शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

‘काठावर’च्या विद्यार्थ्यांना दिलासा

By admin | Updated: January 22, 2016 01:52 IST

र्नमूल्यांकनाच्या नियमात बदल करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषदेत घेतल्याने काठावर पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पुणे : पुर्नमूल्यांकनाच्या नियमात बदल करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषदेत घेतल्याने काठावर पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पूर्वी पुनर्मूल्यांकनामध्ये दहा टक्के गुणात बदल झाले तरच पुढील गुणात बदल केले जात असत. परंतु आता पाच टक्के गुण बदलले तरी गुणात वाढ होणार आहे.विद्या परिषदेची गुरुवारी बैठक झाली. यामध्ये विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून पुर्नमूल्यांकनाबाबत मांडलेल्या प्रस्तावास तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. आता हा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेकडे जाणार आहे. पुनर्मूल्याकंनाबरोबरच काही अभ्यासक्रम बंद करणे, विद्यापीठामध्ये नवीन विभाग सुरू करणे आणि पीएच.डी. गाईड यांच्या कालावधीबाबत चर्चा करण्यात आली. विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार वाणिज्य विद्या शाखेअंतर्गत चालविला जाणारा एमसीए अभ्यासक्रम बंद करण्यासंदर्भात चर्चा झाली. त्याचबरोबर हा अभ्यासक्रम कोणत्या पद्धतीने चालवावा, यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत चालविला जाणारा बीएसस्सी हॉस्पिटॅलिटी हा अभ्यासक्रम विज्ञान विद्याशाखेअंतर्गत सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठातील तंत्रज्ञान विभागाला जोडून अभियांत्रिकी विभाग सुरू करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.