शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
3
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
4
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
5
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
6
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
7
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
8
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
9
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
10
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
11
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
12
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
13
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
14
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
15
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
16
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
17
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
18
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
19
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
20
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणाचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:08 IST

सुपे: मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनावर याचा ...

सुपे: मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनावर याचा परिणाम होणार असल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. यावर्षी मंडलांतर्गत ज्वारीचे सुमारे ५ हजार हेक्टर क्षेत्र घटले आहे.

यावर्षी रब्बी हंगामातील पिकांना सुरुवातीला पावसाने बाधिकार झाला आहे. मात्र, त्यानंतर थंडी नसल्याने पिकांवर परिणाम झाल्याने शेतकरीवर्ग धास्तावला आहे. या परिसरात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. या जिरायती भागाला चारपैसे मिळवून देणारे पीक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते. येथील बाजारपेठ कांद्यावरच अवलंबून असते. मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याची रोपे गेली. तर अनेक शेतकऱ्यांनी महागाचे कांद्याचे बी आणूनही पावसामुळे गेले. त्याचा परिणाम येथील बाजारपेठेवर झाला आहे. या परिसरातील कांद्यावर ढगाळ वातावणाचा परिणाम होऊन करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कांद्याची पोषण क्षमता कमी झाली आहे. या वातावरणाचा परिणाम उत्पादन क्षमतेवर झाला असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा आणि गहू आदी पिकांना या वातावरणाचा फटका बसला आहे.

दरम्यान, सुपे येथील कृषी मंडल अधिकारी सुभाष बोराटे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की सुपे मंडल अंतर्गत सुमारे २७ गावे येतात. या मंडलमध्ये सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्र रब्बीसाठी आहे. या क्षेत्रापैकी १७ हजार हेक्टर क्षेत्र ज्वारी पिकासाठी तर राहिलेल्या क्षेत्रात गहू, हरबरा आणि कांदा पिके घेतली जातात. मात्र यावर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे १२ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे. तर राहिलेल्या क्षेत्रात कांदा, गहू, हरबरा करण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी ज्वारीचे सुमारे ५ हजार हेक्टर क्षेत्र घटले आहे.

उत्पादनावर परिणाम होण्याची भीती

काही दिवसांपासून ढगाळ हवामान तयार होत आहे. त्याचा फटका कांदा, हरभरा, गहू आणि गोट कांदा पिकाला मोठ्या प्रमाणात बसत आहे. थंडी गायब झाल्यामुळे पेरलेल्या हरबरा पिकाची वाढ खुंटत असून अळीचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे थंडी मोठ्या प्रमाणात पडली तर पिके उभारी घेतील, अन्यथा उत्पादनावर याचा परिणाम होईल असे कृषी मंडल अधिकारी सुभाष बोराटे यांनी दिली.

सुपे परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्वारीच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.

०९०१२०२१-बारामती-१४

------------------------------