शहरं
Join us  
Trending Stories
1
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
स्मृती मंधानाचा ट्रॉफी सोबतचा फोटो, हातावर टॅटू..., होणारा नवरा पलाश मुच्छलची पोस्ट व्हायरल
4
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा
5
VIDEO: "दीदी, हा कप तुमच्यासाठी....", हरमनप्रीतचा माजी दिग्गजांसोबत मैदानात जल्लोष
6
व्होडाफोन आयडियाला पुन्हा अच्छे दिन येणार? अमेरिकेन कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारीत; पण एका अटीवर
7
एका पैशाचा खर्च नाही, संकटे-समस्या संपतील; २१ दिवस १ मंत्राचा जप करा, अशक्यही शक्य होईल!
8
३० कोटींच्या उधळपट्टीचा घोटाळा सिद्ध, मुख्यमंत्र्यांचीही परवानगी नाही; रोहित पवार म्हणाले, 'हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढणार'
9
पशुपतिनाथाचे अवतार आणि रक्षेतून प्रगट झाले असे गोरक्षनाथ यांची जयंती; वाचा त्यांचे कार्य!
10
'हेरा फेरी'मधील बाबूरावच्या भूमिकेला कंटाळले परेश रावल, म्हणाले - "५०० कोटींची..."
11
वैकुंठ चतुर्दशी २०२५: श्रीविष्णू-महादेवांचे वरदान, पुण्य लाभेल; ‘असे’ करा व्रत, शुभच घडेल!
12
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
13
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
14
आणखी एक मोठा बस अपघात, भरधाव ट्रकने बसला समोरून दिली धडक, २० जणांचा मृत्यू
15
मोठा निष्काळजीपणा! सरकारी रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर, १ तास मिळाली नाही स्टेपनी; रुग्णाचा तडफडून मृत्यू
16
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
17
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
18
अखेर 'बिग बॉस'मधून प्रणित मोरेची Exit! सलमान खानलाही बसला धक्का, म्हणाला- "तू एलिमिनेट झाला नाहीस, पण..."
19
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
20
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?

आचारसंहिताभंग; ६७ तक्रारी

By admin | Updated: February 16, 2017 02:42 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आतापर्यंत आचारसंहिताभंगाच्या ६७ तक्रारी दाखल झाल्या आहेत.

पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आतापर्यंत आचारसंहिताभंगाच्या ६७ तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारींची शहानिशा केल्यानंतर जिल्ह्यात ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद समन्वय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली.जिल्हा परिषदेच्या ७५ गटांसाठी, तर पंचायत समितीच्या १५० गणांसाठी येत्या २१ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. यासाठी सध्या संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता सुरू असून, उमेदवारांच्या प्रचाराला जोर आल्याने आचारसंहिताभंगाचे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याअंतर्गत हवेली ३, जुन्नर ४, भोर १, इंदापूर १, मुळशी २ तर वेल्ह्यामध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवेलीमध्ये नंदकुमार किसनराव गोते व शिवांजली शिवाजीराव वाळके यांच्याविरोधात विनापरवानगी हळदीकुंकू, जेवणाचा तसेच होममिनिस्टर कार्यक्रम आयोजित केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवेलीतील भाजपाच्या उमेदवार गौरी गायकवाड याच्यावर विनापरवाना रॅली काढल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, उमेदवाराचे नाव व काँग्रेस पक्षाचे चिन्ह विनापरवाना गाडीवर वापरल्याने मयूर जवळकर आणि अक्षय कामठे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वेल्ह्यामध्ये विनापरवाना बॅनर आणि स्पीकर लावल्याने गणेश प्रकाश कोळपे व दिगंबर दिनकर चोरघे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मुळशीमध्ये विनापरवाना मोटारसायकल रॅली काढल्याने गंगाराम कुंडलिक मातेरे, शिवाजी राजाराम बुचडे, तृप्ती मदन साळुंखे आणि अविनाश शिंदे तसेच सागर सोपानराव मारणे, मिनानाथ कानगुडेंसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदापूर येथे गाडीवर विनापरवाना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा व पोस्टर लावल्याने राजेंद्र भाकरे, अमोल लोंड व महेश देवकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. विनापरवाना कोपरासभा घेतल्याने भोर येथे माऊली विठ्ठल शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, जुन्नर येथे दाखल झालेल्या तीन गुन्ह्यांमध्ये विनापरवाना झेंडा लावल्याप्रकरणी शैलेश रखमाजी ढोले, राजेंद्र रघुनाथ घोगरे व प्रथमेश प्रसाद थोरवे यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आचारसंहिताभंगाच्या तक्रारीबाबत जिल्हा प्रशासनाने १०७७ हा हेल्पलाईन नंबर दिला असून, त्यावर नागरिकांना आपली तक्रार फोनद्वारे कळविण्याचे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)