शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियान कागदावरच

By admin | Updated: October 2, 2015 00:54 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’स २ आॅक्टोबर २०१४ रोजी धूमधडाक्यात सुरुवात झाली. नागरिकांना स्वच्छतेची सवय लागून आरोग्यदायी पर्यावरण व्हावे

मावळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’स २ आॅक्टोबर २०१४ रोजी धूमधडाक्यात सुरुवात झाली. नागरिकांना स्वच्छतेची सवय लागून आरोग्यदायी पर्यावरण व्हावे, हा यामागचा हेतू. पण, प्रसिद्धीसाठीच या अभियानाचा उपयोग शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था आणि पुढाऱ्यांनी केल्याचे वर्षभराचा आढावा घेतल्यानंतर स्पष्ट होत आहे. काही अपवाद वगळता परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. मावळ तालुक्यातील ठिकठिकाणच्या स्थितीचा घेतलेला हा आढावा.ंतळेगाव दाभाडे- स्टेशन : ‘अस्वच्छता करणार नाही आणि करूही देणार नाही’, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेने भारतभर गतवर्षी २ आॅक्टोबरला सुरू झालेल्या ‘स्वच्छ भारत अभियाना’चा तळेगाव नगर परिषदेची अनभिज्ञता आणि नागरिकांचे असहकार्य यामुळे फज्जा उडाला आहे. उद्घाटनाच्या वेळी ‘नमनाला घडाभर तेल’ वापरत गाजावाजा करण्यात आलेली ही मोहीम नंतर कागदावरच राहिल्याने सगळीकडे अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून, रोगराईची भीती निर्माण झाली आहे.स्टेशन विभागातील स्वराजनगरीपासूून ते थेट माळवाडीपर्यंत चाकण रस्त्यावरील जागोजागी कचराकुंड्या ओसंडून वाहत आहेत. जलवाहिन्यांच्या व्हॉल्व्हची गळती होऊन पाणी वाहून काही ठिकाणी रस्त्याला गटाराची अवकळा आली आहे. जनरल हॉस्पिटल कंपाउंडच्या कडेला दुकानदार, हॉटेलवाले, फेरीवाले फेकत असलेला कचरा, मंडईजवळ कचरा, गाडीबाहेर ओसंडून वाहणारा कचरा, स्वामी समर्थ मंदिराच्या समोर जोशीवाडी रिंग रोडवर कुंडीपेक्षा बाजूला पडलेला कचरा, अंबिका पार्कजवळ प्रस्तावित रेल्वे फाटकाजवळ ड्रेनेजची ओतली जाणारी घाण या व अशा अनेक ठिकाणी नगर परिषदेचे दुर्लक्ष झाले आहे. कर्मचारी- अधिकारी कितीही दावा करत असले, तरी अभियानाबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे तीन तेरा वाजल्याचे या बाबी स्पष्ट करीत आहेत. दैनंदिन स्वच्छतेकडे नगर परिषदेने जरी लक्ष दिले, तरी अभियानापेक्षाही त्याचा अधिक परिणाम होईल, असे बोलले जाते. मोजक्या स्वच्छतागृहांत पाय ठेवायलाही अंगावर काटा येतो. नगर परिषदेलाच दोष देऊन उपयोग नाही. नागरीकांचीही जबाबदारीआहे.