शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

गुटखाबंदीस हवे नागरिकांचे सहकार्य

By admin | Updated: May 3, 2017 23:55 IST

शीतपेयाच्या माध्यमातून आरोग्यास अपाय होऊ नये, यासाठी नागरिक व विक्रेत्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे, असे पुणे विभागाचे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाचे

 राज्यात गुटखा विक्रीस प्रतिबंध असूनही पुणे विभागात गेल्या वर्षभरात ६ कोटी २ लाखांहून अधिक रकमेचा गुटखा कारवाई करून पकडण्यात आला. मात्र, गुटखाबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जागरूक नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. तसेच शीतपेयाच्या माध्यमातून आरोग्यास अपाय होऊ नये, यासाठी नागरिक व विक्रेत्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे, असे पुणे विभागाचे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. देसाई म्हणाले, ‘‘अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शीतपेय तपासणी मोहीम हाती घेण्यात आली असून शहरात निकृष्ट दर्जाच्या शीतपेयांची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे विक्रेत्यांकडून स्वच्छतेबाबत काळजी घेतली जात नसल्याने एफडीएकडून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांनी ज्युस, कुल्फी, नीरा, लिंबू सरबत, आइस्क्रीम, पेप्सी, कँडीसारख्या शीतपेय पदार्थांची खरेदी परवानाधारकांकडून करणे आवश्यक आहे.’’खाण्यासाठी योग्य असलेल्या आणि उद्योगांसाठी लागणाऱ्या अशा दोन प्रकारच्या बर्फाची निर्मिती शहरात केली जाते, असे नमूद करून देसाई म्हणाले, ‘‘पिण्यायोग्य पाण्यापासून तयार केलेल्या बर्फाचा वापर शीतपेयांमध्ये करणे आवश्यक आहे. परंतु, शहरातील काही हॉटेलमध्ये पिण्यासाठी अयोग्य असणाऱ्या पाण्यापासून तयार केलेला आणि उद्योगांसाठी उपयुक्त असणाऱ्या बर्फाचा वापर केल्या जात असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे ग्राहकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असून शीतपेय विक्रेत्यांनीही आपण कोणत्या बर्फाचा वापर कारतो, हे तपासून घेणे गरजेचे आहे. राज्यात गुटखा विक्रीस बंदी असूनही पुणे विभागात मोठ्या प्रमाणावर गुटख्याचे साठे पकडले जात आहेत,’’ असे नमूद करून देसाई म्हणाले, ‘‘गेल्या वर्षभरात पुणे विभागात ६ कोटी २ लाख ५१ हजार ६६२ रुपयांचा गुटखा पकडण्यात आला. त्यात एकट्या पुणे जिल्ह्यातील २ कोटी २९ लाख ९९ हजार रुपयांच्या गुटख्याचा समावेश आहे. विभागासह जिल्ह्यात बेकायदेशीरपणे गुटखा विक्रीसाठी आणला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी गुटख्याची विक्री केली जात असल्यास एफडीएच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती एफडीएला कळवावी. एफडीएचे अधिकारी तत्काळ संबंधित ठिकाणी जाऊन कारवाई करतील. सर्वसामान्य नागरिकांच्या सहकार्याने गुटखाबंदीची अधिक प्रभावी अंमलबजावणी केली जाऊ शकते.’’‘‘पुण्यासह राज्यात ठिकठिकाणी प्लॅस्टिकची अंडी विकली जात असल्याची अफवा पसरल्याचे दिसून येत आहे. मात्र, नागरिकांच्या तक्रारीनुसार पिंपरी-चिंचवड आणि कोथरूड येथील नागरिकांच्या तक्रारीवरून संबंधित ठिकाणच्या अंड्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. कल्याण डोंबिवली येथेही अशी अफवा पसरली होती. मात्र, अद्याप एकाही ठिकाणी प्लॅस्टिकच्या अंड्यांची विक्री केली जात असल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये,’’ असेही आवाहन देसाई यांनी केले.एफडीएकडून बनावट पाणी बॉटल्स विक्रेत्यांवर व उत्पादकांवरही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांनी कोणताही परवाना न घेता विकल्या जाणाऱ्या पाण्याच्या बॉटल्स घेऊ नयेत. ‘कॅल्शियम कार्बाईड’चा वापर करून कृत्रिम पद्धतीने आंबा पिकवणे गुन्हा आहे. नागरिकांच्या आयोग्याचा विचार करून शहरात विकल्या जाणाऱ्या आंब्यांचे काही नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. आंब्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी देण्यात आले आहेत, असेही देसाई यांनी सांगितले.प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी फिरते न्यायालय हा उपक्रम राबविला जात आहे. त्यामुळे सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यातील नागरिकांचा फायदा होत आहे. नागरिकांना गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी एफडीएचे अधिकारी सदवै कार्यरत आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या कुटुंबाच्या आरोग्याच्या हिताचा विचार करून अयोग्य व बेकायदेशीररीत्या विकल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांची माहिती एफडीएला कळवावी, असेही देसाई म्हणाले.