शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
3
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
4
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
5
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
6
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
7
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
8
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
9
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
10
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
11
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
12
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
13
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
14
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
15
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
16
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
17
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
18
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
19
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
20
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 

विनोदी कादंबरी लिहायची होती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2016 03:47 IST

आयुष्यात काही मिळवलं, काही केलं तर काही करायचं राहून गेलं. विनोदी लेखन करणे हा माझा आवडीचा प्रांत. मराठी साहित्यामध्ये आज एकही विनोदी कादंबरी नाही, तशी एखादी कांदंबरी

पुणे : आयुष्यात काही मिळवलं, काही केलं तर काही करायचं राहून गेलं. विनोदी लेखन करणे हा माझा आवडीचा प्रांत. मराठी साहित्यामध्ये आज एकही विनोदी कादंबरी नाही, तशी एखादी कांदंबरी व विनोदी नाटक लिहिण्याची खूप इच्छा होती. पण मनात पूर्ण झाल्याशिवाय ते कागदावर उतरत नाही, त्यामुळे ही इच्छा अपूर्णच राहिली. ते लिहिणं आजवर जमलं नाही आणि पुढे होण्याची शक्यता नसल्याची खंत ज्येष्ठ साहित्यिक द.मा मिरासदार यांनी व्यक्त केली. आपल्या खुमासदार शैलीतील लेखनाबरोबरच कथाकथाकथनाच्या माध्यमातून वाचक आणि श्रोतेजनांवर ‘मिरासदारी’ ची पकड अधिक घट्ट करणारे सर्वांचे लाडके द.मा यांनी गुरूवारी 90 व्या वर्षात पदार्पण केले. आप्तेष्ट, मित्रमंडळी यांच्यासह साहित्य विश्वातील लेखक, वाचकांकडून त्यांच्यावर काल अभिष्टचिंतनाचा वर्षाव झाला. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. द. मा. म्हणाले, ‘‘चिं.वि जोशी हे आपले अत्यंत आवडते लेखक. सशक्त लेखनातून उत्तमोत्तम विनोदी साहित्याची निर्मिती त्यांनी केली असली तरी ते कधी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकले नाहीत, याचे वाईट वाटते. य्नवोदितांना काय सल्ला द्याल असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो, मात्र प्रत्येकाने एकलव्यासारखी विद्या आत्मसात करावी असे मला वाटते. चांगल्या लेखकाचे पुस्तक समोर ठेवावे आणि त्यातील काय भावले, ते चांगले का आहे, याचे स्वत:च आत्मपरीक्षण करावे,याकडे त्यांनी लक्ष वेधले. आता फक्त वाचन करतो, कारण करण्यासारखे आता काही उरले नाही. तब्येतीने साथ दिली पाहिजे. दिवसाला तीन ते चार तास वाचन करतो. चांगल्या इंग्रजी कादंब-्या मराठीत आल्या आहेत, त्या वाचून काढतो, असा दिनक्रम असल्याचे सांगितले. द.मां नी विनोद आणि वक्तृत्वाच्या सूत्राची मांडणी केली. ते म्हणाले, जीवनात दु:ख टाळता येत नाहीत, दु:ख नाहीसे करण्याची शक्ती कशातच नाही. मात्र ते विसरण्याची शक्ती दोन गोष्टींमध्ये आहे. एक म्हणजे तत्त्वज्ञान तर दुसरा विनोद. तत्त्वज्ञान तर प्रत्येकाला समजू शकत नाही. पण विनोदाचे तसे नाही. विनोद ही मानवाची नैसर्गिक गरज असून त्यासाठी कसलीही प्रगल्भता लागत नाही. तत्वज्ञान समजण्याची शक्ती किती लोकांमध्ये आहे, हा प्रश्नच आहे. जगण्याची प्रेरणा विनोदामध्ये आहे. त्याने जीवन सुखी होते. कथाकथन करणा-या व्यक्तीच्या वक्तृत्वात नाट्य व खिळवून ठेवण्याची ताकद पाहिजे. वक्तृत्वाचे गुण देखील त्याच्यामध्ये असणे आवश्यक आहेत.