शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या ओढीने राज्यात चिंतेचे ‘ढग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पावसाळा सुरू झाल्यानंतर प्रथमच राज्यात शुक्रवारी सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील रविवारपर्यंत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पावसाळा सुरू झाल्यानंतर प्रथमच राज्यात शुक्रवारी सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील रविवारपर्यंत अशीच परिस्थिती राहणार असून ११ जुलैनंतर राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्याचबरोबर पोषक वातावरण नसल्याने २० जूनपासून मॉन्सूनमध्ये कोणतीही प्रगती झालेली नाही. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चिंतेचे ढग दाटून आले आहेत.

शनिवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत कोकणातील पणजी, राजापूर येथे हलका पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा आणि पन्हाळा येथे पावसाची नोंद झाली असून विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस झाला होता. कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी रिमझिम सरी बरसल्या.

गेल्या आठवड्यात (२४ ते ३० जून) कोकण, मध्य महाराष्ट्रातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या घाटमाथ्यासह विदर्भात मोठ्याप्रमाणावर पावसाने ओढ दिली आहे. अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, जालना, जळगाव, औरंगाबाद या ६ जिल्ह्यांत गेल्या आठवड्यात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यात पावसात ६० टक्क्यांहून अधिक तूट आढळून आली आहे. १४ जिल्ह्यांमध्ये २० टक्क्यांहून अधिक प्रमाणात कमी पाऊस झाला आहे.

यामुळे होत नाही पाऊस

याबाबत हवामान शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, विषवृत्तीय भागातील आफ्रिकेत पावसाला सुरुवात झाली की तेथील शुष्क हवा आपल्याकडे ढकलली जाते. या हवेत धुलीकणांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे आकाशात काळे ढग दिसत असले तरी ते उंचावर जाण्यास हे धुलीकण रोखतात. ढगांची निर्मिती झाली या ढगांमध्ये बाष्प असले तरी बाहेरील हवेतील शुष्क हवा त्यांचे थेंबात रुपांतर करण्यापासून रोखले जाते. त्या ढगांमधील पाणी कमी होते. त्यामुळे पाऊस पडण्यासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण तयार होत नाही. त्यामुळे आकाशात काळे ढग दिसले तरी सध्या पाऊस पडताना दिसत नाही.

सध्याची स्थिती अजून ११ जुलैपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

कोकणामध्ये पावसाळ्यात नेहमीच पाऊस पडत असतो. मात्र, सध्याच्या स्थितीमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पुढील चार दिवस कोकणात कोठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

६ व ७ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस होऊन तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

मराठवाडा व विदर्भात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

...

पुढील २ आठवड्यांचा पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे, त्यात पहिल्या आठवड्यात (२ ते ८ जुलै) कोकणात सरासरीपेक्षा कमी, मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी ते सरासरी इतका, मराठवाड्याच्या पूर्व भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.

दुसऱ्या आठवड्यात (९ ते १५ जुलै) पावसाला सुरुवात होणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. पश्चिम विदर्भात अधिक तर पूर्व विदर्भात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.