शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

दिलासा : राज्याचा कोराेनामुक्तीचा दर ९४ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत होरपळून निघालेल्या राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत होरपळून निघालेल्या राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के आहे. आतापर्यंत बाधित झालेल्या ५७ लाख ६१ हजार रुग्णांपैकी ५४ लाख ३१ हजार रुग्ण बरे झाले आहेत. देशाचा एकूण मृत्यूदर १.२८ असून, राज्याचा मृत्यूदर १.६७ टक्के जास्त आहे. राज्याचा प्रवास हळूहळू कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू आहे. असे असले तरी नव्या नियमावलीचा विचार केला असता, नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत राज्यातील मुंबई, पुणे जिल्हा सर्वाधिक बाधित झाला होता. मात्र, दुसऱ्या लाटेत जवळपास सर्वच जिल्हे बाधित झाले. काही मोजकी जिल्हे साेडली तर बहुतांश जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण हे वाढलेले होते. आता केवळ १० जिल्ह्यांत सक्रिय रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. यात पुणे, सातारा, कोल्हापुर, मुंबई, ठाणे, सांगली, अहमदनगर, नाशिक, नागपूर, सोलापूर या जिल्ह्यांत सर्वाधिक रुग्ण आहेत. राज्यात लावण्यात आलेल्या नियमावलींमुळे दैनंदिन कोरोनाबाधितांचा दर कमी झाला आहे. दैनंदिन होणाऱ्या चाचण्यांच्या प्रमाणात रुग्ण कमी झाले आहे. राज्यात आतापर्यंत ३ कोटी ५२ लाख ७७ हजार ६५३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. अडीच लाखांच्या आसपास रोज दैनंदिन चाचण्या होत आहेत. १ जून रोजी २ लाख २१ हजार चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी १४ हजार १२३ रुग्ण कोरोनाबाधित आढळले. मे महिन्याच्या तुलनेत रोज बाधितांचा आकडा हा कमी झाला आहे.

चौकट

१७ जिल्ह्यांचा बाधितांचा दर राज्याच्या एकूण दरापेक्षा जास्त

राज्याच्या एकूण बाधित दर हा ०.२४ टक्के आहे. मात्र, १७ जिल्ह्यांचा बाधित दर हा राज्याच्या तुलनेत जास्त आहे. यात सिंधुदुर्ग २.२०, कोल्हापूर १.७४, रत्नागिरी १.३६, सातारा १.२९, सांगली ०.९२, बुलडाणा ०.७०, बीड ०.६५, वाशीम ०.६१, उस्मानाबाद ०.५६, अमरावती ०.५५, अहमदनगर ०.५१, सोलापूर ०.५०, पालघर ०.४७, अकोला ०.४६, यवतमाळ ०.४६, रायगड ०.४३, गडचिरोली ०.३६ एवढा रग्णबाधितांचा दर आहे.

चौकट

लसीकरणात देशात राज्य अव्वल

देशात लसीकरणाच्या बाबतीत राज्याचा प्रथम क्रमांक आहे. राज्यात आतापर्यंत १ कोटी ८२ लाख ५३ हजार ९३५ नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ४६ लाख २१ हजार ८५३ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. एकूण २ कोटी २८ लाख ७२ हजार ७८८ जणांनी लसीकरण केले आहे. महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो.