शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

किरकोळ कारणावरुन महाविद्यालयीन तरुणाचा खुन

By admin | Updated: March 28, 2017 18:55 IST

किरकोळ कारणावरुन झालेल्या बाचाबाची दोघा जणांनी केलेल्या मारहाणीत महाविद्यालयीन तरुणाचा खुन करण्यात आला़ याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी २४ तासात दोघांना अटक केली आहे़

दोघा मित्रांना अटक : सिंहगड कॉलेज कॅम्पसमधील घटनापुणे : किरकोळ कारणावरुन झालेल्या बाचाबाची दोघा जणांनी केलेल्या मारहाणीत महाविद्यालयीन तरुणाचा खुन करण्यात आला़ याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी २४ तासात दोघांना अटक केली आहे़ आशिष विभिषण पवार (वय २०, रा़ आसावरी, नांदेड सिटी) आणि आकाश अनिलकुमार डोके (वय २०, रा़ दामोदरनगर, हिंगणे खुर्द) अशी अटक केलेल्या महाविद्यालयीन तरुणांची नावे आहेत़गौरव रामचंद्र जाधव (वय २१, रा़ सिंहगड इन्स्टिटयुट हॉस्टेल, आंबेगाव बुद्रुक, मुळ घुरसाळे, ता़ खटाव, जि़ सातारा) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे़ याप्रकरात मनोज सुभाषचंद्र चोरडिया (वय २४, रा़ नवले पुलाजवळ) आणि अभिजित शिंदे हे जखमी झाले असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे़ ही घटना सिंहगड कॉलेज कॅम्पसमध्ये २६ मार्च रोजी रात्री ११ वाजता घडली़ याप्रकरणी अभिजित प्रभाकरराव शिंदे (वय २२, रा़ मधुकोश बिल्डिंग, धायरी) यांनी फिर्याद दिली आहे़ यातील सर्व जण सिंहगड कॉलेजचे विद्यार्थी असून ते वेगवेगळ्या पदव्यांचे शिक्षण घेत आहेत़ गौरव जाधव, मनोज चोरडिया हे शुभम चौधरी या मित्रांचा वाढदिवस साजरा करुन रात्री कॉलेजच्या कॅम्पसमधील एव्हिकेशन कॉलेजजवळच्या पायऱ्यावर बसले होते़ आशिष पवार, आकाश डोके हे आंबेगाव येथील जत्रेला जाऊन तेथे आले़ ते गप्पा मारत बसले असताना एकाने त्यांची ओळख करुन दिली़ तेव्हा गौरव जाधव याने ओळख दाखविली नाही़ त्यावरुन त्याच्यात व आशिष पवार याच्यात बाचाबाची व शिवीगाळ झाली़ तेव्हा आभिजित शिंदे यांचा मित्र आकाश कराडकर याने दोघांची समजूत घालून त्यांना तेथून पाठविले़ मात्र, या बाचाबाचीचा राग मनात धरुन आकाश डोके हातात बांबु घेऊन आला व त्याने गौरव जाधव याच्या पायावर, डोक्यात बांबुने मारहाण केली़ आशिष पवार याने मनोज चोरडिया यालाही बांबुने मारहाण केली़ ते पाहून शिंदे हे पळत जाऊन मदतीसाठी आकाश कराडकर याला बोलवून घेऊन आला़ तेव्हा पवार याने कराडकर यालाही बांबुने मारहाण केली़ त्यानंतर ते पळून गेले़ तिघांनाही तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़ उपचार सुरु असताना सोमवारी रात्री गौरव जाधव याचा मृत्यु झाला़ भारती विद्यापीठ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला़ या दोघांचा शोध घेत असताना ते मुळगावी पळून जाण्यासाठी आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारापाशी थांबले असल्याची माहिती मंगळवारी सकाळी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक समाधान कदम यांना मिळाली़ तेथे जाऊन पोलिसांनी दोघांना तातडीने अटक केली़ वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह गायकवाड, श्रीकांत शिंदे, तपास पथकाचे उपनिरीक्षक समाधान कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत आरोपींना पकडण्यात यश मिळविले. न्यायालयाने दोघांना ३१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे़