शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

आचारसंहिताभंग; ६७ तक्रारी

By admin | Updated: February 16, 2017 02:42 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आतापर्यंत आचारसंहिताभंगाच्या ६७ तक्रारी दाखल झाल्या आहेत.

पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आतापर्यंत आचारसंहिताभंगाच्या ६७ तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारींची शहानिशा केल्यानंतर जिल्ह्यात ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद समन्वय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली.जिल्हा परिषदेच्या ७५ गटांसाठी, तर पंचायत समितीच्या १५० गणांसाठी येत्या २१ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. यासाठी सध्या संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता सुरू असून, उमेदवारांच्या प्रचाराला जोर आल्याने आचारसंहिताभंगाचे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याअंतर्गत हवेली ३, जुन्नर ४, भोर १, इंदापूर १, मुळशी २ तर वेल्ह्यामध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवेलीमध्ये नंदकुमार किसनराव गोते व शिवांजली शिवाजीराव वाळके यांच्याविरोधात विनापरवानगी हळदीकुंकू, जेवणाचा तसेच होममिनिस्टर कार्यक्रम आयोजित केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवेलीतील भाजपाच्या उमेदवार गौरी गायकवाड याच्यावर विनापरवाना रॅली काढल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, उमेदवाराचे नाव व काँग्रेस पक्षाचे चिन्ह विनापरवाना गाडीवर वापरल्याने मयूर जवळकर आणि अक्षय कामठे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वेल्ह्यामध्ये विनापरवाना बॅनर आणि स्पीकर लावल्याने गणेश प्रकाश कोळपे व दिगंबर दिनकर चोरघे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मुळशीमध्ये विनापरवाना मोटारसायकल रॅली काढल्याने गंगाराम कुंडलिक मातेरे, शिवाजी राजाराम बुचडे, तृप्ती मदन साळुंखे आणि अविनाश शिंदे तसेच सागर सोपानराव मारणे, मिनानाथ कानगुडेंसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदापूर येथे गाडीवर विनापरवाना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा व पोस्टर लावल्याने राजेंद्र भाकरे, अमोल लोंड व महेश देवकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. विनापरवाना कोपरासभा घेतल्याने भोर येथे माऊली विठ्ठल शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, जुन्नर येथे दाखल झालेल्या तीन गुन्ह्यांमध्ये विनापरवाना झेंडा लावल्याप्रकरणी शैलेश रखमाजी ढोले, राजेंद्र रघुनाथ घोगरे व प्रथमेश प्रसाद थोरवे यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आचारसंहिताभंगाच्या तक्रारीबाबत जिल्हा प्रशासनाने १०७७ हा हेल्पलाईन नंबर दिला असून, त्यावर नागरिकांना आपली तक्रार फोनद्वारे कळविण्याचे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)