शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

सफाई कामगारांचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: July 23, 2015 04:50 IST

चाकण शहराची नियमित साफसफाई नगर परिषदेच्या सफाई कामगारांकडून करण्यात येते. इतरांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी काम

चाकण : चाकण शहराची नियमित साफसफाई नगर परिषदेच्या सफाई कामगारांकडून करण्यात येते. इतरांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी काम करणाऱ्या या कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या कामगारांना आधी ग्रामपंचायत आणि आता नगर परिषद प्रशासनाकडून कोणत्याही आवश्यक सुविधा मिळत नसल्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. हातात अक्षरश: प्लॅस्टिकच्या पिशव्या, पायात चप्पल घालून कुठल्याही मास्कशिवाय अत्यंत दुर्गंधी येणारा सर्व प्रकारचा कचरा उचलण्याचे काम हे सफाई कामगार कुठलीही तक्रार न करता करीत आहेत.गेल्या काही महिन्यांपासून चाकण शहर व परिसरात आणि लगतच्या वाड्यावस्त्यांमध्ये कचरा साठविण्याकरिता ठिकठिकाणी ठेवलेल्या कचराकुंड्या कमी पडू लागल्या आहेत. परिसरात बहुतांश भागात कचराकुंड्याच ठेवण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे रस्त्यांच्या कडेलाच कचऱ्यांचे मोठे ढीग लागतात. कचराकुंड्या असणाऱ्या भागात लहान-लहान कुंड्या लगेचच ओसंडून जातात. बऱ्याच महाभागांना या कुंड्यांमध्ये कचरा टाकण्याऐवजी सोयीच्या ठिकाणी कचरा टाकणे सोपे वाटते. कचरा उचलण्याची नगर परिषदेची यंत्रणा आजही चांगल्या पद्धतीने कार्यान्वित असतानाही नागरिकांकडून होत असलेल्या दुर्लक्षाने खुद्द प्रशासनही मेटाकुटीस येत असून, सफाई कामगारांचे कंबरडे मोडत आहे. शासनाच्या निणर्यानुसार या कामगारांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या सुविधा पुरवणे प्रशासनाची जबाबदारी आहे. परंतु, येथील नगर परिषद प्रशासनाच्या वतीने सफाई कामगारांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा पुरवण्यात येत नसल्यामुळे त्यांच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. या सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तीन महिन्यांतून किमान एक वेळा तपासणी करणे गरजेचे आहे. सफाई कामगारांच्या आरोग्याविषयी तपासणी होत नसल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. (वार्ताहर)