शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

जिल्ह्यात पीकविम्यातून २४७२ शेतकऱ्यांना भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:11 IST

पुणे : पुणे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पीकविमा लागवडीखाली २ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्र आहे. नैसर्गिक आपत्ती किंवा इतर ...

पुणे : पुणे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पीकविमा लागवडीखाली २ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्र आहे. नैसर्गिक आपत्ती किंवा इतर स्थानिक आपत्तीत पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येते. मात्र, विमा कंपनीचे अधिकारी नुकसानीचे शासन निर्देशानुसार पाहणी न करता एकाच गावात नुकसान झालेल्या अर्ध्या शेतकऱ्यांना भरपाई देतात, तर उर्वरित शेतकरी आमच्या निकषात बसत नसल्याचे सांगतात. त्यासाठी मंडलनिहाय आम्ही नुकसानभरपाई देतो असे सांगतात. परिणामी, संपूर्ण गावात गारपीट झाली असेल, तरी अर्ध्या गावाला भरपाई तर उर्वरित गाव आमच्या मंडलात येत नसल्याचे अजब कारण देतात. त्यामुळे अर्ध्या गावातील शेतकरी वंचित राहत आहेत.

पुणे जिल्ह्यात २८ हजार ४६७ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवला आहे. त्यापैकी फक्त २४७१ शेतकऱ्यांना भरपाई मिळाली आहे. याबाबत कृषी विभागाचे अधिकारी सांगतात की, उरलेले २५ हजार ९९५ शेतकऱ्यांना आम्ही नुकसानभरपाई नाकारलेली नाही. तर आम्ही टप्प्याटप्प्याने नुकसानीची शहानिशा करून प्रत्येक शेतकऱ्यांना भरपाई देणार आहोत. मात्र, पीकविमा नुकसानभरपाईचे निकष जाचक असल्याने आम्हाला शासनस्तरावरून त्याबाबत काहीच कल्पना अथवा माहिती दिली जात नाही. त्यामुळे पीकविम्याचे पैसे भरूनही नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

-------------------------

* एकूण पीक विमा मंजूर :- १ कोटी ५ हजार रुपये

* प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी भरलेले पैसे -: ९८ लाख ९२ हजार रुपये

* जिल्ह्यातील विमा काढलेले एकूण शेतकरी :- २८ हजार ४६७

* एकूण लाभार्थी शेतकरी :- ८ लाख ३६ हजार

* एकूण किती जणांना मिळाला विमा :- २४७२

* आतापर्यंत जिल्ह्यात शेतकऱ्यांना वाटप केलेली एकूण रक्कम :- १ कोटी ५ लाख रुपये

----

मावळ तालुक्याला सर्वाधिक लाभ

पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्याला सर्वाधिक लाभ मिळाला आहे. ७ हजार ७३३ शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता. त्यापैकी ११२४ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

----

पॉईंटर्स

* खरीप हंगाम २०२०-२१

* पीकविमा लागवड क्षेत्र :- २ लाख १४ हजार हेक्टर

* एकूण जमा रक्कम :- १ कोटी ५ लाख रुपये

----

कोट

१) पिकांचा खर्च वाढला आहे. दर वर्षी नैसर्गिक आपत्ती ही येतेच. वादळ, गारपीटीमुळे आमच्या आणि गावातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र, विमा कंपन्यांचे अधिकारी फॉर्ममधील किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या त्रुटी काढून नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करतात.

- राजेंद्र गावडे, शेतकरी

--

२) शेतकऱ्यांसाठी पीकविमा योजना हक्काची आहे. मात्र, भाजीपाला, ऊस किंवा मूग तसेच इतर कडधान्याचे जेव्हा नैसर्गिक आपत्तीत नुकसान होते. तेव्हा विमा कंपनीचे अधिकारी जाणीवपूर्वक या पिकांना मिळेल, पण त्या पिकांना नुकसानभरपाई मिळणार नाही, असे सांगून टोलवाटोलवी करतात. त्यामुळे पीकविमा काढूनही भरपाई मात्र मिळत नाही. त्यामुळे सर्वच पिकांना ती लागू करावी.

- सखाराम खामकर, शेतकरी

---

३) नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या गावातील प्रत्येक शेतकऱ्यांना भरपाई द्यावी. त्या गावात जर ८ वाड्या असतील तर त्यातील फक्त ४ वाड्यांना मदत देतात. उर्वरित ४ वाड्या आमच्या परिमंडळ कार्यक्षेत्रात येत नाही, असे सांगतात. त्यामुळे विमा काढूनही त्याचा लाभ आम्हाला मिळत नाही.

- सुनंदा संजय थोरात, शेतकरी

------

पंतप्रधान विमा योजनेत पुणे जिल्ह्यातील तालुकानिहाय सहभागी शेतकरी

(तालुका) (सहभागी शेतकरी) (नुकसानभरपाई मिळालेले शेतकरी)

१) भोर १२०८ ०८

२) वेल्हा ५८१ ०९

३) मुळशी १२२१ ००

४) मावळ ७७७३ ११२३

५) हवेली ७६ ०१

६) खेड २२५४ ००

७) आंबेगाव ३३२६ २८९

८) जुन्नर ११८९ ००

९) शिरूर ५४६१ ००

१०) पुरंदर १२०८ २८६

११) दौंड २७७ १५६

१२) बारामती ४५८ १७८

१३) इंदापूर २७५१ ४२२

एकूण २८४६७ २४७२