शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

स्वच्छ भारत अभियान कागदावरच

By admin | Updated: October 2, 2015 00:54 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’स २ आॅक्टोबर २०१४ रोजी धूमधडाक्यात सुरुवात झाली. नागरिकांना स्वच्छतेची सवय लागून आरोग्यदायी पर्यावरण व्हावे

मावळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’स २ आॅक्टोबर २०१४ रोजी धूमधडाक्यात सुरुवात झाली. नागरिकांना स्वच्छतेची सवय लागून आरोग्यदायी पर्यावरण व्हावे, हा यामागचा हेतू. पण, प्रसिद्धीसाठीच या अभियानाचा उपयोग शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था आणि पुढाऱ्यांनी केल्याचे वर्षभराचा आढावा घेतल्यानंतर स्पष्ट होत आहे. काही अपवाद वगळता परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. मावळ तालुक्यातील ठिकठिकाणच्या स्थितीचा घेतलेला हा आढावा.ंतळेगाव दाभाडे- स्टेशन : ‘अस्वच्छता करणार नाही आणि करूही देणार नाही’, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेने भारतभर गतवर्षी २ आॅक्टोबरला सुरू झालेल्या ‘स्वच्छ भारत अभियाना’चा तळेगाव नगर परिषदेची अनभिज्ञता आणि नागरिकांचे असहकार्य यामुळे फज्जा उडाला आहे. उद्घाटनाच्या वेळी ‘नमनाला घडाभर तेल’ वापरत गाजावाजा करण्यात आलेली ही मोहीम नंतर कागदावरच राहिल्याने सगळीकडे अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून, रोगराईची भीती निर्माण झाली आहे.स्टेशन विभागातील स्वराजनगरीपासूून ते थेट माळवाडीपर्यंत चाकण रस्त्यावरील जागोजागी कचराकुंड्या ओसंडून वाहत आहेत. जलवाहिन्यांच्या व्हॉल्व्हची गळती होऊन पाणी वाहून काही ठिकाणी रस्त्याला गटाराची अवकळा आली आहे. जनरल हॉस्पिटल कंपाउंडच्या कडेला दुकानदार, हॉटेलवाले, फेरीवाले फेकत असलेला कचरा, मंडईजवळ कचरा, गाडीबाहेर ओसंडून वाहणारा कचरा, स्वामी समर्थ मंदिराच्या समोर जोशीवाडी रिंग रोडवर कुंडीपेक्षा बाजूला पडलेला कचरा, अंबिका पार्कजवळ प्रस्तावित रेल्वे फाटकाजवळ ड्रेनेजची ओतली जाणारी घाण या व अशा अनेक ठिकाणी नगर परिषदेचे दुर्लक्ष झाले आहे. कर्मचारी- अधिकारी कितीही दावा करत असले, तरी अभियानाबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे तीन तेरा वाजल्याचे या बाबी स्पष्ट करीत आहेत. दैनंदिन स्वच्छतेकडे नगर परिषदेने जरी लक्ष दिले, तरी अभियानापेक्षाही त्याचा अधिक परिणाम होईल, असे बोलले जाते. मोजक्या स्वच्छतागृहांत पाय ठेवायलाही अंगावर काटा येतो. नगर परिषदेलाच दोष देऊन उपयोग नाही. नागरीकांचीही जबाबदारीआहे.