शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

'कोरोना ' नंतर कोमेजले मनोरंजन विश्व..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:11 IST

पुणे : कोरोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाने नाट्यगृहे बंद केली, त्या घटनेला १५ मार्च २०२१ रोजी एक वर्ष होईल. तेव्हापासून ...

पुणे : कोरोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाने नाट्यगृहे बंद केली, त्या घटनेला १५ मार्च २०२१ रोजी एक वर्ष होईल. तेव्हापासून मनोरंजन विश्वाची गाडी घसरली असून ती अजून पूर्वपदावर आलेली नाही. नाट्यगृहे बंद झाल्याच्या घटनेचा परिणाम सांस्कृतिक क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर झाला. पडद्या पुढील आणि पडद्या मागील कलावंत, तंत्रज्ञ, रंगमंच कर्मचारी यांच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. हजारो बेरोजगार झाले.

कलावंतांचे उत्पन्न कमी झाल्यामुळे आर्थिक, मानसिक, कौटुंबिक, शारीरिक अडचणींना तोंड द्यावे लागले. काहींना आजारपण वाढल्याने आर्थिक बोजा वाढल्याने मानसिक त्रास झाला. नैराश्य वाढले.

आठ महिन्यांनंतर शासनाने नाट्यगृहांना ५० टक्के उपस्थितीत कार्यक्रम करण्यास परवानगी दिली. त्यामुळे सांस्कृतिक क्षेत्रांत उत्साह वाढला. थोडे दिवस झाल्यावर प्रेक्षक देखील येऊ लागले. पण तो आनंद फार काळ टिकला नाही. जानेवारीपासून कोरोना प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने चिंता वाढली.

आता पुन्हा कलाकारांची कोंडी झाली आहे. रोजच्या रोज काम केले तरच घर चालेल अशी परिस्थिती असलेला एक वर्ग या क्षेत्रात आहे. या वर्गावर जणू कुऱ्हाड कोसळली आहे. पन्नास टक्के उपस्थितीत चालणारे नाटकाचे खर्च भागत नाहीत. तरीही सर्व घटकांनी समजून उमजून काम केले. अनेक ठिकाणी भाडी कमी घेतली गेली. कलाकारांनी मानधन कमी घेतले. जाहिरातींचे दर कमी केले गेले. पण, एवढे करूनही रसिक मात्र नाट्यगृहात पुरेशा संख्येने आले नाहीत. अजूनही रसिकांच्या मनातील कोरोनाची दहशत कमी झालेली नाही.

चित्रपटगृहे बंद आहेत. एक पडदा चित्रपटगृहे, मल्टीस्क्रिन चित्रपटगृहे सुरू झालेली नाहीत. अनेक संस्था आणि कलाकारांनी ऑनलाईन कार्यक्रम सुरू केले. मात्र, रंगमंचीय कार्यक्रमांचा जिवंतपणा त्यात येत नाही. प्रेक्षकांनाही पुरेसे समाधान मिळत नाही. त्यामुळे ऑनलाईन कार्यक्रम हा जिवंत, प्रत्यक्ष कार्यक्रमांना पर्याय होऊ शकत नाही.

आता तर प्रेक्षकांनाही घरातील मनोरंजनाची सवय लागली आहे. पैसे खर्च करून नाट्यगृहांकडे येण्याची सवय कमी झालेली आहे, ती उत्तरोत्तर कमी होत जाणार आहे. डोळ्यांसमोर घडणारे जिवंत नाट्य अनुभवायचे तर नाट्यगृहांना पर्याय नाही. मात्र, पैसे खर्च करून नाट्य गृहांकडे येण्याची सवय कमी होणार का? अशी भीती आहे. मनोरंजन विश्वातील जिवंतपणा, कलेचा आनंद परत यावा अशी सर्वांचीच इच्छा आहे. तसे घडेपर्यंत नटेश्वराकडे प्रार्थना करणे, हेच आपल्या हातात आहे.