शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

दीड महिन्यात साडेदहा हजार रक्तपिशव्यांचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:11 IST

लसीकरणानंतर रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी समर्थ भारतच्या वतीने १ एप्रिल ते १५ मे या दरम्यान विविध सामाजिक ...

लसीकरणानंतर रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी समर्थ भारतच्या वतीने १ एप्रिल ते १५ मे या दरम्यान विविध सामाजिक संस्था, संघटना, गणेश मंडळे, शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण शंभर शिबिरे घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, प्रत्यक्षात एकशे दहा शिबिरे पार पडली. शिबिरासाठी एकूण १५ हजार ३४७ स्त्री-पुरुषांनी नोंद केली होती. या शिबिरात मातृशक्ती आणि युवा शक्तीचा सहभाग उल्लेखनीय होता.

‘समर्थ भारत’चे संयोजक महेश मानेकर यांनी सांगितले, “लसीकरणा दरम्यानच्या रक्त तुटवड्याची शक्यता लक्षात घेऊन समाजाची गरज पूर्ण करण्यासाठी व्यापक स्तरावर रक्तदान शिबिरे घेतली. विविध गणेश मंडळे, ज्ञाती संस्था, शिक्षण संस्था यांच्या सहकार्यातून शहरभर ११० शिबिरे पार पडली. प्रत्यक्षात शंभर शिबिरांचेच नियोजन होते, मात्र पुणेकरांनी सर्व ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्रेष्ठ दानातली सामाजिक जबाबदारी पुणेकरांनी लीलया पेलली आहे.”

चौकट

एकूण रक्तपिशवी संकलन - १०५२८

सहभागी रक्तपेढी – २०

सहभागी संस्था

सामाजिक - ९८

शिक्षण - १०

विविध राजकीय पक्ष - ३

-----