शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
3
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
4
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
5
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
6
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
7
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
8
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
9
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
10
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
11
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
12
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
13
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
14
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
15
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
16
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
17
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
18
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
19
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
20
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!

जलवाहिनी फोडल्याप्रकरणी १९ शेतकऱ्यांविरुद्ध तक्रार

By admin | Updated: April 24, 2016 04:21 IST

उजनी धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने बारामती एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा धोक्यात येत आली आहे. एमआयडीसीच्या जलवाहिनीमधून शेतकरी पाणी चोरत

भिगवण : उजनी धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने बारामती एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा धोक्यात येत आली आहे. एमआयडीसीच्या जलवाहिनीमधून शेतकरी पाणी चोरत असल्याची तक्रार यांत्रिकी उपविभागाचे उपअभियंता एस. व्ही. नखाते यांनी भिगवण पोलीस ठाण्यात दिली आहे.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ बारामती यांना पाणीपुरवठा करण्यासाठी कुंभारगाव ते बारामती अशी जलवाहिनी २५ वर्षांपूवी करण्यात आली आहे. बराच कालावधी उलटल्याने ही जलवाहिनी जीर्ण झाली आहे. अनेक ठिकाणी या जलवाहिनीमधून पाणीगळती होत आहे. त्यातच उजनीतील पाणीसाठा कमी झाल्याने जलवाहिनीचे पाणी बारामती उद्योगाला कमी पडत आहे. त्यामुळे महामंडळ अधिकारी यांचे लक्ष गळतीकडे गेले आहे. भिगवण पोलिसांनी मात्र सामंजस्याची भूमिका घेत शेतकऱ्यांना बोलावून समजावून सांगत गुन्हे दाखल करण्याची घाई केली नसल्याचे समजते. याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी चंद्रशेखर यादव यांनी शेतकरी आणि महामंडळाचे अधिकारी यांच्यात सामंजस्याने मार्ग काढण्याचा सल्ला दिल्याचे समजते. तर गुन्हे दाखल झाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबणार असल्याचे यातील शेतकऱ्यांनी सांगितले.याबाबत नखाते यांनी मदनवाडी, बंडगरवाडी येथील सुमारे १९ शेतकऱ्यांच्या नावे पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. त्यामध्ये हे शेतकरी या जलवाहिनीतून पाणी चोरत असल्याचा आरोप केलेला आहे. यासाठी महामंडळाने काही दिवसांपूर्वी या जलवाहिनीच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त घेतला होता. त्यासाठी दोन लाखांची रक्कमही अदा केली आहे. त्यामुळे महामंडळ आणि शेतकरी यांचा वाद पेटण्याची चिन्हे दिसून येत आहेत.