शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे जाणारा सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
3
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
4
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
7
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
8
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
9
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
10
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
11
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
12
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
13
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
14
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
15
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
16
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
17
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
18
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

जिल्ह्यात पीकविम्यातून २४७२ शेतकऱ्यांना भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:11 IST

पुणे : पुणे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पीकविमा लागवडीखाली २ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्र आहे. नैसर्गिक आपत्ती किंवा इतर ...

पुणे : पुणे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पीकविमा लागवडीखाली २ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्र आहे. नैसर्गिक आपत्ती किंवा इतर स्थानिक आपत्तीत पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येते. मात्र, विमा कंपनीचे अधिकारी नुकसानीचे शासन निर्देशानुसार पाहणी न करता एकाच गावात नुकसान झालेल्या अर्ध्या शेतकऱ्यांना भरपाई देतात, तर उर्वरित शेतकरी आमच्या निकषात बसत नसल्याचे सांगतात. त्यासाठी मंडलनिहाय आम्ही नुकसानभरपाई देतो असे सांगतात. परिणामी, संपूर्ण गावात गारपीट झाली असेल, तरी अर्ध्या गावाला भरपाई तर उर्वरित गाव आमच्या मंडलात येत नसल्याचे अजब कारण देतात. त्यामुळे अर्ध्या गावातील शेतकरी वंचित राहत आहेत.

पुणे जिल्ह्यात २८ हजार ४६७ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवला आहे. त्यापैकी फक्त २४७१ शेतकऱ्यांना भरपाई मिळाली आहे. याबाबत कृषी विभागाचे अधिकारी सांगतात की, उरलेले २५ हजार ९९५ शेतकऱ्यांना आम्ही नुकसानभरपाई नाकारलेली नाही. तर आम्ही टप्प्याटप्प्याने नुकसानीची शहानिशा करून प्रत्येक शेतकऱ्यांना भरपाई देणार आहोत. मात्र, पीकविमा नुकसानभरपाईचे निकष जाचक असल्याने आम्हाला शासनस्तरावरून त्याबाबत काहीच कल्पना अथवा माहिती दिली जात नाही. त्यामुळे पीकविम्याचे पैसे भरूनही नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

-------------------------

* एकूण पीक विमा मंजूर :- १ कोटी ५ हजार रुपये

* प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी भरलेले पैसे -: ९८ लाख ९२ हजार रुपये

* जिल्ह्यातील विमा काढलेले एकूण शेतकरी :- २८ हजार ४६७

* एकूण लाभार्थी शेतकरी :- ८ लाख ३६ हजार

* एकूण किती जणांना मिळाला विमा :- २४७२

* आतापर्यंत जिल्ह्यात शेतकऱ्यांना वाटप केलेली एकूण रक्कम :- १ कोटी ५ लाख रुपये

----

मावळ तालुक्याला सर्वाधिक लाभ

पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्याला सर्वाधिक लाभ मिळाला आहे. ७ हजार ७३३ शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता. त्यापैकी ११२४ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

----

पॉईंटर्स

* खरीप हंगाम २०२०-२१

* पीकविमा लागवड क्षेत्र :- २ लाख १४ हजार हेक्टर

* एकूण जमा रक्कम :- १ कोटी ५ लाख रुपये

----

कोट

१) पिकांचा खर्च वाढला आहे. दर वर्षी नैसर्गिक आपत्ती ही येतेच. वादळ, गारपीटीमुळे आमच्या आणि गावातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र, विमा कंपन्यांचे अधिकारी फॉर्ममधील किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या त्रुटी काढून नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करतात.

- राजेंद्र गावडे, शेतकरी

--

२) शेतकऱ्यांसाठी पीकविमा योजना हक्काची आहे. मात्र, भाजीपाला, ऊस किंवा मूग तसेच इतर कडधान्याचे जेव्हा नैसर्गिक आपत्तीत नुकसान होते. तेव्हा विमा कंपनीचे अधिकारी जाणीवपूर्वक या पिकांना मिळेल, पण त्या पिकांना नुकसानभरपाई मिळणार नाही, असे सांगून टोलवाटोलवी करतात. त्यामुळे पीकविमा काढूनही भरपाई मात्र मिळत नाही. त्यामुळे सर्वच पिकांना ती लागू करावी.

- सखाराम खामकर, शेतकरी

---

३) नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या गावातील प्रत्येक शेतकऱ्यांना भरपाई द्यावी. त्या गावात जर ८ वाड्या असतील तर त्यातील फक्त ४ वाड्यांना मदत देतात. उर्वरित ४ वाड्या आमच्या परिमंडळ कार्यक्षेत्रात येत नाही, असे सांगतात. त्यामुळे विमा काढूनही त्याचा लाभ आम्हाला मिळत नाही.

- सुनंदा संजय थोरात, शेतकरी

------

पंतप्रधान विमा योजनेत पुणे जिल्ह्यातील तालुकानिहाय सहभागी शेतकरी

(तालुका) (सहभागी शेतकरी) (नुकसानभरपाई मिळालेले शेतकरी)

१) भोर १२०८ ०८

२) वेल्हा ५८१ ०९

३) मुळशी १२२१ ००

४) मावळ ७७७३ ११२३

५) हवेली ७६ ०१

६) खेड २२५४ ००

७) आंबेगाव ३३२६ २८९

८) जुन्नर ११८९ ००

९) शिरूर ५४६१ ००

१०) पुरंदर १२०८ २८६

११) दौंड २७७ १५६

१२) बारामती ४५८ १७८

१३) इंदापूर २७५१ ४२२

एकूण २८४६७ २४७२