शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

जेजुरीगडावर रूढीपरंपरांचे व्यापारीकरण

By admin | Updated: December 18, 2014 04:41 IST

महाराष्ट्रातील प्रमुख पाच तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरी गडावर पुरातन काळापासून चालत आलेल्या धार्मिक रूढीपरंपरांचे मोठ्या

जेजुरी : महाराष्ट्रातील प्रमुख पाच तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरी गडावर पुरातन काळापासून चालत आलेल्या धार्मिक रूढीपरंपरांचे मोठ्या प्रमाणावर व्यापारीकरण होत आहे. देवसंस्थान विश्वस्तांच्या डोळ्यांदेखत भाविकांची होणारी लूट थांबविण्याची मागणी माजी प्रमुख विश्वस्त व माजी नगराध्यक्ष ज्ञानोबा दरेकर यांनी केली आहे. राज्यातील पंढरपूर, आळंदी, तुळजापूर, नाशिक आणि जेजुरी ही ब्रिटिशकाळापासून अत्यंत महत्त्वाची तीर्थक्षेत्रे मानली जातात. शासकीय पातळीवरून या तीर्थक्षेत्रांकडे विशेष लक्ष दिले जाते. मात्र, जेजुरी वगळता इतर ठिकाणी शिस्त आहे. तशी जेजुरीत नसल्याची खंत दरेकर यांनी व्यक्त केली. जेजुरीत यात्राकाळात पोलीस प्रशासनाकडून गर्दीचे नियोजन केले जाते, देवसंस्थान मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याची वस्तुस्थिती असून, देव संस्थानने प्रामुख्याने याकडे लक्ष द्यावे, असे त्यांचे म्हणणे आहे. मुख्य मंदिरातील सभामंडप आणि गडकोटातील बालद्वारी मंडपाला पावसाळ्यात गळती होते. मुख्य मंदिरातील सभामंडपाच्या छताच्या दगडी तुळर्इंना चिरा पडलेल्या आहेत. त्यांची डागडुजी होणे अत्यंत गरजेचे आहे. भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्यास विश्वस्त मंडळ व त्यांचे प्रशासनच जबाबदार राहणार असल्याने याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. वास्तुशास्राचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या मंदिराचे व गडकोटाचे जतन करण्याची जबाबदारी विश्वस्त मंडळाची आहे. यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी तसेच ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना पाहणी करण्याबाबत निवेदन देणार असल्याचे दरेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)