शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आहुपेच्या साखरमाचीत कोसळली दरड

By admin | Updated: August 7, 2014 23:13 IST

आंबेगाव तालुक्यात आहुपे गावाच्या खाली असलेल्या साखरमाचीजवळ दरड कोसळली. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही.

घोडेगाव : आंबेगाव तालुक्यात आहुपे गावाच्या खाली असलेल्या साखरमाचीजवळ दरड कोसळली. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र साखरमाचीकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. भात खाचरे गाडली गेली तसेच घरांना तडे गेले आहेत. दरम्यान, येथील सुमारे 4क् ग्रामस्थांना मुरबाड तालुक्यातील उचले गावात स्थलांतरित करण्यात आले आहे. 
साखरमाचीमध्ये दरड कोसळल्याची बातमी बुधवारी (दि. 6) सकाळी आली. माळीण दुर्घटनेतून थोडे सावरत असलेले प्रशासन व पोलीस यंत्रणा पुन्हा खडबडून जागी झाली. येथे दूरध्वनीद्वारे संपर्क होत नसल्याने कोणाचे काय झाले हे समजत नव्हते. शाश्वत संस्थेचे आनंद कपूर व बाजार समितीचे सभापती प्रकाश घोलप यांचा दिनेश येंधे या ग्रामस्थाशी मोबाईलवर संपर्क झाला. त्याने दिलेल्या माहितीनुसार, साखरमाचीच्या खालच्या बाजूला दरड कोसळली.  त्यामुळे रस्ता पूर्ण बंद झाला आहे. आम्ही काही ग्रामस्थ रस्ता काढत काढत उचल्यात पोहचलो आहोत.  मोठी दरड कोसळल्यामुळे भात खाचरे गाडली गेली आहेत. तसेच काही घरांना तडे गेले आहेत. काही ग्रामस्थ अजूनही गावात अडकले असून, आम्ही काही लोक खाली उचल्यामध्ये मदतीसाठी आलो आहोत, असे त्याने सांगितले.
दरम्यान, उचले गावातील काही लोक साखरमाचीत अडकलेल्या लोकांना आणण्यासाठी गेले आहेत.  यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे साखरमाचीर्पयत पोहचणो अवघड झाले आहे. साखरमाचीतील सर्व ग्रामस्थांना मदत करण्यासाठी मुरबाड तालुक्यातील जिल्हा प्रशासनाला आंबेगावमधील पोलीस व महसूल विभागाने सूचित केले आहे.  विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनीही साखरमाची ग्रामस्थांना सुरक्षित करण्यासाठी व त्यांची उचले गावात राहणो व खाण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रशासन यंत्रणोला सूचित केले आहे. घोडेगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच प्रकाश घोलप, ह.भ.प. पांडुरंग महाराज येवले, जनाबाई उगले यांनी आहुपे गावात जाऊन साखरमाचीमधील परिस्थिती येथील ग्रामस्थांकडून समजून घेतली व आहुपे ग्रामस्थांनाही धीर दिला. (वार्ताहर)
 
2007 पासून या गावच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरु आहे. मागील महिन्यात आंबेगावचे तहसीलदार डी.जी. गोरे यांनी या गावाला भेट देऊन रेशनकार्डवरून कुटुंबियांचे सर्वेक्षण केले. लवकरच या गावचे ठाणो जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील सिद्धगडवाडी येथे पुनर्वसन होणार असल्याचे गोरे यांनी सांगितले.
 
4दरम्यान जुलै 2क्क्7 मध्येही साखरमाची गावाच्या दक्षिण बाजूला खूप मोठी दरड कोसळली होती. तेव्हाही साखरमाची गाव दरडीखाली गाडले गेल्याची बातमी घोडेगावला आली होती. तेव्हाचे प्रांताधिकारी गजानन पाटील व तहसीलदार व आताचे प्रांत अधिकारी डी.बी. कवितके यांनी सर्व मदतकार्य घेऊन साखरमाचीत गेले होते. मात्र साखरमाचीवर नव्हे तर साखरमाचीच्या बाजूला दरड पडल्याचे तेथे गेल्यानंतर निदर्शनास आले. 
 
4साखरमाची ही अवघी 12 ते 15 कुटुंबे असलेली वाडी. पुणो व रायगड जिल्ह्याच्या हद्दीवर आहुपे ते तळकोकण अशा एक हजार दोनशे मीटर उंच कडय़ाच्या मधोमध वसली आहे. 
4येथे पोहचण्यासाठी आहुपेमधून बैलघाट उतरून पायी दीड ते दोन तासात पोहचता येते. हा कडा उतरणो नवख्या माणसाला मोठे आव्हान आहे. 
4अशा अवघड ठिकाणी ही वाडी असल्याने येथे वीज पोहचू शकत नाही अगर रस्ताही होऊ शकत नाही. मात्र शेतीसाठी लोक येथे वर्षानुवर्षे राहत आहेत.