शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

स्वच्छता अभियान नावापुरतेच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 05:24 IST

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी शहरातील काही भागांत राजकीय पक्षाच्या नेत्यांनी स्वच्छता भारत अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम राबविली.

पुणे : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी शहरातील काही भागांत राजकीय पक्षाच्या नेत्यांनी स्वच्छता भारत अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम राबविली. मात्र, कचरा नसलेल्या ठिकाणी राजकीय नेत्यांकडून झाडू फिरवला जात असल्याचे दिसून येत आहे. केंद्र शासनातर्फे देशभर राबविल्या जाणाºया स्वच्छ भारत अभियानाचा उद्देश चांगला असला तरी त्याचा उपयोग केवळ राजकारण आणि प्रसिद्धीसाठी होत असल्याने त्यावर टीका होत आहे.देशातील नागरिकांचा राहणीमानाचा दर्जा वाढविण्यासाठी शासनातर्फे स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. तसेच या अभियानास तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता हीच सेवा’ ही मोहीम राबविण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, केवळ महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्तच राजकीय पक्षाचे नेते रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. वर्षभर पहाटे उठून शहरात स्वच्छता करणाºया पालिकेच्या व स्वयंसेवी संस्थेच्या कामगारांचा नेत्यांना विसर पडल्याचे दिसून आले.गेल्या अनेक वर्षांपासून पुण्याच्या कचºयाचा प्रश्न सुटलेला नाही. शहरात दररोज जमा होणाºया सुमारे सोळाशे टन कचºयापैकी पालिकेतर्फे सुमारे ६०० ते ७०० टन कचºयावरच प्रक्रिया केली जात आहे. उर्वरित कचरा शहरालगतच्या कचरा डेपोत टाकला जात आहे. त्यातच कचरा गोळा करणाºया कामगारांच्या आरोग्याला हानी पोहेचू नये, यासाठी त्यांना आवश्यक साहित्य देण्याबाबत पालिका प्रशासनाकडून गांभीर्य दाखविले जात नाही. स्वच्छता राखणाºया कामगारांना नोकरीची शाश्वती नाही. नियमित वेतन देण्याबाबतही काळजी घेतली नाही.शहरातील पेठांमध्ये व उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी कचरा पेटी तुडुंब भरून वाहत आहेत. रस्त्यालगतच्या कचरा पेटीसह गल्लीतील कचरा पेटीजवळ दुर्गंधी पसरली आहे. मात्र, या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्याऐवजी इतर ठिकाणीच झाडू घेऊन नेते फोटो काढून घेतले असल्याने सोशल मीडियावरूनही टीका केली आहे. स्वच्छता मोहिमेच्या कार्यक्रमात काही नेत्यांनी स्वत:ची ताकद दाखविण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे स्वच्छता अभियान हे नावापुरतेच राहिले का? असा प्रश्न उपस्थित झाला.