शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांनी दिली शहर विकासाची ग्वाही

By admin | Updated: January 6, 2017 06:29 IST

जिल्ह्यातील १० नगरपालिकांच्या नुकत्याच निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांना शुभेच्छा देऊन त्यांचा सन्मान करण्याचे अभिनव

पुणे : जिल्ह्यातील १० नगरपालिकांच्या नुकत्याच निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांना शुभेच्छा देऊन त्यांचा सन्मान करण्याचे अभिनव पाऊल 'लोकमत'ने उचलले. या सर्व नगराध्यक्षांना शुक्रवारी ‘लोकमत’ कार्यालयात निमंत्रित करून त्यांचा गौरव करण्यात आला. या वेळी सर्व नगराध्यक्षांनी पक्षविरहित राजकारण करून शहर विकासालाच प्राधान्य राहणार असल्याची ग्वाही 'लोकमत' व्यासपीठावरून दिली. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई व राकेश मल्होत्रा यांच्या हस्ते या नगराध्यक्षांना पुणेरी पगडी, उपरणे, पुष्पगुच्छ व ‘लोकमत’ दीपोत्सव देऊन सन्मानित करण्यात आले. दौंडच्या नागरी हित संरक्षण मंडळ आघाडीच्या शीतल कटारिया, आळंदीच्या भाजपाच्या वैजयंता उमरगेकर, जेजुरीच्या काँग्रेसच्या वीणा सोनवणे, सासवडचे काँग्रेसचेमार्तंड भोंडे, तळेगावच्या भाजपाच्या चित्रा जगनाडे, लोणावळ्याच्या भाजपाच्या सुरेखा जाधव आदी नगराध्यक्ष व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.या वेळी संपादक विजय बाविस्कर म्हणाले, पुणे जिल्ह्यातील नगराध्यक्षांना एकत्रित आणून त्यांना सन्मानित करणारे ‘लोकमत’ हे राज्यातील एकमेव दैैनिक आहे. तुम्ही थेट जनतेतून निवडून आले आहात. त्यामुळे लोकांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे स्वप्न मतदारांनी तुमच्यामार्फत पाहिले आहे. नगराध्यक्ष हा निवडणुकीनंतर पक्षाचा न राहता त्या संपूर्ण शहराचा व्हावा. पक्षीय राजकारणात न अडकता उदारमतवादी होऊन त्या शहराचे प्रश्न सोडवावेत. शहरवासीयांच्या आशा आकांक्षा आपण पूर्ण कराल, अशी अपेक्षा आहे. सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भांडे यांनी, ‘लोकमत’ने सत्कार करून आमचा उत्साह, कामाची ऊर्मी वाढविली असून, लोकामंधून निवडून आल्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे, असे सांगितले.जेजुरीच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी या वेळी जेजुरीकरांनी नवनिर्वाचितांना संधी दिली, त्या संधीचे सोनं करू. गृहिणी म्हणून आतापर्यंत जबाबदारी पार पाडली आता शहराची कारभारीण म्हणूनही ती तेवढीच सक्षमपणे पार पाडू, असे आश्वासन या वेळी दिले.तळेगावच्या नगराध्यक्षा चित्रा जनगाडे यांनी, निवडणुका संपताच पक्षीय राजकारण संपते. पक्षापेक्षा नगराध्यक्ष लोकांचा होता. याची जाणीव ठेवून पुढील काळात शहरविकासाचे काम करणार असल्याचे सांगितले.लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी सांगितले की, आमची चांगली कामं ‘लोकमत’मुळे लोकांपर्यंत पोहोचली, त्यामुळे ‘लोकमत’चे आभार. पहिल्यांदाच नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून आल्यामुळे आता ५ वर्षे काम करता येणार आहे. पूर्वी नगराध्यक्षपदाचा खो-खो व्हायचा. त्यात शहराचे मोठे नुकसान होत होते. आता पुढील पाच वर्षांत नियोजनबद्ध काम करता येणार आहे. लोणावळाकरांचे स्वप्न साकार करू, असे आश्वासन त्यांनी दिले. दौंडच्या नगराध्यक्षा शीतल कटारिया व आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी ‘लोकमत’ने सत्कार केल्याने आमची जबाबदारी वाढली असून शहरविकासाची ग्वाही दिली. या वेळी नगराध्यक्षांबरोबर काही नगरसेवक व काही पक्षाचे पदाधिकारीही आले होते. त्यांचाही ‘लोकमत’ने सत्कार केला. यात योगेश कटारिया, अशोक उमरगेकर उर्फ कांबळे, प्रमिला राहणे, पारूबाई तापकीर, सागर भोसले, रामभाऊ भोसले, हेमंत सोनवणे, अनिल उरवणे, माऊली यादव, मिलिंद जगताप, श्रीधर पुजारी, हर्षल होगले, संदीप जनगाडे आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)