शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
3
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
4
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
5
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
6
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
7
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
8
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
9
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
10
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
11
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
12
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
13
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
14
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
15
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
16
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
17
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
18
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
19
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
20
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?

ढगाळ वातावरणाचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:08 IST

सुपे: मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनावर याचा ...

सुपे: मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनावर याचा परिणाम होणार असल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. यावर्षी मंडलांतर्गत ज्वारीचे सुमारे ५ हजार हेक्टर क्षेत्र घटले आहे.

यावर्षी रब्बी हंगामातील पिकांना सुरुवातीला पावसाने बाधिकार झाला आहे. मात्र, त्यानंतर थंडी नसल्याने पिकांवर परिणाम झाल्याने शेतकरीवर्ग धास्तावला आहे. या परिसरात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. या जिरायती भागाला चारपैसे मिळवून देणारे पीक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते. येथील बाजारपेठ कांद्यावरच अवलंबून असते. मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याची रोपे गेली. तर अनेक शेतकऱ्यांनी महागाचे कांद्याचे बी आणूनही पावसामुळे गेले. त्याचा परिणाम येथील बाजारपेठेवर झाला आहे. या परिसरातील कांद्यावर ढगाळ वातावणाचा परिणाम होऊन करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कांद्याची पोषण क्षमता कमी झाली आहे. या वातावरणाचा परिणाम उत्पादन क्षमतेवर झाला असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा आणि गहू आदी पिकांना या वातावरणाचा फटका बसला आहे.

दरम्यान, सुपे येथील कृषी मंडल अधिकारी सुभाष बोराटे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की सुपे मंडल अंतर्गत सुमारे २७ गावे येतात. या मंडलमध्ये सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्र रब्बीसाठी आहे. या क्षेत्रापैकी १७ हजार हेक्टर क्षेत्र ज्वारी पिकासाठी तर राहिलेल्या क्षेत्रात गहू, हरबरा आणि कांदा पिके घेतली जातात. मात्र यावर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे १२ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे. तर राहिलेल्या क्षेत्रात कांदा, गहू, हरबरा करण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी ज्वारीचे सुमारे ५ हजार हेक्टर क्षेत्र घटले आहे.

उत्पादनावर परिणाम होण्याची भीती

काही दिवसांपासून ढगाळ हवामान तयार होत आहे. त्याचा फटका कांदा, हरभरा, गहू आणि गोट कांदा पिकाला मोठ्या प्रमाणात बसत आहे. थंडी गायब झाल्यामुळे पेरलेल्या हरबरा पिकाची वाढ खुंटत असून अळीचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे थंडी मोठ्या प्रमाणात पडली तर पिके उभारी घेतील, अन्यथा उत्पादनावर याचा परिणाम होईल असे कृषी मंडल अधिकारी सुभाष बोराटे यांनी दिली.

सुपे परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्वारीच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.

०९०१२०२१-बारामती-१४

------------------------------