शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

दहा साखर कारखान्यांची धुराडी बंद

By admin | Updated: February 12, 2017 04:38 IST

जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांपैकी १० कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. दर वर्षी एप्रिल महिन्यात बंद होणाऱ्या साखर कारखान्याने चालू वर्षी उसाअभावी जानेवारी

सोमेश्वरनगर : जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांपैकी १० कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. दर वर्षी एप्रिल महिन्यात बंद होणाऱ्या साखर कारखान्याने चालू वर्षी उसाअभावी जानेवारी महिन्यातच बंद करावे लागले आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यातील कारखान्यांनी मिळून ४५ लाख ६६ हजार मे.टन उसाचे गाळप करून ४९ लाख ८१ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. जिल्ह्यातील घोडगंगा, दौंड शुगर, कर्मयोगी, नीरा भीमा, व्यंकटेश्वर शुगर, अनुराज शुगर, श्रीनाथ म्हस्कोबा, बारामती अ‍ॅग्रो, छत्रपती आणि राजगड या साखर कारखान्यांनी आपल्या गाळप हंगामाची सांगता करत कारखान्यांची धुराडी बंद केली आहेत. तर चालू हंगामात भीमा पाटस कारखाना बंद होता. चालू गळीत हंगामात राज्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाचे क्षेत्र घटल्याचे चित्र होते.जास्तीत जास्त ऊस मिळविण्यासाठी अनेक कारखान्यांनी एकमेकांच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी करत त्याच ठिकाणी तंबू ठोकले होते. तर ऊसउत्पादकांना जादा पैशांचे आमिष दाखवून ऊस मिळविण्यासाठी संचालक मंडळ, शेतकी विभागाने रात्रंदिवस धडपड केली. कारखाने सुरू झाल्यापासून संचालक मंडळ शेतकी विभागांना हताशी धरून बैठक घेत असून रोजची रणनीती आखत आहे. कारखान्यांनी बाहेरील गेटकेन ऊस कसा आपल्या कारखान्यांला जास्तीत जास्त मिळवता येईल, याकडे कारखान्यांचे लक्ष लागले आहे. ऊसाचे घटलेले क्षेत्र आणि साखरेला असलेला चांगला भाव याकडे जादा गाळप करण्यासाठी कारखाने धडपडत होते. चालू हंगामात जो कारखाना जादा ऊसाचे गाळप करणार त्या कारखान्याला अधिक नफा होणार त्यामुळे जवळपास सर्वच साखर कारखान्यांनी आपल्या जवळील साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी केली होती. अनेक कारखान्यांनी जागेवरच ‘काटा पेमेंट’ देण्याचे चालू केले आहे. गेल्या हंगामात ऊसउत्पादकांना दोन टप्यात एफआरपी देणारे कारखाना या वर्षी एकरकमी एका टनाला २८०० ते ३ हजार रूपये रोखीने ऊसउत्पादकांना मोजले. तसेच चालू हंगामात थंडीचे प्रमाण चांगले असल्याने ऊसाचा गोडवा वाढला होता. जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांचे ‘डे’ चे साखर उतारा सव्वा बारावर गेले आहेत. सर्व मिळून ४५ लाख ६६ हजार २९७ में. टन ऊसाचे गाळप करून ४९ लाख ८१ हजार २८३ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. नोव्हेंबर ते जानेवारी या दरम्यान समजल्या जाणाऱ्या ‘हाय रीकव्हरी पिरेड’ मध्ये जिल्ह्यातील अनेक कारखाने साखर उताऱ्यात अकरा ते साडे अकरा टककयांवर पोहचले.सध्या सोमेश्वर, माळेगाव, विघ्नहर, भिमाशंकर, संत तुकाराम या पाच कारखान्यांचेच गाळप सुरू आहे. सोमेश्वरने मारली बाजी...सरासरी साखर उताऱ्यातही ११.५२ टक्क्यांचा उतारा ठेवत सोमेश्वरने बाजी मारली आहे. ११.३१ टक्केचा साखर उतारा ठेवत विघ्नहर कारखान्याने दुसरा, तर माळेगाव कारखान्याने ११.२४ टक्के साखर उतारा ठेवत तिसरा क्रमांक पटकाविला आहे.