शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

कर्नल यांच्या पार्थिवावर अंत्यविधी, बेवारस असल्याने मृतदेह तीन दिवस ससून रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 01:23 IST

भारतीय सैन्य दलात कर्नल म्हणून काम केलेल्या आणि उतारवयात कुटुंबीयांची साथ न मिळालेल्या रवींद्रकुमार बाली (वय ६४) यांना आयुष्याची संध्याकाळ कॅम्प परिसरातील एका पदपथावर घालवावी लागली.

येरवडा : भारतीय सैन्य दलात कर्नल म्हणून काम केलेल्या आणि उतारवयात कुटुंबीयांची साथ न मिळालेल्या रवींद्रकुमार बाली (वय ६४) यांना आयुष्याची संध्याकाळ कॅम्प परिसरातील एका पदपथावर घालवावी लागली. त्यांचा तीन दिवसांपूर्वी अज्ञातांनी खून केला होता. ते बेवारस असल्याने त्यांना मृतदेह तीन दिवस ससून रुग्णालयात ठेवण्यात आला होता. त्यानंतर पोलीसांनी वंदे मातरम् संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत बाली यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.बाली यांची तीन दिवसांपूर्वी अज्ञात मारेकºयांनी डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली होती. त्यांना कोणीही वारसदार नव्हते. त्यांचा मृत्यू झाल्यावर अंत्यविधी करण्यास कोणीही पुढे आले नाही. अखेर परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे यांच्या पुढाकाराने वंदे मातरम् संघटनेच्या पदाधिकाºयांसोबत येरवडा स्मशानभूमीत सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास या सैन्य अधिकाºयाच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आले. या वेळी १९७० मध्ये बाली यांच्यासोबत पुण्यातील एन. डी. ए.मध्ये शिक्षण घेणारे त्यांचे तत्कालीन मित्र आणि आताचे सैन्य दलातील सेवानिवृत्त ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते. बाली यांची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी त्यांच्या तोंडून उपस्थितांना ऐकायला मिळाली. वंदे मातरम् संघटनेचे महाराष्टÑ प्रदेशाध्यक्ष वैभव वाघ, कार्याध्यक्ष सचिन जामगे, प्रशांत नरवडे, विनोद मोहिते, किरण कांबळे, अमन अलकुटे, अमोल जगताप, आकाश गजमल, सूरज जाधव, किरण राऊत यांनी ससूनमधून बाली यांचा मृतदेह ताब्यात घेतला होता.त्यानंतर स्मशानभूमीत त्यांचे पार्थिव नेण्यात आले. त्या वेळी जुलै १९७० ते जून १९७३ यादरम्यान बाली यांच्यासोबत ४४ व्या एन. डी. ए. बॅचमध्ये प्रशिक्षणार्थी असलेले आणि आता सैन्य दलातून निवृत्त झालेले लेफ्टनंट जनरल रवी दास्ताने, लेफ्टनंट जनरल अभिजित गुहा, ब्रिगेडियर बी. एल. पुनिया, कर्नल सुभाष पाटील, कर्नल अजॉय पोद्दार, कर्नल एस. पी. एस. चिक्कारा प्रामुख्याने अंत्यसंस्कारास उपस्थित होते.>बडतर्फीनंतर फुटपाथवर आयुष्यरवींद्रकुमार बाली ४४ व्या एन. डी. ए.च्या बॅचमध्ये १९७० ते १९७३ दरम्यान शिक्षणासाठी पुण्यात होते. त्यानंतर सैन्य दलात सुमारे २० वर्षे कर्नल म्हणून कामगिरी केली होती. सैन्य दलात बाली कार्यरत असताना त्यांच्या सावत्र भावंडांकडून त्यांच्या सख्ख्या आईचा छळ केला जात होता. त्यामुळे ते वारंवार घरी यायचे. त्यामुळे सैैन्य दलाची शिस्त मोडल्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आले होते. तेव्हापासून बेवारस म्हणून पुणे शहरातील पुणे कॅन्टोन्मेंटमधील आॅफिसर मेसच्या समोरील फुटपाथवर त्यांनी अखेरचा काळ घालविला.>रवींद्रकुमार बाली यांचा जन्म कोटा (राजस्थान) येथे झाला होता. त्यांचे वडील पोलीस खात्यात अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या दुसºया बायकोपासून रवींद्रकुमार यांचा जन्म झाला. शालेय शिक्षणानंतर ते एनडीएमध्ये दाखल झाले.>प्रशिक्षणानंतर फिरोजपूर जिल्ह्यातील हुसेनीवाला बॉर्डर म्युजियम येथे त्यांची पहिली नियुक्ती झाली होती. त्यांनी कौटुंबिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अविवाहित राहणेच पसंत केले.>सैन्य दलातील नोकरी गेल्यानंतर २०१३ मध्ये त्यांनी केरळ सोडले. त्या पावसाळी दिवसात त्या रात्री त्यांनी एकट्याने घालविल्या. त्यांची सर्व महत्त्वाची कागदपत्रे पावसात भिजून खराब झाली होती. त्या वेळी शेवटच्या टप्प्यात त्यांनी सायकलवरून प्रवास केला. केरळ सोडल्यानंतर पुणे शहरातील कॅन्टोन्मेंट परिसरातील फुटपाथ हेच जणू त्यांचे घर बनले होते.