शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

हप्ते वसूल करणाऱ्यांची पोलिसांकडे तक्रार करा

By admin | Updated: January 11, 2016 01:30 IST

दादागिरी, गुंडगिरी करून उद्योजकांना ब्लॅकमेल करणाऱ्या आणि त्यांच्याकडून जबरदस्ती हप्ते वसूल करणाऱ्या माथाडी कामगार संघटना आणि माथाडी टोळ्यांच्या विरोधात पोलिसांकडे नावासह तक्रार करावी

पिंपरी : दादागिरी, गुंडगिरी करून उद्योजकांना ब्लॅकमेल करणाऱ्या आणि त्यांच्याकडून जबरदस्ती हप्ते वसूल करणाऱ्या माथाडी कामगार संघटना आणि माथाडी टोळ्यांच्या विरोधात पोलिसांकडे नावासह तक्रार करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार आणि जनरल कामगार युनियनने उद्योजक व लघुउद्योजकांना केले आहे. माथाडी कामगार संघटनांची दादागिरी व गुंडगिरी आणि या ब्लॅकमेलिंगला वैतागलेले उद्योजक यावर प्रकाश टाकणाऱ्या बातम्या ‘लोकमत’ने ठळकपणे प्रसिद्ध केल्या आहेत. यामुळे लोकमतचे अनेकांनी अभिनंदन करीत आभार व्यक्त केले. सरकार, मंत्री, एमआयडीसी प्रशासन आणि पोलीस निष्क्रिय असल्याने माथाडीची गुंडगिरी आणि दादागिरी संपत नसल्याची खंत उद्योजक आणि लघुउद्योजकांनी व्यक्त केली. या संदर्भात महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार युनियनचे कार्याध्यक्ष इरफान सय्यद यांनी लोकमतकडे निवेदन देऊन सदर मागणी केली आहे. उद्योगात अनेक कंपन्या माथाडी कायद्याचा वापर न करता अनधिकृत माथाडी संघटनांना रक्कम देऊन एकप्रकारे प्रोत्साहन देतात, असे त्यांनी म्हटले आहे. कायद्यानुसार काम करणाऱ्या अनेक संघटना मुंबई, पुणे व पिंपरी -चिंचवड परिसरातील अनेक छोट्या- मोठ्या कंपन्यांत कार्यरत आहेत. आतापर्यंत मान्यताप्राप्त माथाडी संघटनांच्या विरोधात गुंडगिरीसंदर्भात कोणतीही तक्रार दाखल झालेली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. अनेक उद्योजक व लघुउद्योजकांना माथाडी कायद्याबद्दल पुरेशी माहिती नाही. त्यामुळे हे उद्योजक उद्योगाच्या सुरक्षेसाठी बोगस संघटनांना हप्ते देऊन मोकळे होतात. अशा संघटनांवर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता त्यांना वाव देण्याचे काम ते करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दुुसरीकडे काही उद्योग संघटनेचे नेते माथाडी संघटनेकडून होणारा जाच थांबविण्याची मागणी प्रशासन व वृत्तपत्राकडे करतात. अलीकडे बांधकाम व्यावसायिक, छोटे उद्योग या ठिकाणी अनेक माथाडीच्या फिरत्या टोळ्या दमदाटी करीत रक्कम वसुलीचे काम करीत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)