शहरं
Join us  
Trending Stories
1
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
2
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
3
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
4
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
5
Mohammed Shami: "मी तंदुरुस्त आहे आणि..."  ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीने सोडले मौन! 
6
रतन टाटांचा श्वान महिन्याला कमावतो इतके रुपये; एकूण संपत्ती पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही
7
सरकारकडून मदतीच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक, आकडे फुगवून दाखवले- शरद पवार गटाचा आरोप
8
"तू मरणार आहेस का?", रक्ताच्या थारोळ्यात पाहून तैमूरने विचारलेला प्रश्न, सैफने दिलं 'हे' उत्तर
9
ओबीसी तरुणांच्या जीवाची सरकारला थोडीजरी काळजी असेल तर...; विजय वडेट्टीवार यांचे रोखठोक मत
10
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
11
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
12
“महायुती सरकारने राज्यात लाडका गुंड योजना सुरू करावी”; घायवळ प्रकरणावरून वडेट्टीवारांचा टोला
13
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
14
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
15
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
16
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
17
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
18
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
19
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
20
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?

जानेवारीत उघडणार महाविद्यालयांचे प्रवेशद्वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:28 IST

पुणे: आम्ही शहरातील हॉटेलमध्ये मित्रांना भेटातो, बाजारात खरेदीला गर्दी करतो, एवढेच नाही तर पर्यटन स्थळांनाही भेटी देतो. कुठेही जाण्यास ...

पुणे: आम्ही शहरातील हॉटेलमध्ये मित्रांना भेटातो, बाजारात खरेदीला गर्दी करतो, एवढेच नाही तर पर्यटन स्थळांनाही भेटी देतो. कुठेही जाण्यास आम्हाला बंदी नाही ; मग कॉलेजमध्ये जाण्यावरच बंदी का? आता बस... आम्हाला आॅनलाईन शिक्षणाचाही कंटाळा आलायं...कॉलेज उघडा आम्हाला वर्गात बसून शिक्षण घेऊ द्या,अशा प्रतिक्रिया आता माहविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत. त्याचप्रमाणे विद्यापीठानेही जानेवारीत महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने तयारीला लागले आहे.

कोरोनामुळे तब्बल आठ महिन्यांपासून घराबाहेर न पडलेली तरूणाई कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटल्याने बाहेर पडत आहे. शहरातील रस्त्यांवर, हॉटेलमध्ये, एवढेच नाही तर विद्यार्थी आता महाविद्यालयाच्या आवरात मित्रांना भेटून गप्पा मारताना दिसत आहे. त्यातच राज्य शासनाने इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिल्यामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासह राज्यात अनेक ठिकाणी शाळा सुरू झाल्या आहेत.शालेय विद्यार्थी शाळेत जातात मग आम्ही का नाही? असा प्रश्न आता विद्यार्थी शिक्षकांना विचारू लागले आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने डिसेंबर महिना अखेरीस संलग्न माहाविद्यालये सुरू करण्याची तयारी केली होती. परंतु, कोरोनाची दुसरी लाट येण्याची भिती व्यक्त झाल्याने महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला. प्राचार्य व प्राध्यापक संघटनेनी महाविद्यालय सुरू करण्यास विरोध दर्शविला होता. परंतु, जानेवारी महिन्यात पुणे,अहमदनगर व नाशिक या तीनही जिल्ह्यातील महाविद्यालये सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.

------------------------------------

कोरोनाबाबत आवश्यक काळजी राज्यातील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.आवश्यक खबरदारी घेऊन जानेवारी महिन्यात तीनही जिल्ह्यातील संलग्न महाविद्यालये सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.परंतु, पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करूनच महाविद्यालये सुरू केली जातील.

डॉ. नितीन करमळकर , कुलगुरू , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,

-----------------------------

शाळा सुरू होत असतील तर महाविद्यालये सुरू करण्यास कोणतीही हरकत नाही. अनेक विद्यार्थी आरोग्याची काळजी घेवून पालकांच्या संमतीने घराबाहेर पडत आहेत. त्यातच बरेच विद्यार्थी आॅनलाईन शिक्षणाला कंटाळले आहेत.त्यामुळे आता महाविद्यालये सुरू करावीत.

- अजय उमरगे, विद्यार्थी