शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

आचारसंहितेचा जिल्हा नियोजनच्या कामांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात नवीन आर्थिक वर्षांतच कोरोना महामारीचे संकट व लाॅकडाऊन जाहीर झाले. यामुळे गेली नऊ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यात नवीन आर्थिक वर्षांतच कोरोना महामारीचे संकट व लाॅकडाऊन जाहीर झाले. यामुळे गेली नऊ महिने विकास निधी खर्च करण्यास मान्यताच मिळाली नाही. राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदार संघाची आचारसंहिता शिथिल होताच शासनाने जिल्हा नियोजन समितीची निधी खर्च करण्यास परवानगी दिली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने देखील तातडीने नियोजन सुरू केले. पण नुकतीच जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, ही आचारसंहिता 18 जानेवारी पर्यंत कायम राहणार आहे. यामुळे आधी कोरोना आणि आता आचारसंहिता यामुळे यंदा विविध विकास कामांना सतत खो मिळत आहे.

पुणे जिल्ह्यासाठी सन 2020-21 साठी 650 कोटीचा विकास आरखडा मंजूर करण्यात आला होता. कोरोनामुळे शासनाने सुरुवातील 33 टक्के निधी केवळ आरोग्यावर

खर्च करण्यास परवानगी देण्यात आली होती. आता पर्यंत जिल्ह्यात 107 कोटी पैकी 70 कोटी आरोग्यावर खर्च केले आहे. आता शासनाने शंभर टक्के खर्चाचे नियोजन करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे मार्च अखेर पर्यंत 650 कोटी सर्वसाधार प्लॅन, याशिवाय आदिवासी उपाययोजना, विशेष घटक योजनाच्या निधीच्या खर्चाचे नियोजन करावे लागणार आहे. शासनाने 15 जानेवारी पर्यंत नियोजन करण्यास सांगितले. आचारसंहितेमुळे आता एक महिना हे नियोजन लांबणीवर पडणार आहे. त्यानंतर आर्थिक वर्ष संपण्यासाठी दोन महिने शिल्लक राहत असल्याने ऐवढा 650 कोटींचा निधी खर्च करण्याचे मोठे आव्हान प्रशासना समोर राहणार आहे.