शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

दहा साखर कारखान्यांची धुराडी बंद

By admin | Updated: February 12, 2017 04:38 IST

जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांपैकी १० कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. दर वर्षी एप्रिल महिन्यात बंद होणाऱ्या साखर कारखान्याने चालू वर्षी उसाअभावी जानेवारी

सोमेश्वरनगर : जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांपैकी १० कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. दर वर्षी एप्रिल महिन्यात बंद होणाऱ्या साखर कारखान्याने चालू वर्षी उसाअभावी जानेवारी महिन्यातच बंद करावे लागले आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यातील कारखान्यांनी मिळून ४५ लाख ६६ हजार मे.टन उसाचे गाळप करून ४९ लाख ८१ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. जिल्ह्यातील घोडगंगा, दौंड शुगर, कर्मयोगी, नीरा भीमा, व्यंकटेश्वर शुगर, अनुराज शुगर, श्रीनाथ म्हस्कोबा, बारामती अ‍ॅग्रो, छत्रपती आणि राजगड या साखर कारखान्यांनी आपल्या गाळप हंगामाची सांगता करत कारखान्यांची धुराडी बंद केली आहेत. तर चालू हंगामात भीमा पाटस कारखाना बंद होता. चालू गळीत हंगामात राज्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाचे क्षेत्र घटल्याचे चित्र होते.जास्तीत जास्त ऊस मिळविण्यासाठी अनेक कारखान्यांनी एकमेकांच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी करत त्याच ठिकाणी तंबू ठोकले होते. तर ऊसउत्पादकांना जादा पैशांचे आमिष दाखवून ऊस मिळविण्यासाठी संचालक मंडळ, शेतकी विभागाने रात्रंदिवस धडपड केली. कारखाने सुरू झाल्यापासून संचालक मंडळ शेतकी विभागांना हताशी धरून बैठक घेत असून रोजची रणनीती आखत आहे. कारखान्यांनी बाहेरील गेटकेन ऊस कसा आपल्या कारखान्यांला जास्तीत जास्त मिळवता येईल, याकडे कारखान्यांचे लक्ष लागले आहे. ऊसाचे घटलेले क्षेत्र आणि साखरेला असलेला चांगला भाव याकडे जादा गाळप करण्यासाठी कारखाने धडपडत होते. चालू हंगामात जो कारखाना जादा ऊसाचे गाळप करणार त्या कारखान्याला अधिक नफा होणार त्यामुळे जवळपास सर्वच साखर कारखान्यांनी आपल्या जवळील साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी केली होती. अनेक कारखान्यांनी जागेवरच ‘काटा पेमेंट’ देण्याचे चालू केले आहे. गेल्या हंगामात ऊसउत्पादकांना दोन टप्यात एफआरपी देणारे कारखाना या वर्षी एकरकमी एका टनाला २८०० ते ३ हजार रूपये रोखीने ऊसउत्पादकांना मोजले. तसेच चालू हंगामात थंडीचे प्रमाण चांगले असल्याने ऊसाचा गोडवा वाढला होता. जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांचे ‘डे’ चे साखर उतारा सव्वा बारावर गेले आहेत. सर्व मिळून ४५ लाख ६६ हजार २९७ में. टन ऊसाचे गाळप करून ४९ लाख ८१ हजार २८३ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. नोव्हेंबर ते जानेवारी या दरम्यान समजल्या जाणाऱ्या ‘हाय रीकव्हरी पिरेड’ मध्ये जिल्ह्यातील अनेक कारखाने साखर उताऱ्यात अकरा ते साडे अकरा टककयांवर पोहचले.सध्या सोमेश्वर, माळेगाव, विघ्नहर, भिमाशंकर, संत तुकाराम या पाच कारखान्यांचेच गाळप सुरू आहे. सोमेश्वरने मारली बाजी...सरासरी साखर उताऱ्यातही ११.५२ टक्क्यांचा उतारा ठेवत सोमेश्वरने बाजी मारली आहे. ११.३१ टक्केचा साखर उतारा ठेवत विघ्नहर कारखान्याने दुसरा, तर माळेगाव कारखान्याने ११.२४ टक्के साखर उतारा ठेवत तिसरा क्रमांक पटकाविला आहे.