शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेची ‘झाडाझडती’

By admin | Updated: December 1, 2014 03:45 IST

वेल्हा व मुळशी तालुका १00 टक्के निर्मलग्राम करण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाने केला असून, २६ जानेवारीपर्यंत ही मोहीम फत्ते करण्याचे आश्वासन दिले आहे

वेल्हा व मुळशी तालुका १00 टक्के निर्मलग्राम करण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाने केला असून, २६ जानेवारीपर्यंत ही मोहीम फत्ते करण्याचे आश्वासन दिले आहे. वेल्हे येथे झालेल्या कार्यशाळेत तर पिरंगुट येथे 'पंचायत समिती आपल्या दारी ' या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी वरील आश्वासन दिले आहे.मार्गासनी : जिल्ह्यात वेल्हे तालुका हा सर्वांत अगोदर निर्मलग्राम होणार असून, २६ जानेवारीपर्यंत तालुका निर्मलग्राम करण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाने केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांच्यासह जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, वेल्ह्याच्या सभापती सविता वाडघरे यांनी कार्यशाळा घेऊन हा विश्वास व्यक्त केला. २६ जानेवारीला निर्मलग्राम करूनच राष्ट्रध्वज फडकवला जाणार असल्याची माहिती सभापती सविता वाडघरे यांनी या वेळी दिली.यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली.या कार्यक्रमासाठी महिला व बालकल्याण सभापती वंदना धुमाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकुमार देशमुख, जिल्हा परिषद सदस्या वसुधा नलावडे, सुषमा रेणुसे, माजी सभापती चतुरा नगिने, उपसभापती चंद्रकांत शेंडकर, कुस्तागीर संघाचे अध्यक्ष शंकर भुरुक , राष्ट्रवादी कॉँग्रेसचे युवक अध्यक्ष किरण राऊत, विद्यार्थी सेनेचे प्रमोद लोहकरे, राष्ट्रवादीचे तानाजी मांगडे, वेल्ह्याचे सरपंच संतोष मोरे, राजगड कारखान्याच्या संचालिका शोभाताई जाधव, शिवसेना तालुकााध्यक्ष सुनील जागडे, गटविकास अधिकारी गोकुळदास बैरागी, सहायक गटविकास अधिकारी सतीश गाढवे आदींसह सरपंच, अंगणवाडीताई, ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय सुरवसे यांनी केले. गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांनी आभार केले. (वार्ताहर)