शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनी फोडल्याप्रकरणी १९ शेतकऱ्यांविरुद्ध तक्रार

By admin | Updated: April 24, 2016 04:21 IST

उजनी धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने बारामती एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा धोक्यात येत आली आहे. एमआयडीसीच्या जलवाहिनीमधून शेतकरी पाणी चोरत

भिगवण : उजनी धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने बारामती एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा धोक्यात येत आली आहे. एमआयडीसीच्या जलवाहिनीमधून शेतकरी पाणी चोरत असल्याची तक्रार यांत्रिकी उपविभागाचे उपअभियंता एस. व्ही. नखाते यांनी भिगवण पोलीस ठाण्यात दिली आहे.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ बारामती यांना पाणीपुरवठा करण्यासाठी कुंभारगाव ते बारामती अशी जलवाहिनी २५ वर्षांपूवी करण्यात आली आहे. बराच कालावधी उलटल्याने ही जलवाहिनी जीर्ण झाली आहे. अनेक ठिकाणी या जलवाहिनीमधून पाणीगळती होत आहे. त्यातच उजनीतील पाणीसाठा कमी झाल्याने जलवाहिनीचे पाणी बारामती उद्योगाला कमी पडत आहे. त्यामुळे महामंडळ अधिकारी यांचे लक्ष गळतीकडे गेले आहे. भिगवण पोलिसांनी मात्र सामंजस्याची भूमिका घेत शेतकऱ्यांना बोलावून समजावून सांगत गुन्हे दाखल करण्याची घाई केली नसल्याचे समजते. याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी चंद्रशेखर यादव यांनी शेतकरी आणि महामंडळाचे अधिकारी यांच्यात सामंजस्याने मार्ग काढण्याचा सल्ला दिल्याचे समजते. तर गुन्हे दाखल झाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबणार असल्याचे यातील शेतकऱ्यांनी सांगितले.याबाबत नखाते यांनी मदनवाडी, बंडगरवाडी येथील सुमारे १९ शेतकऱ्यांच्या नावे पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. त्यामध्ये हे शेतकरी या जलवाहिनीतून पाणी चोरत असल्याचा आरोप केलेला आहे. यासाठी महामंडळाने काही दिवसांपूर्वी या जलवाहिनीच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त घेतला होता. त्यासाठी दोन लाखांची रक्कमही अदा केली आहे. त्यामुळे महामंडळ आणि शेतकरी यांचा वाद पेटण्याची चिन्हे दिसून येत आहेत.