शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

शहरात वाहने वाढली अन् वृक्ष घटले!

By admin | Updated: June 5, 2016 03:51 IST

शहराची जीवनशैली हळूहळू बदलली. त्याप्रमाणे महामार्गावर वाहनांच्या संख्येतही भर पडत गेली. वाहनांची संख्या १० लाखांच्या घरात गेली. वृक्षांच्या संख्येत मात्र घट झाली. शहरात सध्या हरितपट्टा

पिंपरी : शहराची जीवनशैली हळूहळू बदलली. त्याप्रमाणे महामार्गावर वाहनांच्या संख्येतही भर पडत गेली. वाहनांची संख्या १० लाखांच्या घरात गेली. वृक्षांच्या संख्येत मात्र घट झाली. शहरात सध्या हरितपट्टा फक्त २८ टक्के उरला आहे. वृक्षसंवर्धन व उद्यान विभागाने ग्रीन सिटीच्या दृष्टीने पावले उचलणे आवश्यक आहे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. पवना, इंद्रायणी, मुळा या नद्यांमधील पाणी नमुन्यांचे अहवाल पर्यावरण विभागाने गतवर्षी तपासले. पवना नदीत सर्वांत जास्त प्रदूषण दापोडी, कासारवाडी व थेरगाव, तर इंद्रायणी नदीच्या भागात चिखली, सस्तेवस्ती, तसेच पिंपळे निलख भागात निर्धारित मानकांपेक्षा जास्त आढळून आले आहे. मोशी भागातील तळ्यामध्ये सर्वांत जास्त प्रदूषण आढळून आले आहे. यावरून या भागात पाणीप्रदूषण वाढले आहे, हे स्पष्ट होते. दर वर्षी पावसाळ्यापूर्वी वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट ठेवले जाते. मात्र, ते पूर्ण करण्यात उद्यान विभाग अपयशी ठरतो. २०१४-१५ला २० लाख लोकसंख्येच्या तुलनेत फक्त ३४ हजार वृक्ष शहरात लावले गेले. त्यामुळे शहरात पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्षारोपणाला खोडा बसला आहे. वृक्षगणना १२ वर्षांपूर्वी झाली. त्यानंतर वृक्षगणनाच झाली नाही. तसेच कोणत्या प्रकारचे शहरात किती वृक्ष आहेत. शहरातील शिल्लक वृक्षाच्या संवर्धनासाठी ठोस पावले उद्यान विभागाने उचलणे आवश्यक आहे. मात्र याबद्दल उद्यान विभागच साशंक आहे. शहरात छोटे-मोठे मिळून ६१७३ उद्योग आहेत. उद्योगनगरी अशी या शहराची ओळख आहे. मात्र, औद्योगिक सांडपाण्यामुळे जैविक व रासायनिक प्रदूषणात वाढ झाली आहे. अविघटनशील कचऱ्यामुळे ई-वेस्टचे प्रमाण जास्त वाढले आहे. त्यामुळे काही विषारी वायू निर्माण झाले आहेत. धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे. शहरातून दिवसाला प्रतिटन ७००च्या आसपास कचरा जमा होत आहे. मोशी कचरा डेपोत मर्क्यूरी लेड, कॉपर व निकेल या प्रदूषकांचे प्रमाण वाढले आहे, हे २०१४-१५ च्या पर्यावरण अहवालावरून स्पष्ट आहे.(प्रतिनिधी)साथीच्या आजारांत वाढ प्रदूषण बदलामुळे नागरिकांना पाणी व हवा या माध्यमातून मलेरिया, डेंगी, कावीळ, गॅस्ट्रो व श्वसनसंस्थेच्या विकारांत वाढ झाली. गतवर्षी वाढलेल्या प्रदूषकांमुळे कावीळ व विषमज्वरमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. डेंगीचे २०१४-१५ मध्ये ५१९ रुग्ण आढळून आले आहेत.तापमानात वाढ२००८-०९ला शहराचे तापमान २३-४० अंश सेल्सिअस होते. २०१५पर्यंत हे तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले. याची प्रचिती यंदा शहरवासीयांनी अनुभवली. शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. दुष्काळाची झळ काही अंशी पिंपरी-चिंचवड शहरात अनुभवायला आली. हे सर्व पर्यावरणबदलाचे द्योतक आहे. शहरात वाहनांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे होणारे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. सध्या शहरात हरितपट्टा २८ टक्के आहे तो ३५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा प्रयत्न आहे. औद्योगिक २ एमएलडी व इतर २० एमएलडी सांडपाणी नद्यांमध्ये मिसळले जाते. त्यासाठी नवीन ड्रेनेज लाइन बसविण्याचे प्रयत्न आहेत. त्याचप्रमाणे स्मशानभूमीतून होणारे हवाप्रदूषण टाळण्यासाठी विद्युतदाहिनी बसविण्यात आलेल्या आहेत. - संजय कुलकर्णी, पर्यावरण विभागप्रमुखनदीपात्रात धुतली जातात वाहनेतळवडे : येथील इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेकडे पर्यावरण विभागाचे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळेच थेट नदीच्या पात्रात वाहने घालून ती धुऊन काढण्याचे धाडस वाहनचालक करीत आहेत. त्यामुळे नदीच्या पाण्याची प्रदूषण पातळी वाढत असल्याच्या तक्रारी पर्यावरणप्रेमी करीत आहेत.तळवडे येथे इंद्रायणी नदीवर झालेल्या नवीन पुलामुळे पिंपरी-चिंचवड शहर आणि चाकण औद्योगिक वसाहत जोडली गेली. त्याच पुलापासून थेट नदीपात्रात वाहन उतरवण्यासाठी कच्चा रस्ता आहे. बाराही महिने या रस्त्याने वाहने थेट नदीपात्रात उतरतात नद्यांच्या प्रदूषण पातळीत सातत्याने वाढ होते.