शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

वाढीव वीज बिलांमुळे नागरिक हैराण

By admin | Updated: July 3, 2017 03:24 IST

चुकीच्या पद्धतीने घेतलेले रीडिंग व खराब मीटरमुळे महावितरण कडून पाच ते दहापट वाढीव वीजबिले येण्याचे प्रकार वाघोलीतील

लोकमत न्यूज नेटवर्कवाघोली : चुकीच्या पद्धतीने घेतलेले रीडिंग व खराब मीटरमुळे महावितरण कडून पाच ते दहापट वाढीव वीजबिले येण्याचे प्रकार वाघोलीतील सोसायटीधारकांसोबत घडत आहे. साई संस्कृती सोसायटीतील एका घरगुती ग्राहकाला सरासरी ४०० रुपये वीजबिल येत असताना मागील महिन्याचे ९६ हजार रुपये आले असल्याने सोसायटीधारक महावितरणच्या कारभारामुळे हैराण झाले आहेत.वाघोलीतील अनेक सोसायट्यांमध्ये नागरिक सध्या महावितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवत असल्याचे चित्र वाघोली मध्ये पाहावयास मिळत आहे. महावितरणकडून देण्यात आलेले खराब मीटर व चुकीच्या पद्धतीने घेतलेल्या रीडिंगमुळे चालू महिन्यामध्ये सोसायटीतील नागरिकांना दुप्पट, तिप्पट नव्हे तर पाच ते दहापट वाढीव वीजबिले येत आहेत. याचा सर्वाधिक फटका बाइफ रस्त्यालगत असणाऱ्या साई संस्कृती सोसायटीला बसला आहे. सोसायटीतील ५०हून अधिक ग्राहकांना वाढीव बिले आली आहेत. यामध्ये सुबोध तारळ या ग्राहकाला महिन्याला सरासरी २०० ते ४०० रुपये वीजबिल येत असताना या महिन्यामध्ये ९४ हजार ९९० रुपये बिल आले आहे. त्याचबरोबर इतर घरगुती ग्राहकांनाही ७० हजार, ५५ हजार, २७ हजार अशी वीजबिले आली आहेत. यामुळे ग्राहकांनी शनिवारी भावडी रोड येथील महावितरण कार्यालयावर तक्रारींचा पाढा वाचला. या वेळी आणखी ५ ते ६ सोसायटीतील नागरिक वाढीव वीजबिलाच्या तक्रारी घेऊन आले होते. महावितरणतर्फे मीटर तपासून वाढीव वीजबिलांच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे सांगण्यात आले. रविवारी कनिष्ठ अभियंता एन. वैरागर यांनी साई संस्कृती सोसायटीमध्ये जाऊन नागरिकांच्या तक्रारी समजावून घेतल्या व वाढीव वीजबिल कमी करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले. महावितरणच्या या अशा कारभारामुळे सर्व कामे सोडून महावितरणच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याने सोसायटीधारक हैराण झाले आहेत. मीटर रीडिंग घेताना चुकत असल्यास संबंधितावर कारवाई करावी व खराब मीटर बदलून मिळावेत अशी मागणी सोसायटीधारक करीत आहे.कार्यालय विभाजनाची प्रतीक्षाचवाघोली शाखा कार्यालयाचे विभाजन करून वाघोली शाखा १, वाघोली शाखा २, वाघोली ग्रामीण असे विभाजन करण्याचे मागील दोन वर्षांपासून प्रस्तावित आहे. ४० हजार ग्राहक संख्या असलेल्या वाघोली शाखेमध्ये कर्मचारी कमी असल्याने अनेक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे तर अधिकारी व कर्मचारी वर्गाला ग्राहकांच्या तक्रारींना तोंड देताना चांगलीच दमछाक होत आहे. विभाजन प्रस्ताव रखडल्याने वाघोली कार्यालय विभाजनाची प्रतीक्षाच नागरिकांना करावी लागत आहे.वाघोलीतील सोसायटीधारकांना वाढीव वीजबिले येण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात आहे. महावितरणने याकडे लक्ष देऊन सुधारणा करावी अन्यथा वरिष्ठ कार्यालयामध्ये सोसायटीधारक ठिय्या आंदोलन करतील.- आशिष गलांडे, सोसायटीधारक