शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

स्वच्छ भारत अभियान कागदावरच

By admin | Updated: October 2, 2015 00:54 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’स २ आॅक्टोबर २०१४ रोजी धूमधडाक्यात सुरुवात झाली. नागरिकांना स्वच्छतेची सवय लागून आरोग्यदायी पर्यावरण व्हावे

मावळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’स २ आॅक्टोबर २०१४ रोजी धूमधडाक्यात सुरुवात झाली. नागरिकांना स्वच्छतेची सवय लागून आरोग्यदायी पर्यावरण व्हावे, हा यामागचा हेतू. पण, प्रसिद्धीसाठीच या अभियानाचा उपयोग शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था आणि पुढाऱ्यांनी केल्याचे वर्षभराचा आढावा घेतल्यानंतर स्पष्ट होत आहे. काही अपवाद वगळता परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. मावळ तालुक्यातील ठिकठिकाणच्या स्थितीचा घेतलेला हा आढावा.ंतळेगाव दाभाडे- स्टेशन : ‘अस्वच्छता करणार नाही आणि करूही देणार नाही’, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेने भारतभर गतवर्षी २ आॅक्टोबरला सुरू झालेल्या ‘स्वच्छ भारत अभियाना’चा तळेगाव नगर परिषदेची अनभिज्ञता आणि नागरिकांचे असहकार्य यामुळे फज्जा उडाला आहे. उद्घाटनाच्या वेळी ‘नमनाला घडाभर तेल’ वापरत गाजावाजा करण्यात आलेली ही मोहीम नंतर कागदावरच राहिल्याने सगळीकडे अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून, रोगराईची भीती निर्माण झाली आहे.स्टेशन विभागातील स्वराजनगरीपासूून ते थेट माळवाडीपर्यंत चाकण रस्त्यावरील जागोजागी कचराकुंड्या ओसंडून वाहत आहेत. जलवाहिन्यांच्या व्हॉल्व्हची गळती होऊन पाणी वाहून काही ठिकाणी रस्त्याला गटाराची अवकळा आली आहे. जनरल हॉस्पिटल कंपाउंडच्या कडेला दुकानदार, हॉटेलवाले, फेरीवाले फेकत असलेला कचरा, मंडईजवळ कचरा, गाडीबाहेर ओसंडून वाहणारा कचरा, स्वामी समर्थ मंदिराच्या समोर जोशीवाडी रिंग रोडवर कुंडीपेक्षा बाजूला पडलेला कचरा, अंबिका पार्कजवळ प्रस्तावित रेल्वे फाटकाजवळ ड्रेनेजची ओतली जाणारी घाण या व अशा अनेक ठिकाणी नगर परिषदेचे दुर्लक्ष झाले आहे. कर्मचारी- अधिकारी कितीही दावा करत असले, तरी अभियानाबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे तीन तेरा वाजल्याचे या बाबी स्पष्ट करीत आहेत. दैनंदिन स्वच्छतेकडे नगर परिषदेने जरी लक्ष दिले, तरी अभियानापेक्षाही त्याचा अधिक परिणाम होईल, असे बोलले जाते. मोजक्या स्वच्छतागृहांत पाय ठेवायलाही अंगावर काटा येतो. नगर परिषदेलाच दोष देऊन उपयोग नाही. नागरीकांचीही जबाबदारीआहे.