शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले...
2
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
3
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
4
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
5
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
6
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
7
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
8
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
9
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
10
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
11
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
12
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
13
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
14
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
15
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
16
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
17
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
18
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
19
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
20
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन

शहर बचाव समिती मैदानात

By admin | Updated: December 13, 2015 02:58 IST

महापालिकेची कंपनी करून मूठभर नागरिकांच्या हितासाठी शहराची विकासाची दिशा घातक पातळीवर नेण्याचा घटनाबाह्य प्रकल्प स्मार्ट सिटीच्या नावाने पुणेकरांच्या माथी मारला

पुणे : महापालिकेची कंपनी करून मूठभर नागरिकांच्या हितासाठी शहराची विकासाची दिशा घातक पातळीवर नेण्याचा घटनाबाह्य प्रकल्प स्मार्ट सिटीच्या नावाने पुणेकरांच्या माथी मारला जात असून, या प्रकल्पास विरोध करण्यासाठी शहरातील स्वयंसेवी संस्था, संघटना तसेच राजकीय पक्षांच्या वतीने पुणे शहर बचाव समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या वतीने येत्या सोमवारी (दि. १४) सकाळी १० वाजल्यापासून महापालिकेबाहेर ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी महापौर भाई वैद्य यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याच दिवशी मुख्य सभेत हा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. समितीच्या शनिवारी झालेल्या पहिल्या वहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉंम्रेड अजित अभ्यंकर यांनी दिली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, केंद्र शासनाच्या आदेशानुसार, महापालिका प्रशासनाने ठेवलेल्या या प्रस्तावात पुण्याला जागतिक दर्जाचे शहर बनविण्याच्या नावाखाली औंध-बाणेर-बालेवाडी भागातील ४० हजार नागरिकांसाठी तब्बल २८०० कोटींचा खर्च केला जाणार आहे तर उर्वरित ४० लाख पुणेकरांसाठी ७८० कोटींचा खर्च केला जाणार आहे. मात्र, त्यासाठी नेमण्यात येणाऱ्या एसपीव्हीची माहिती न देताच या कंपनीला खर्चाचे अधिकार दिले जाणार आहेत. त्यासाठी पुणेकरांचे नाव पुढे करीत नगरसेवकांना पुढे करून हा प्रस्ताव मान्य करण्याचा घाट घालण्यात आला आहे. एकीकडे गेल्या १३ वर्षांपासून शहराचा विकास आराखडा मान्येसाठी पडून असताना, राज्यशासन या प्रस्तावाच्या मान्यतेची घाई करत आहे. त्याला नगरसेवकांनी आपल्या लोकशाही मार्गाने दिलेल्या अधिकाराने विरोध केला आहे. मात्र, त्यांच्या या अधिकाराला आव्हान देत महापालिका प्रशासन महानगर पालिका अधिनियम ४४८ चा वापर करून नगरसेवकांना बदनाम व ब्लॅकमेल करत आहे. या प्रकल्पातील तरतूदी पाहता त्यात सरळ सरळ छुपे हितसंबध असल्याचे दिसून येते. त्यामुळे या प्रकल्पास सर्व ताकदीनिशी विरोध करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीस युवाजन सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अभिजित वैद्य, राष्ट्रवादी कामगार सेलचे उपाध्यक्ष अ‍ॅड. म. वि. अकोलकर, शहर नियोजन तज्ज्ञ अनिता बेंनजिर, परिसरचे सुजीत पटवर्धन, नगरसेवक डॉ. सिध्दार्थ धेंडे, महाराष्ट्र कामगार मंचाचे दिलीप मोहीते, भारीप बहुजन महासंघाच्या वैशाली चांदणे, जनवादी महिला संघटनेच्या किरण मोघे, सिटूचे वसंत पवार, कागद काच पत्र पंचायतीचे विष्णू श्रीमांगले, युवा भारतीचे अँड. भूषण पवार, रिपब्लीकन विद्यार्थी परिषदेचे सतिश गायकवाड, एसएफआयचे विलास साबळे उपस्थित होते.- पुण्याला ‘स्मार्ट सिटी’ बनवण्यासाठी केंद्र शासनाच्या आदेशानुसार, महापालिका प्रशासनाने ठेवलेल्या या प्रस्तावात पुण्याला जागतिक दर्जाचे शहर बनविण्याच्या नावाखाली औंध-बाणेर-बालेवाडी भागातील ४० हजार नागरिकांसाठी तब्बल २८०० कोटींचा खर्च केला जाणार आहे तर उर्वरित ४० लाख पुणेकरांसाठी ७८० कोटींचा खर्च केला जाणार आहे.