शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

ढगाळ वातावरणाचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:08 IST

सुपे: मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनावर याचा ...

सुपे: मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनावर याचा परिणाम होणार असल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. यावर्षी मंडलांतर्गत ज्वारीचे सुमारे ५ हजार हेक्टर क्षेत्र घटले आहे.

यावर्षी रब्बी हंगामातील पिकांना सुरुवातीला पावसाने बाधिकार झाला आहे. मात्र, त्यानंतर थंडी नसल्याने पिकांवर परिणाम झाल्याने शेतकरीवर्ग धास्तावला आहे. या परिसरात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. या जिरायती भागाला चारपैसे मिळवून देणारे पीक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते. येथील बाजारपेठ कांद्यावरच अवलंबून असते. मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याची रोपे गेली. तर अनेक शेतकऱ्यांनी महागाचे कांद्याचे बी आणूनही पावसामुळे गेले. त्याचा परिणाम येथील बाजारपेठेवर झाला आहे. या परिसरातील कांद्यावर ढगाळ वातावणाचा परिणाम होऊन करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कांद्याची पोषण क्षमता कमी झाली आहे. या वातावरणाचा परिणाम उत्पादन क्षमतेवर झाला असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा आणि गहू आदी पिकांना या वातावरणाचा फटका बसला आहे.

दरम्यान, सुपे येथील कृषी मंडल अधिकारी सुभाष बोराटे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की सुपे मंडल अंतर्गत सुमारे २७ गावे येतात. या मंडलमध्ये सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्र रब्बीसाठी आहे. या क्षेत्रापैकी १७ हजार हेक्टर क्षेत्र ज्वारी पिकासाठी तर राहिलेल्या क्षेत्रात गहू, हरबरा आणि कांदा पिके घेतली जातात. मात्र यावर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे १२ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे. तर राहिलेल्या क्षेत्रात कांदा, गहू, हरबरा करण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी ज्वारीचे सुमारे ५ हजार हेक्टर क्षेत्र घटले आहे.

उत्पादनावर परिणाम होण्याची भीती

काही दिवसांपासून ढगाळ हवामान तयार होत आहे. त्याचा फटका कांदा, हरभरा, गहू आणि गोट कांदा पिकाला मोठ्या प्रमाणात बसत आहे. थंडी गायब झाल्यामुळे पेरलेल्या हरबरा पिकाची वाढ खुंटत असून अळीचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे थंडी मोठ्या प्रमाणात पडली तर पिके उभारी घेतील, अन्यथा उत्पादनावर याचा परिणाम होईल असे कृषी मंडल अधिकारी सुभाष बोराटे यांनी दिली.

सुपे परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्वारीच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.

०९०१२०२१-बारामती-१४

------------------------------