शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

राजकारणविरहित विकासासाठी एकत्र या

By admin | Updated: May 8, 2017 02:04 IST

विकासाच्या माध्यमातून महात्मा फुलेंचे खानवडी गाव जगाच्या नकाशावर पोहोचावे, यासाठी या गावचा आदर्श सांसद ग्राम योजनेत

लोकमत न्यूज नेटवर्कखळद : विकासाच्या माध्यमातून महात्मा फुलेंचे खानवडी गाव जगाच्या नकाशावर पोहोचावे, यासाठी या गावचा आदर्श सांसद ग्राम योजनेत सहभाग करून सर्वांगीण विकास करण्यासाठी गावातील सर्व नागरिकांना राजकारणविरहित विकासासाठी एकत्र या, असे आवाहन खासदार अमर साबळे यांनी केले.आदर्श सांसद ग्राम योजनेअंतर्गत त्यांनी खानवडी गावाची पाहणी केली. तसेच ग्रामस्थांशी चर्चा करून लोकसहभागासाठी तयारी आहे का, याची विचारणा केली. या वेळी सर्वांनी एकमुखाने होकार दर्शविल्यावर या गावचा आदर्श सांसद ग्रामचा तपशील पुरंदरचे तहसीलदार जिल्हाधिकारी यांना पाठवतील. त्यानंतर तो पंतप्रधान कार्यालयाकडे जाईल. तेथे यावर गावच्या निवडीविषयी चर्चा होऊन मगच निवडीची घोषणा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. या वेळी झालेल्या बैठकीत ग्रामपंचायतीच्या वतीने साबळे यांना गाव दत्तक घेण्याविषयी निवेदन देण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार सचिन गिरी, गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे, सरपंच दीपाली होले, उपसरपंच वैजयंता झुरंगे, सुनील धिवार, सचिन लंबाते, गिरीश जगताप, साकेत जगताप, शेखर वढणे, आनंद जगताप, संदीप जगताप, गोकुळ गायकवाड, पी. एस. मेमाणे, चंद्रकांत टिळेकर, श्रीकांत ताम्हाणे तसेच ग्रामस्थ व अधिकारी उपस्थित होते.खानवडीत म. फुले यांच्या नावाने बहुउद्देशीय सभागृह उभारावे. तसेच गावचा सर्वांगीण विकास होईल, असा प्रयत्न व्हावा, असे दत्ता झुरंगे यांनी सांगितले. गावात आदर्श ग्रामयोजना खऱ्या अर्थाने राबवायची असेल तर गावातील प्रत्येक व्यक्तीने ही योजना यशस्वी होण्यासाठी काम केले पाहिजे, असे पिंपरी-चिंचवडचे माजी आयुक्त के. सी. कारकर यांनी सांगितले. खानवडी येथे फुले यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, असे सुनील धिवार, चंद्रकांत फुले यांनी सांगितले.