकपालाची नेमणूकही प्रलंबितच आहे.