शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

विनोदी कादंबरी लिहायची होती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2016 03:47 IST

आयुष्यात काही मिळवलं, काही केलं तर काही करायचं राहून गेलं. विनोदी लेखन करणे हा माझा आवडीचा प्रांत. मराठी साहित्यामध्ये आज एकही विनोदी कादंबरी नाही, तशी एखादी कांदंबरी

पुणे : आयुष्यात काही मिळवलं, काही केलं तर काही करायचं राहून गेलं. विनोदी लेखन करणे हा माझा आवडीचा प्रांत. मराठी साहित्यामध्ये आज एकही विनोदी कादंबरी नाही, तशी एखादी कांदंबरी व विनोदी नाटक लिहिण्याची खूप इच्छा होती. पण मनात पूर्ण झाल्याशिवाय ते कागदावर उतरत नाही, त्यामुळे ही इच्छा अपूर्णच राहिली. ते लिहिणं आजवर जमलं नाही आणि पुढे होण्याची शक्यता नसल्याची खंत ज्येष्ठ साहित्यिक द.मा मिरासदार यांनी व्यक्त केली. आपल्या खुमासदार शैलीतील लेखनाबरोबरच कथाकथाकथनाच्या माध्यमातून वाचक आणि श्रोतेजनांवर ‘मिरासदारी’ ची पकड अधिक घट्ट करणारे सर्वांचे लाडके द.मा यांनी गुरूवारी 90 व्या वर्षात पदार्पण केले. आप्तेष्ट, मित्रमंडळी यांच्यासह साहित्य विश्वातील लेखक, वाचकांकडून त्यांच्यावर काल अभिष्टचिंतनाचा वर्षाव झाला. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. द. मा. म्हणाले, ‘‘चिं.वि जोशी हे आपले अत्यंत आवडते लेखक. सशक्त लेखनातून उत्तमोत्तम विनोदी साहित्याची निर्मिती त्यांनी केली असली तरी ते कधी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकले नाहीत, याचे वाईट वाटते. य्नवोदितांना काय सल्ला द्याल असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो, मात्र प्रत्येकाने एकलव्यासारखी विद्या आत्मसात करावी असे मला वाटते. चांगल्या लेखकाचे पुस्तक समोर ठेवावे आणि त्यातील काय भावले, ते चांगले का आहे, याचे स्वत:च आत्मपरीक्षण करावे,याकडे त्यांनी लक्ष वेधले. आता फक्त वाचन करतो, कारण करण्यासारखे आता काही उरले नाही. तब्येतीने साथ दिली पाहिजे. दिवसाला तीन ते चार तास वाचन करतो. चांगल्या इंग्रजी कादंब-्या मराठीत आल्या आहेत, त्या वाचून काढतो, असा दिनक्रम असल्याचे सांगितले. द.मां नी विनोद आणि वक्तृत्वाच्या सूत्राची मांडणी केली. ते म्हणाले, जीवनात दु:ख टाळता येत नाहीत, दु:ख नाहीसे करण्याची शक्ती कशातच नाही. मात्र ते विसरण्याची शक्ती दोन गोष्टींमध्ये आहे. एक म्हणजे तत्त्वज्ञान तर दुसरा विनोद. तत्त्वज्ञान तर प्रत्येकाला समजू शकत नाही. पण विनोदाचे तसे नाही. विनोद ही मानवाची नैसर्गिक गरज असून त्यासाठी कसलीही प्रगल्भता लागत नाही. तत्वज्ञान समजण्याची शक्ती किती लोकांमध्ये आहे, हा प्रश्नच आहे. जगण्याची प्रेरणा विनोदामध्ये आहे. त्याने जीवन सुखी होते. कथाकथन करणा-या व्यक्तीच्या वक्तृत्वात नाट्य व खिळवून ठेवण्याची ताकद पाहिजे. वक्तृत्वाचे गुण देखील त्याच्यामध्ये असणे आवश्यक आहेत.