शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

'कोरोना ' नंतर कोमेजले मनोरंजन विश्व..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:11 IST

पुणे : कोरोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाने नाट्यगृहे बंद केली, त्या घटनेला १५ मार्च २०२१ रोजी एक वर्ष होईल. तेव्हापासून ...

पुणे : कोरोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाने नाट्यगृहे बंद केली, त्या घटनेला १५ मार्च २०२१ रोजी एक वर्ष होईल. तेव्हापासून मनोरंजन विश्वाची गाडी घसरली असून ती अजून पूर्वपदावर आलेली नाही. नाट्यगृहे बंद झाल्याच्या घटनेचा परिणाम सांस्कृतिक क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर झाला. पडद्या पुढील आणि पडद्या मागील कलावंत, तंत्रज्ञ, रंगमंच कर्मचारी यांच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. हजारो बेरोजगार झाले.

कलावंतांचे उत्पन्न कमी झाल्यामुळे आर्थिक, मानसिक, कौटुंबिक, शारीरिक अडचणींना तोंड द्यावे लागले. काहींना आजारपण वाढल्याने आर्थिक बोजा वाढल्याने मानसिक त्रास झाला. नैराश्य वाढले.

आठ महिन्यांनंतर शासनाने नाट्यगृहांना ५० टक्के उपस्थितीत कार्यक्रम करण्यास परवानगी दिली. त्यामुळे सांस्कृतिक क्षेत्रांत उत्साह वाढला. थोडे दिवस झाल्यावर प्रेक्षक देखील येऊ लागले. पण तो आनंद फार काळ टिकला नाही. जानेवारीपासून कोरोना प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने चिंता वाढली.

आता पुन्हा कलाकारांची कोंडी झाली आहे. रोजच्या रोज काम केले तरच घर चालेल अशी परिस्थिती असलेला एक वर्ग या क्षेत्रात आहे. या वर्गावर जणू कुऱ्हाड कोसळली आहे. पन्नास टक्के उपस्थितीत चालणारे नाटकाचे खर्च भागत नाहीत. तरीही सर्व घटकांनी समजून उमजून काम केले. अनेक ठिकाणी भाडी कमी घेतली गेली. कलाकारांनी मानधन कमी घेतले. जाहिरातींचे दर कमी केले गेले. पण, एवढे करूनही रसिक मात्र नाट्यगृहात पुरेशा संख्येने आले नाहीत. अजूनही रसिकांच्या मनातील कोरोनाची दहशत कमी झालेली नाही.

चित्रपटगृहे बंद आहेत. एक पडदा चित्रपटगृहे, मल्टीस्क्रिन चित्रपटगृहे सुरू झालेली नाहीत. अनेक संस्था आणि कलाकारांनी ऑनलाईन कार्यक्रम सुरू केले. मात्र, रंगमंचीय कार्यक्रमांचा जिवंतपणा त्यात येत नाही. प्रेक्षकांनाही पुरेसे समाधान मिळत नाही. त्यामुळे ऑनलाईन कार्यक्रम हा जिवंत, प्रत्यक्ष कार्यक्रमांना पर्याय होऊ शकत नाही.

आता तर प्रेक्षकांनाही घरातील मनोरंजनाची सवय लागली आहे. पैसे खर्च करून नाट्यगृहांकडे येण्याची सवय कमी झालेली आहे, ती उत्तरोत्तर कमी होत जाणार आहे. डोळ्यांसमोर घडणारे जिवंत नाट्य अनुभवायचे तर नाट्यगृहांना पर्याय नाही. मात्र, पैसे खर्च करून नाट्य गृहांकडे येण्याची सवय कमी होणार का? अशी भीती आहे. मनोरंजन विश्वातील जिवंतपणा, कलेचा आनंद परत यावा अशी सर्वांचीच इच्छा आहे. तसे घडेपर्यंत नटेश्वराकडे प्रार्थना करणे, हेच आपल्या हातात आहे.