शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
4
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
5
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
6
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
7
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
8
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
9
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
10
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
11
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
12
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
13
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
14
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
15
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
16
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
17
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
18
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
19
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
20
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 

'कोरोना ' नंतर कोमेजले मनोरंजन विश्व..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:11 IST

पुणे : कोरोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाने नाट्यगृहे बंद केली, त्या घटनेला १५ मार्च २०२१ रोजी एक वर्ष होईल. तेव्हापासून ...

पुणे : कोरोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाने नाट्यगृहे बंद केली, त्या घटनेला १५ मार्च २०२१ रोजी एक वर्ष होईल. तेव्हापासून मनोरंजन विश्वाची गाडी घसरली असून ती अजून पूर्वपदावर आलेली नाही. नाट्यगृहे बंद झाल्याच्या घटनेचा परिणाम सांस्कृतिक क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर झाला. पडद्या पुढील आणि पडद्या मागील कलावंत, तंत्रज्ञ, रंगमंच कर्मचारी यांच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. हजारो बेरोजगार झाले.

कलावंतांचे उत्पन्न कमी झाल्यामुळे आर्थिक, मानसिक, कौटुंबिक, शारीरिक अडचणींना तोंड द्यावे लागले. काहींना आजारपण वाढल्याने आर्थिक बोजा वाढल्याने मानसिक त्रास झाला. नैराश्य वाढले.

आठ महिन्यांनंतर शासनाने नाट्यगृहांना ५० टक्के उपस्थितीत कार्यक्रम करण्यास परवानगी दिली. त्यामुळे सांस्कृतिक क्षेत्रांत उत्साह वाढला. थोडे दिवस झाल्यावर प्रेक्षक देखील येऊ लागले. पण तो आनंद फार काळ टिकला नाही. जानेवारीपासून कोरोना प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने चिंता वाढली.

आता पुन्हा कलाकारांची कोंडी झाली आहे. रोजच्या रोज काम केले तरच घर चालेल अशी परिस्थिती असलेला एक वर्ग या क्षेत्रात आहे. या वर्गावर जणू कुऱ्हाड कोसळली आहे. पन्नास टक्के उपस्थितीत चालणारे नाटकाचे खर्च भागत नाहीत. तरीही सर्व घटकांनी समजून उमजून काम केले. अनेक ठिकाणी भाडी कमी घेतली गेली. कलाकारांनी मानधन कमी घेतले. जाहिरातींचे दर कमी केले गेले. पण, एवढे करूनही रसिक मात्र नाट्यगृहात पुरेशा संख्येने आले नाहीत. अजूनही रसिकांच्या मनातील कोरोनाची दहशत कमी झालेली नाही.

चित्रपटगृहे बंद आहेत. एक पडदा चित्रपटगृहे, मल्टीस्क्रिन चित्रपटगृहे सुरू झालेली नाहीत. अनेक संस्था आणि कलाकारांनी ऑनलाईन कार्यक्रम सुरू केले. मात्र, रंगमंचीय कार्यक्रमांचा जिवंतपणा त्यात येत नाही. प्रेक्षकांनाही पुरेसे समाधान मिळत नाही. त्यामुळे ऑनलाईन कार्यक्रम हा जिवंत, प्रत्यक्ष कार्यक्रमांना पर्याय होऊ शकत नाही.

आता तर प्रेक्षकांनाही घरातील मनोरंजनाची सवय लागली आहे. पैसे खर्च करून नाट्यगृहांकडे येण्याची सवय कमी झालेली आहे, ती उत्तरोत्तर कमी होत जाणार आहे. डोळ्यांसमोर घडणारे जिवंत नाट्य अनुभवायचे तर नाट्यगृहांना पर्याय नाही. मात्र, पैसे खर्च करून नाट्य गृहांकडे येण्याची सवय कमी होणार का? अशी भीती आहे. मनोरंजन विश्वातील जिवंतपणा, कलेचा आनंद परत यावा अशी सर्वांचीच इच्छा आहे. तसे घडेपर्यंत नटेश्वराकडे प्रार्थना करणे, हेच आपल्या हातात आहे.