शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
3
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
4
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
5
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
6
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
7
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
8
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
9
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
10
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
11
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
12
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
13
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
14
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
15
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
16
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
17
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
18
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
19
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
20
'या' कंपनीचा शेअर २३९० वरून ५९ रुपयांवर घसरला; सेबीने केलेली कारवाई, आता नवी माहिती समोर

गणेश मंडळे व प्रशासनात समन्वयासाठी समिती

By admin | Updated: April 6, 2016 01:35 IST

गणेशोत्सव आला की दरवर्षी गणेश मंडळे आणि प्रशासन यांच्यामध्ये वाद होतात आणि या दोघांमध्ये संघर्ष उभा राहतो. हा संघर्ष संपविण्यासाठी आणि दोघांमध्ये

पुणे : गणेशोत्सव आला की दरवर्षी गणेश मंडळे आणि प्रशासन यांच्यामध्ये वाद होतात आणि या दोघांमध्ये संघर्ष उभा राहतो. हा संघर्ष संपविण्यासाठी आणि दोघांमध्ये समन्वय साधत पुण्याचा गणेशोत्सव जगभरात आदर्श ठरविण्यासाठी समन्वय समिती स्थापण्यात येणार आहे. ज्यामध्ये धर्मादाय आयुक्त कार्यालय, पुणे महापालिका, पोलीस, राज्यप्रशासन यांच्या प्रतिनिधींबरोबर गणेश मंडळाचे पदाधिकारी, सामाजिक व्यक्तींचा यामध्ये समावेश असेल, अशी माहिती धर्मादाय सहआयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिली.गणेश मंडळे, प्रशासनाचे अधिकारी यांच्या बैठकीचे केसरीवाड्यात आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी डिगे बोलत होते. या वेळी सहायक पोलीस आयुक्त पी. बी. लोखंडे, उपजिल्हाधिकारी गायकवाड, धर्मादाय सहायक आयुक्त नवनाथ जगताप, नगरसेविका मुक्ता टिळक, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.डिगे म्हणाले, की गणेश मंडळांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यातील बहुतांशी हे प्रशासनाशी निगडित आहेत. ते सोडविण्यासाठी समन्वयाची आवश्यकता असल्याने ही समन्वय समिती स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजचे युग हे ब्रँडिंगचे युग आहे. पुण्यातील गणेशोत्सव जगभरात नावाजलेला आहे. त्याचे ब्रँडिंग होणे गरजेचे आहे. त्यातून रोजगार उपलब्ध होऊ शकतो. तसेच गणेश मंडळांची संख्या कमी करणे आदी उद्देशांसाठीही ही समन्वय समिती स्थापण्यात येणार आहे. या वेळी विविध गणेश मंडळांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. त्या वेळी त्यांनी विविध समस्यांचा पाढा वाचला. पराग ठाकूर यांनी कधीही अमलात न येणाऱ्या एक खिडकी योजनेबाबत नाराजी व्यक्त केली. प्रताप परदेशी यांनी सकारात्मक, समाजोपयोगी काम करणाऱ्या मंडळांचा सत्कार करण्याची मागणी केली. भाऊसाहेब करपे यांनी स्पिकरच्या भिंती वाढण्यामागच्या कारणांचा ऊहापोह केला. संदीप मोकाटे यांनी कोथरूडमध्ये स्थापलेल्या नियोजन समितीमुळे प्रश्न कमी झाल्याची माहिती दिली. आनंद सराफ यांनी ध्वनिक्षेपकांच्या वापराऐवजी त्यांच्या उत्पादनावर बंदीची मागणी केली. पोलिसांची भूमिका विशद करताना लोखंडे म्हणाले, की गणेश मंडळांचा बहुतांशी रोष हा पोलिसांवर असतो. पण पोलीस कायदा राबविण्याचे काम करतात. कोणावरही ऊठसूट खटले दाखल करीत नाहीत. पोलिसांची भूमिका ही नेहमी सहकार्याची आहे आणि पुढेही राहील.टिळक म्हणाल्या, की मंडळांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्यशासनाने महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघाची स्थापना केली असून, त्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत.शेटे म्हणाले, की गेल्या १० वर्षांपासून प्रशासन विरुद्ध गणेश मंडळे अशी स्थिती निर्माण होत आली आहे. हे चित्र बदलण्यासाठी स्थापण्यात येणाऱ्या समन्वय समितीकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे.