शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

स्वच्छ भारत, राष्ट्रीय एकता दिनाला थंडा प्रतिसाद?

By admin | Updated: November 2, 2014 00:08 IST

स्वच्छ भारत अभियान आणि राष्ट्रीय एकता दिन साजरा करून त्या संदर्भातील अहवाल पुणो विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयास सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.

पुणो : स्वच्छ भारत अभियान आणि राष्ट्रीय एकता दिन साजरा करून त्या संदर्भातील अहवाल पुणो विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयास सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पुणो, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील केवळ बोटावर मोजता येतील एवढय़ाच अनुदानित महाविद्यालयांनी या बाबतचे अहवाल जमा केले आहेत. त्यामुळे महाविद्यालयांकडून या अभियानास प्रतिसाद मिळाला नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे. त्याचप्रमाणो शासनाच्या आदेशाला महाविद्यालयांनी  केराची टोपली दाखवल्याची माहितीसुद्धा यामुळे समोर आली आहे.
केंद्र शासनाच्या आदेशानुसार देशातील सर्व शैक्षणिक संस्थांनी महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छ भारत अभियान आणि सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करून विविध कार्यक्रम आयोजित करणो बंधनकारक होते. 
तसेच स्वच्छ भारत अभियान आणि  राष्ट्रीय एकता दिवस या निमित्त राबविलेल्या उपक्रमांचा अहवाल त्याच दिवशी वरिष्ठ कार्यालयास कळवणो अपेक्षित होते. मात्र, स्वच्छ भारत अभियानास सुरुवात होऊन तब्बल एक महिन्याचा कालावधी उलटून गेला तरीही केवळ 15 महाविद्यालयांनी यासंदर्भात राबविलेल्या उपक्रमांचा अहवाल उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयास सादर केला आहे. त्यामुळे या अभियानाचा सर्व क्षेत्रतून मोठा गवगवा केला जात असला, तरी प्रत्यक्षात महाविद्यालयांनी या अभियानात सहभाग घेतला नसल्याचे सहसंचालक कार्यालयास प्राप्त झालेल्या अहवालांच्या संख्येवरून दिसून येत आहे. 
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वतंत्रता चळवळीमध्ये व त्यानंतर अखंड भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या मौलिक  योगदानाचा गौरव व्हावा तसेच जनतेला त्यांच्या कामगिरीतून प्रेरणा मिळावी या दृष्टीने त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस 
साजरा करण्याचे आदेश केंद्र 
शासनाने दिले होते. तसेच 
त्यावरील अहवाल त्याच दिवशी 
सादर करण्याचे आदेशही सहसंचालक कार्यालयाकडून दिले गेले होते, 
परंतु आतार्पयत केवळ 7 महाविद्यालयांनीच यावरील अहवाल सादर केले आहेत.(प्रतिनिधी)
 
पुणो विभागीय उच्च शिक्षणासह संचालक कार्यालयांर्तगत 165 अनुदानित महाविद्यालये येतात. त्यातील केवळ 15 महाविद्यालयांनी स्वच्छ भारत अभियानांर्तगत राबविलेल्या उपक्रमांचा अहवाल पाठविला आहे. तर 7 महाविद्यालयांनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त राबविलेल्या उपक्रमांची माहिती कळविली आहे. सर्व महाविद्यालयांनी अहवाल तात्काळ सादर करावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. 
-  डॉ.सुनील शेटे, उच्च शिक्षण  सहसंचालक,पुणो विभाग.