शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
6
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
7
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
8
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
9
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
10
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
11
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
12
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
13
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
14
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
15
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
16
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
17
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
18
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
19
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
20
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?

स्वच्छ भारत अभियान कागदावरच

By admin | Updated: October 2, 2015 00:54 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’स २ आॅक्टोबर २०१४ रोजी धूमधडाक्यात सुरुवात झाली. नागरिकांना स्वच्छतेची सवय लागून आरोग्यदायी पर्यावरण व्हावे

मावळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’स २ आॅक्टोबर २०१४ रोजी धूमधडाक्यात सुरुवात झाली. नागरिकांना स्वच्छतेची सवय लागून आरोग्यदायी पर्यावरण व्हावे, हा यामागचा हेतू. पण, प्रसिद्धीसाठीच या अभियानाचा उपयोग शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था आणि पुढाऱ्यांनी केल्याचे वर्षभराचा आढावा घेतल्यानंतर स्पष्ट होत आहे. काही अपवाद वगळता परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. मावळ तालुक्यातील ठिकठिकाणच्या स्थितीचा घेतलेला हा आढावा.ंतळेगाव दाभाडे- स्टेशन : ‘अस्वच्छता करणार नाही आणि करूही देणार नाही’, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेने भारतभर गतवर्षी २ आॅक्टोबरला सुरू झालेल्या ‘स्वच्छ भारत अभियाना’चा तळेगाव नगर परिषदेची अनभिज्ञता आणि नागरिकांचे असहकार्य यामुळे फज्जा उडाला आहे. उद्घाटनाच्या वेळी ‘नमनाला घडाभर तेल’ वापरत गाजावाजा करण्यात आलेली ही मोहीम नंतर कागदावरच राहिल्याने सगळीकडे अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून, रोगराईची भीती निर्माण झाली आहे.स्टेशन विभागातील स्वराजनगरीपासूून ते थेट माळवाडीपर्यंत चाकण रस्त्यावरील जागोजागी कचराकुंड्या ओसंडून वाहत आहेत. जलवाहिन्यांच्या व्हॉल्व्हची गळती होऊन पाणी वाहून काही ठिकाणी रस्त्याला गटाराची अवकळा आली आहे. जनरल हॉस्पिटल कंपाउंडच्या कडेला दुकानदार, हॉटेलवाले, फेरीवाले फेकत असलेला कचरा, मंडईजवळ कचरा, गाडीबाहेर ओसंडून वाहणारा कचरा, स्वामी समर्थ मंदिराच्या समोर जोशीवाडी रिंग रोडवर कुंडीपेक्षा बाजूला पडलेला कचरा, अंबिका पार्कजवळ प्रस्तावित रेल्वे फाटकाजवळ ड्रेनेजची ओतली जाणारी घाण या व अशा अनेक ठिकाणी नगर परिषदेचे दुर्लक्ष झाले आहे. कर्मचारी- अधिकारी कितीही दावा करत असले, तरी अभियानाबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे तीन तेरा वाजल्याचे या बाबी स्पष्ट करीत आहेत. दैनंदिन स्वच्छतेकडे नगर परिषदेने जरी लक्ष दिले, तरी अभियानापेक्षाही त्याचा अधिक परिणाम होईल, असे बोलले जाते. मोजक्या स्वच्छतागृहांत पाय ठेवायलाही अंगावर काटा येतो. नगर परिषदेलाच दोष देऊन उपयोग नाही. नागरीकांचीही जबाबदारीआहे.