शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

स्वच्छ पुरस्काराला लोकप्रतिनिधींनी जागायला हवे

By admin | Updated: February 19, 2016 01:15 IST

स्वच्छ शहरात महापालिका अव्वल ठरली, ही आनंदाची बाब आहे. या पुरस्काराने आपली जबाबदारी वाढली आहे. पुरस्काराला जागायला हवे

पिंपरी : स्वच्छ शहरात महापालिका अव्वल ठरली, ही आनंदाची बाब आहे. या पुरस्काराने आपली जबाबदारी वाढली आहे. पुरस्काराला जागायला हवे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांचा सहभाग घेऊन पुढील वर्षी देशात पहिल्या पाचमध्ये कसे येऊ, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाल्याबद्दल शहरातील विविध संस्था, संघटना, समाजातील विविध घटकांनी पुरस्काराचे कौतुक केले आहे, तर काहींनी कडवट टीकाही केली आहे. देशात नववा आणि राज्यात पहिला पुरस्कार मिळाला असला, तरी वास्तवाचे भान महापालिका प्रशासनाने ठेवायला हवे. हा पुरस्कार मॅनेज असल्याची टीका काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. पुरस्कारावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असले, तरी पुरस्काराने जागतिक पातळीवर शहराचा लौकिक वाढला आहे, असही मत व्यक्त केले. पुरस्काराचे सातत्य टिकवून ठेवायला हवे. शहर कायमस्वरूपी स्वच्छ कसे राहील, या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.(प्रतिनिधी)आपल्या शहराची मेट्रो सिटी स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. शहराचा विकास खरोखरच चांगला आहे. सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून आपल्या शहराचा लौकिक देशात आणि परदेशात आहे. ज्या प्रमाणात महापालिका स्वच्छतेवर खर्च करते, त्या तुलनेत स्वच्छता होते का? ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. स्वच्छतेबाबत आणखी प्रयत्नांची गरज आहे. महापालिकेने सामाजिक संस्थांचा सहभाग घेऊन विकासात योगदान द्यायला हवे. -विजय पाटील (अध्यक्ष, प्राधिकरण नागरी कृती समिती)