शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

हक्काचे ‘मामाचे गाव’ हरवले...

By admin | Updated: May 6, 2017 02:03 IST

‘झुक्झुक् झुक्झुक् आगिनगाडी धुरांच्या रेषा हवेत काढी पळती झाडे पाहू या... मामाच्या गावाला जाऊ या’ हे बालगीत

लोकमत न्यूज नेटवर्कनिमोणे : ‘झुक्झुक् झुक्झुक् आगिनगाडी धुरांच्या रेषा हवेत काढी पळती झाडे पाहू या... मामाच्या गावाला जाऊ या’ हे बालगीत कमालीचे लोकप्रिय झाले होते, कारण खरोखर मुलांना हक्काचे मामाचे घर होते. पण, काळाच्या ओघात आता मात्र हे मामाचे घर हरवले असल्याचे दिसून येते. मुलांना सुट्या लागल्या, की पहिली आठवण व्हायची ती मामाच्या गावाची... दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुटीत जायची ती हक्काची जागा. पण, आजच्या तंत्रयुगात मात्र टीव्ही, मोबाईलमध्ये रमलेली बच्चेकंपनी मामाचा गाव विसरली आहे. ग्रामीण भागातल्या मुलांनाही सुट्यांमध्ये मामाच्या गावाला जायची पूर्वीची गंमत आता राहिलेली नाही. पूर्वी सहामाही आणि वार्षिक परीक्षा संपत आल्या, की मुलांना मोठ्ठी सुटी लागायची. मग मामाच्या गावी जाण्याचे वेध लागायचे. त्या वेळी नात्यागोत्यांमध्ये एकमेकांविषयी प्रेमभाव होता. परस्परांत स्नेह आणि आपुलकी होती. तेव्हा मामाचा गाव हा खूप जिव्हाळ्याचा विषय होता. खूप लांब नाही जवळच्याच एखाद्या खेडेगावात मामाचे घर असे. या घरात मामा, मामी, आजी, आजोबा या जीव लावणाऱ्या नात्यांसह खेळण्या-बागडण्यासाठी मामाची मुले असत. या मुलांसोबत दिवसभर गोट्या, लगोर, चेंडू, सूरपारंब्या खेळणे, रानावनात भटकून रानमेव्याचा आस्वाद घेणे, विहिरी-तलावांमध्ये मनसोक्त डुंबणे, मामा-मामींना कामात मदत करणे असा भरगच्च कार्यक्रम असायचा. नव्या आधुनिक युगात हे सारे संदर्भ आता पुसल्यागत झाले आहेत. सायंकाळी अंगणात सर्वांसह बसून इकडच्या-तिकडच्या गप्पा आणि नंतर चंद्राच्या शीतल चांदण्यात जेवणाची पंगत असे. सोबत आजीने दिवसभर जपून ठेवलेला खाऊ अमृताची गोडी देत असे. या वेळापत्रकात सुटी कधी संपते, हेही कळून येत नसे. सुटी संपल्यावर नवेकोरे कपडे घालून पुन्हा आपल्या घरी मोठ्या ऐटीत परतताना पुढील सुटीचाही वायदा होत असे.आज ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान यांमुळे माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल झाल्याने जीवनशैलीही बदलली आहे. नात्यागोत्यांतील स्नेहभाव कायम असला, तरी तो प्रकट करायला वेळ नाही. शहरांबरोबरच खेडेगावातील कौटुंबिक आणि सामाजिक स्थितीही बदलली आहे. बहुतेक विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेरगावी होस्टेलला आहेत. सुटी लागल्यावर त्यांना आपल्याच घरी थांबायचे असते. टीव्ही, व्हिडीओ गेम्स, मोबाईलवरील फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप इ.वरील चॅटिंगवर विद्यार्थी व युवक वर्ग व्यस्त आहे. सोशल मीडियातच  शोधतात आनंद या माध्यमांद्वारेच तो आपल्या जीवनाचा आनंद शोधत असताना लांबच्या व जवळच्या नात्यांमधील वीण संवादाने घट्ट करण्याची त्याची अजिबात मानसिकता नाही. माणसामाणसांत संवादच राहिलेला नाही; त्यामुळे माणसांपासून तो हरवत चालला आहे. इतरही कारणांचा शोध हवाविभक्त कुटुंब पद्धती, आई-वडिलांचेही नातेवाईक आणि समाज यांच्याप्रती असणारे उत्तरदायित्व, नोकरी-व्यवसायात व्यस्त असणारे पालक, त्यांची पैसा मिळण्यासाठीची लढाई, पाल्यांकडून अवाजावी शैक्षणिक अपेक्षा, सुटीतही क्लासची व्यस्तता, वाढती महागाई, नातेवाइकांसाठी खस्ता खाण्याची लोप पावलेली वृत्ती, उच्चशिक्षित आणि अल्पशिक्षणामुळे निर्माण झालेली दरी या गोष्टीदेखील या बदलांना कारणीभूत आहेत.